शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

निर्धारित केलेले दर त्वरित रद्द करा

By admin | Updated: April 9, 2015 01:02 IST

तिरोडा नगर परिषद मालकीची सार्वजनिक दैनिक गुजरीचे लिलाव १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत करीत असताना निर्धारित केलेले वसुलीचे दर...

गोंदिया : तिरोडा नगर परिषद मालकीची सार्वजनिक दैनिक गुजरीचे लिलाव १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत करीत असताना निर्धारित केलेले वसुलीचे दर स्थायी समितीने स्वत:च्या मर्जीने ठरविल्याचा आरोप दुकानदार, शेतकरी व नागरिकांनी केला आहे. तसेच सदर निर्धारित दर रद्द करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनानुसार, वसुलीचे दर ठरविण्यापूर्वी दैनिक गुजरी दुकानदार, कृषी माल आणणाऱ्या शेतकरी व नागरिकांची सूचना मागविण्यात आली नाही. तसेच स्थायी समितीने ठरविलेल्या दरावर दुकानदार व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास कसलाही वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे निर्धारित दर दैनिक गुजरी दुकानदार, शेतकरी व नागरिकांच्या हिताचे नसून नियमबाह्य आहे. हे नियमबाह्य ठरविलेले दर वसूल करण्यासाठी कंत्राटदार १ एप्रिल २०१५ पासून चुकीची माहिती देवून दबाव टाकतात व धमकावतात. दैनिक गुजरी वसुली करताना ज्या शेतकरी व दुकानदारांनी वसुली देण्यास नकार दिला, त्यांच्याशी वाद घालून वसुली केली जात आहे. तसेच किरकोळ भाजी विक्रेत्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानासाठी विकत घेवून विक्रीकरिता आणलेल्या मालावरसुद्धा वेगळे दर आकारून कंत्राटदार वसुली करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे.२४ मार्च २०१५ रोजी लिलाव झाल्यानंतर काही दुकानदार व शेतकऱ्यांना बोलावून नियमबाह्य ठरविलेले चुकीचे दर देण्याचे कळविण्यात आले. यावर शेतकऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना २७ मार्च २०१५ रोजी अर्ज देवून वाढविलेले दर कमी करण्याची विनंती केली. परंतु यावर कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ३१ मार्च २०१५ रोजी प्रत्यक्ष मुख्याधिकाऱ्यांची भेट घेवून वाढविलेले दर कमी करण्याची विनंती करण्यात आली. यावर स्थायी समितीची बैठक बोलावून दर कमी करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. तसेच स्थायी समितीच्या सभेत पुढील निर्णय होईपर्यंत जुन्या दराने वसुली करण्याचे आश्वासनसुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. तशी सूचना कंत्राटदारांना देण्याचे आल्याचे दुकानदार व शेतकऱ्यांना कळविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसून नियमबाह्य वाढविलेल्या दरानेच सक्तीने वसुली केली जात आहे. ही बाब दुकानदार, शेतकरी व नागरिकांच्या विरोधाची असून नवीन दराने वसुली रद्द करून कमी करणे आवश्यक आहे. जुने दर व नवीन दरात फारच तफावत आहे. तेव्हा वाढीव दराप्रमाणे व दुकानदार व शेतकऱ्यांनी नमूद केल्याप्रमाणे दर देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी तत्काळ स्थायी समितीची बैठक घेवून नियमबाह्य दर रद्द करून कमी करावे व सामंजस्याने वसुलीची कार्यवाही करण्याची मागणी परमेश्वर बनकर, राजेंद्र चौरे, बुधा बनकर, राजेंद्र चोपकर, नरेश विठोले, चैनराम किरपानकर, राधेश्याम मुटकुरे, चंद्रभान ठाकरे व इतर सव्वाशे दुकानदारांनी केली आली आहे. (प्रतिनिधी)