शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कालव्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: January 17, 2015 01:50 IST

शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली.

आमगाव : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली. परंतु त्या कालव्याचे योग्य व्यवस्थापनच नसल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. सोबतच त्यावर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. आमगाव तालुक्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.तालुक्यातील शेतकरी उपलब्ध सिंचन सुविधांच्या माध्यमातून धानासह कडधान्य, गळीतधान्य व भाजीपाल्याची लागवड करुन उत्पन्न घेत असतात. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या सिंचनाच्या सोयींचा पुरेपूर वापर झाल्यास त्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात. परंतु या कालव्यांचे व्यवस्थापन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे धोक्यात आले आहे.आमगाव तालुक्यातील ८४ गावांतील शेतकऱ्यांना उपलब्ध होणारे सिंचनाचे पाणी कालव्यांच्या माध्यमाने पुरविले जाते. तालुक्यातील २२३२६ हेक्टर खरीप, तर रबी ३४३० हेक्टर व बागायती ९१९३ हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्राला लघुप्रकल्प व इतर सिंचन सुविधांच्या माध्यमाने सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. कालव्यांचे जाळे शेतशिवारातून ते शहरातील मुख्य भागामधून टाकण्यात आले आहेत. या कालव्यांच्या लगत लोकवस्तीही निर्माण झाली आहे. परंतु लोकवस्ती निर्माण होताना कालव्यांचे व्यवस्थापन बघणारा बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग याबाबत पूर्णत: बेफिकीर असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक व्यक्तींनी धरण कालव्यांची जमीन बळावल्याचा प्रयत्न केला. यातूनच शहरी भागातून कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले. अनेक व्यक्तींनी कालव्यांवर पक्के रस्ते बनविले. काही कालव्यांवरच पक्क्या इमारती बांधकामाचे नियोजन केले. कालव्यांची जागा मुख्य केंद्रातून मोजण्यात येते. मोठे कालवे हे ८० मिटर रुंदीचे तर लहान कालवे २० मिटर रुंदीचे आहेत. शासनाने भूसंपादन करताना या जागेची रितसर लेखणी केली. परंतु व्यवस्थापन बघणाऱ्या विभागाने या कालव्यांची परस्पर विल्हेवाट लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे कालवे भविष्यात शोधावे लागण्याची पाळी येणार आहे. (शहर प्रतिनिधी)