शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

कालव्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: January 17, 2015 01:50 IST

शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली.

आमगाव : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली. परंतु त्या कालव्याचे योग्य व्यवस्थापनच नसल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. सोबतच त्यावर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. आमगाव तालुक्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.तालुक्यातील शेतकरी उपलब्ध सिंचन सुविधांच्या माध्यमातून धानासह कडधान्य, गळीतधान्य व भाजीपाल्याची लागवड करुन उत्पन्न घेत असतात. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या सिंचनाच्या सोयींचा पुरेपूर वापर झाल्यास त्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात. परंतु या कालव्यांचे व्यवस्थापन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे धोक्यात आले आहे.आमगाव तालुक्यातील ८४ गावांतील शेतकऱ्यांना उपलब्ध होणारे सिंचनाचे पाणी कालव्यांच्या माध्यमाने पुरविले जाते. तालुक्यातील २२३२६ हेक्टर खरीप, तर रबी ३४३० हेक्टर व बागायती ९१९३ हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्राला लघुप्रकल्प व इतर सिंचन सुविधांच्या माध्यमाने सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. कालव्यांचे जाळे शेतशिवारातून ते शहरातील मुख्य भागामधून टाकण्यात आले आहेत. या कालव्यांच्या लगत लोकवस्तीही निर्माण झाली आहे. परंतु लोकवस्ती निर्माण होताना कालव्यांचे व्यवस्थापन बघणारा बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग याबाबत पूर्णत: बेफिकीर असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक व्यक्तींनी धरण कालव्यांची जमीन बळावल्याचा प्रयत्न केला. यातूनच शहरी भागातून कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले. अनेक व्यक्तींनी कालव्यांवर पक्के रस्ते बनविले. काही कालव्यांवरच पक्क्या इमारती बांधकामाचे नियोजन केले. कालव्यांची जागा मुख्य केंद्रातून मोजण्यात येते. मोठे कालवे हे ८० मिटर रुंदीचे तर लहान कालवे २० मिटर रुंदीचे आहेत. शासनाने भूसंपादन करताना या जागेची रितसर लेखणी केली. परंतु व्यवस्थापन बघणाऱ्या विभागाने या कालव्यांची परस्पर विल्हेवाट लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे कालवे भविष्यात शोधावे लागण्याची पाळी येणार आहे. (शहर प्रतिनिधी)