शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हांड्यांना स्वत:च तयार करावा लागतो रस्ता

By admin | Updated: April 22, 2016 03:43 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील दल्ली (रेंगेपार) अंतर्गत येणाऱ्या तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले

शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील दल्ली (रेंगेपार) अंतर्गत येणाऱ्या तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या घरापासून केवळ ९ किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला येथील गावकऱ्यांना रस्त्याअभावी लग्न समारंभासाठी स्वत: रस्ता तयार करावा लागतो. हे वाचून विश्वासही बसणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे.सलंगटोला हे शंभर टक्के आदिवासी लोकांचे २० घरांचे खेडे आहे. त्याचे अंतर तालुक्यापासून व पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे घरापासून केवळ ९ किमी अंतरावर असून त्यांच्याच कार्यक्षेत्रात येते. सन १९३५ पासून या खेडेगावात फक्त आदिवासीच राहतात. परंतु त्या गावाला जाण्यायेण्यासाठी हक्काचा रस्ता नाही. त्यामुळे धुऱ्यापारीने जाणे-येणे करावे लागते. तसेच गावात लग्न समारंभ असला तर गावकऱ्यांनाच वऱ्हाड्यांच्या सोईसाठी कचऱ्याची साफसफाई करून रस्ता तयार करावा लागतो. सध्या याच गावातील युवक राजेश धुर्वे यांच्या बहिणीचे लग्न जुळले. लग्न सोहळ्याला वराकडील मंडळी कुठून येणार, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आप्तेष्ठांची गैरसोय होवू नये म्हणून त्याने गावातील कुरेश कुंभरे, अजय टेकाम, गोविंद कुंभरे, हेमराज टेकाम, अंबेलाल टेकाम, नामदेव धुर्वे व कुवर टेकाम या युवकांना सोबत घेवून वऱ्हाड्यांच्या सोईसाठी रस्ता सफाईच्या कामाला सुरूवात केली आहे. निवडणुकीच्या काळात नेतेमंडळी धुऱ्यापारीने येऊन मतांची मागणी करतात. त्यावेळी गावकरी रस्त्याचा मुद्या त्यांच्यासमोर ठेवतात. यावर प्रत्येक उमेदवार मला मत द्या, मी निवडून आल्यावर सर्वप्रथम रस्ता तयार करून देईन, असे आश्वासन देतात. परंतु निवडून आल्यावर ६५ वर्षाच्या काळात कोणत्याच उमेदवाराने रस्ता तर सोडाच पण भेटसुध्दा दिली नाही, असे त्या गावच्या वयोवृध्दांनी लोकमतला सांगितले. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत या परिक्षेत्रातील प्रत्येक खेडेपाडे डांबरीकरणाने जोडल्या गेले, यात दुमत नाही. पण सलंगटोल्यालाच का वगळण्यात आले, हा संशोधनाचा विषय आहे. गावकऱ्यांनी रस्त्याची समस्या प्रसार माध्यमाद्वारे अनेकवेळा मांडली. परंतु प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधिंनी त्याची साधी दखलही घेतली नाही. यावरून त्यांच्या कार्यप्रणालीची प्रचिती येते. पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना धुऱ्यापारीने डोंगरगाव, सडक-अर्जुनी व उशीखेडा येथे विद्याजर्नासाठी जावे लागते. एखाद्या वृध्दाची प्रकृती खराब झाली तर चारपाईने त्याला दल्लीपर्यंत न्यावे लागते. लग्न सोहळ्यासाठी स्वत: रस्त्याची सफाई गावकऱ्यांना करावी लागते. हे तेथील रहिवाशांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो रुपये खर्ची घालून त्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याचा गवगवा करते. मग सलंगटोलावासीयांसोबत सावत्र व्यवहार का केला जातो? असा सवाल तेथील नागरिक करीत आहेत.प्रशासनाने व लोकप्रतिनिधिंनी सलंगटोलावासीयांच्या रस्त्याच्या समस्येला प्रथम प्राधान्य देऊन त्या गावाला हक्काचा रस्ता तयार करून द्यावा, हीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)