शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कालव्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: January 17, 2015 01:50 IST

शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली.

आमगाव : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली. परंतु त्या कालव्याचे योग्य व्यवस्थापनच नसल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. सोबतच त्यावर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. आमगाव तालुक्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.तालुक्यातील शेतकरी उपलब्ध सिंचन सुविधांच्या माध्यमातून धानासह कडधान्य, गळीतधान्य व भाजीपाल्याची लागवड करुन उत्पन्न घेत असतात. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या सिंचनाच्या सोयींचा पुरेपूर वापर झाल्यास त्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात. परंतु या कालव्यांचे व्यवस्थापन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे धोक्यात आले आहे.आमगाव तालुक्यातील ८४ गावांतील शेतकऱ्यांना उपलब्ध होणारे सिंचनाचे पाणी कालव्यांच्या माध्यमाने पुरविले जाते. तालुक्यातील २२३२६ हेक्टर खरीप, तर रबी ३४३० हेक्टर व बागायती ९१९३ हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्राला लघुप्रकल्प व इतर सिंचन सुविधांच्या माध्यमाने सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. कालव्यांचे जाळे शेतशिवारातून ते शहरातील मुख्य भागामधून टाकण्यात आले आहेत. या कालव्यांच्या लगत लोकवस्तीही निर्माण झाली आहे. परंतु लोकवस्ती निर्माण होताना कालव्यांचे व्यवस्थापन बघणारा बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग याबाबत पूर्णत: बेफिकीर असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक व्यक्तींनी धरण कालव्यांची जमीन बळावल्याचा प्रयत्न केला. यातूनच शहरी भागातून कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले. अनेक व्यक्तींनी कालव्यांवर पक्के रस्ते बनविले. काही कालव्यांवरच पक्क्या इमारती बांधकामाचे नियोजन केले. कालव्यांची जागा मुख्य केंद्रातून मोजण्यात येते. मोठे कालवे हे ८० मिटर रुंदीचे तर लहान कालवे २० मिटर रुंदीचे आहेत. शासनाने भूसंपादन करताना या जागेची रितसर लेखणी केली. परंतु व्यवस्थापन बघणाऱ्या विभागाने या कालव्यांची परस्पर विल्हेवाट लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे कालवे भविष्यात शोधावे लागण्याची पाळी येणार आहे. (शहर प्रतिनिधी)