शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

संचालक मंडळास दिलेली मुदतवाढ केली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:11 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १८ नोव्हेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. तत्पुर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यातच शासनाच्या पणन व वस्त्रद्योग विभागाने सध्याच्या संचालक मंडळाला .....

ठळक मुद्देशासन निर्णय बदलला : कृउबास निवडणूक प्रकरण

ऑनलाईन लोकमतगोंदिया : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १८ नोव्हेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. तत्पुर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यातच शासनाच्या पणन व वस्त्रद्योग विभागाने सध्याच्या संचालक मंडळाला निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत अथवा नवीन संचालक पदारुढ होईपर्यंतच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याची मंजूरी १२ मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार दिली होती. मात्र १३ मार्च रोजी पुन्हा पणन व वस्त्रोद्योग विभागाने नवीन आदेश निर्गमित करुन ही मुदतवाढ रद्द करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहे. यामुळे बाजार समितीच्या निवडणूक तसेच प्रशासकांच्या नियुक्तीला घेवून चांगलीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला घेऊन सर्वच पक्ष उत्साहीत आहेत. अशातच विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडेल, अशी आशा होती. मात्र, शासनाने शेतकरी गटातून १५ संचालक निवडून देण्याचे नव्याने निर्देश दिल्याने संचालक मंडळात बदल झाला. त्या अनुषंगाने तालुक्यातील गावाची वाटणी तसेच मतदारांची संख्याही निश्चित करण्यात आली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर शेतकरी गटातून ५ संचालकांसाठी आरक्षणही जाहीर करण्यात आले. अशातच जिल्हा निबंधक कार्यालयाच्यावतीने निवडणुकीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची मागणी बाजार समितीकडे केली.परंतु निवडणुकीसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करुन निवङणूक पुढे ढकलण्याचे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले होते. यामुळे बाजार समितीवर प्रशासक बसविण्यात येईल, अशी चर्चा होती. परंतु १२ मार्च रोजी राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन आदेश निर्गमित करुन महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ कलम ५९ नुसार अधिकाराचा वापर करुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास १९ नोव्हेंबर २०१७ पासून निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत अथवा नवीन संचालक पदारुढ होतपर्यंत या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले.मात्र, दुसºयाच दिवशी पुन्हा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ देण्याबाबत शासनाचे स्पष्ट आदेश नसल्यामुळे शासन आदेशानुसार ही मुदतवाढ रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय काढला व त्याची माहिती पणन संचालकासह जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व कृषी उत्पन्न बजार समिती यांना दिली आहे.विशेष म्हणजे, एका दिवसातच निर्णय बदलण्याची वेळ शासनावर का आली? असा सवाल विद्यमान संचालक मंडळाने उपस्थित केला आहे. त्यातच शासनाचा मनसुबा बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्याचा असावा, अशीही चर्चा या आदेशाने सुरु झाली आहे. या निर्णयामुळे एकंदरीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.