शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

कालव्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: March 3, 2016 01:45 IST

बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

कालव्यावर रस्ते, घर बांधकाम : सिंचन सुविधा वाढविण्यात अपयशयशवंत मानकर आमगावबाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कालव्यांची दुरुस्ती, सिंचनवाढ याकडे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी मिळणारी सिंचन सुविधा नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.आमगाव येथील बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनातील उपविभागीय कार्यालयाच्या दुर्लक्षितपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने कोट्यवधींचा निधी कालवे बांधकामाकरिता दिला आहे. परंतु सिंचनातील महत्त्वाचे कालवे योग्य व्यवस्थापनातून बाद झाले आहेत. अनेक भागातून जाणारे कालवे दुरुस्ती व बांधकामाअभावी फुटले आहेत. त्यामुळे पाण्याचे अपव्यय वाढले आहे. कालव्यांमधील स्वच्छता व देखरेख यासाठी शासनाने नियमित कर्तव्य ठरवून दिलेले आहेत. परंतु अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे कालव्यांची विल्हेवाट लावली जात आहे.बाघ इटियाडोह पाटबंधारे उपविभागांतर्गत पुजारीटोला, कालीसराड, सिरपूर या धरणांसह कालव्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाने निश्चित केली आहे. पाणी साठवून धरणातील सिंचन सुविधा व कालव्यांच्या व्यवस्थापनाकरिता शेतकऱ्यांकडून मागणी वाढत असताना धरण व कालव्यांच्या व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यामुळे सिंचन सुविधेपासून शेतकऱ्यांना वंचित व्हावे लागत आहे.आमगाव, बनगाव व रिसामा या परिसरातून बांधकालव्यांची जागा खासगी वापराकडे गेली आहे. या परिसरात धरणाकडून येणारे कालवे लोकवस्तींनी वेढले आहे. पाण्याचे विचरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कालव्यांच्या भूमीलगत प्रतिबंधक अशी उपाययोजना असल्याने त्याची सुरक्षितता विभागावर आहे. परंतु विभागाकडूनच या कालव्यावर पक्के अतिक्रमण करण्यासाठी पाठबळ दिल्याने कालव्यांवर पक्के बांधकाम करुन नागरिकांनी उपयोगात आणले आहे. त्यामुळे कालवे संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.उपविभाग आमगाव अंतर्गत येणारे सिंचन धरणे यातील सिंचन वाढीचे प्रयत्न विभागाकडून झालेच नाही. त्यामुळे सिंचनातील पाण्याची वाढ करण्यात विभागाला अपयश आले. दरवर्षी शेतकऱ्यांना शेतपिकासाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता व मागणी यात तफावत निर्माण होत असल्याने शेतकरी पिकांपासून वंचित होत आहेत. शेतकऱ्यांनी अनेकदा विभागाला सिंचन सुविधा वाढविण्याची मागणी केली. परंतु या प्रकाराला विभागाने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पाण्याअभावी हातातील पिके गमावण्यासाठी शेतकऱ्यांना बाध्य व्हावे लागले.आमगाव उपविभागात शासनाने विविध उपाययोजना अंतर्गत निधी उपलब्ध करुन सिंचन सुविधा तत्पर करण्यासाठी योजना कार्यान्वित केली. परंतु याचा उपयोग सुविधांसाठी झालेच नसल्याचे निदर्शनात येते. कालव्यांची दुरवस्था, अपुरे सिंचन प्रकल्प यामुळे शेतकऱ्यांची फसगत होत आहे. शासनाने या विभागाला किती निधी दिला याचा शोध घेऊन तो विभागाने कुठे उपयोगात आणला याची आता चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. विभागाच्या कामचुकारपणामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे रबी पिकासाठी टाकलेले बियाणे जमिनीत मुरले. तर रबी पिकापासून शेतकऱ्याला वंचित व्हावे लागेल.