शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

बसस्थानक अवैध वाहतुकीच्या विळख्यात

By admin | Updated: November 30, 2014 23:09 IST

शहरात दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकार गर्दी दिसून येते.

गोंदिया : शहरात दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकार गर्दी दिसून येते. स्थानिक जयस्तंभ चौकातील बसस्थानकावरही मोठी गर्दी असते. मात्र या बसस्थानकाला अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी विळखा घातला आहे.बसस्थानकावरून नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आदी मार्गाच्या बसगाड्या धावत असतात. नागरिकांना स्वस्त व सुरक्षित प्रवासासाठीदेखील एस.टी. बसचे आश्रय घ्यावे लागते. मात्र या बसस्थानकाभोवती काळी-पिवळी तसेच आॅटो चालकांनी विळखा घातल्याने जागेअभावी एसटी चालकांना आपले थांबे बदलावे लागत आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहे. जयस्तंभ चौक तसेच इतर एसटीच्या थांब्यावर अवैध वाहनांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले आहे. प्रवासी जेथे बसगाड्या थांबतात तेथे बसची वाट पाहात उभे राहतात. मात्र या अवैध वाहनांच्या विळख्याने एसटी बसच्या चालकांची गोची होते व ते देखील बस थांबे सोडून आपले वाहन दुसऱ्या ठिकाणी थांबवतात. थांब्यावर उभे असलेले प्रवासी धावत जावून गाडीत बसतात. या प्रकारामुळे दररोज छोटे मोठे अपघातही घडतात. हा सर्व प्रकार वाहतुक पोलीसांच्या डोळ्यासमोर होतो . त्यामुळे या अवैध वाहतूक करणाऱ्यांना एक प्रकारचे अभयच मिळत आहे. बसथांब्याच्या जागेवर काळी-पिवळी, आॅटोरिक्षा, सायकल रिक्षा तसेच फळांच्या गाड्या उभ्या असल्याने रस्ता अडवला जातो व तो अरूंद पडतो. यामुळे एसटी चालकदेखील वाहन कुठे उभे करावे म्हणून संभ्रमात असतात. जेथे मोकळी जागा मिळेल तिथे आपली बस उभी करतात. बस मिळावी म्हणून बसच्या मागे काही प्रवासी व विद्यार्थी धावतात दरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वाहतूक पोलीस व एसटी विभागाने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)