शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

वन्यजीव विभागाने लावले शेंडा परिसरातील शेतात कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:08 IST

शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाची दखल : नुकसानभरपाईचा घेणार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोलयारी) : शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस हवालदील होत आहेत. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची तक्रार वनविभागाकडे वारंवार केली जाते. मात्र वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जाते.यावर तोडगा काढण्यासाठी वन्यजीव विभागाने पुढाकार घेवून येथील शेतकरी लेमनदास पाटील लिल्हारे यांच्या शेतात प्राण्यांचा आवाज काढणारा भोंगू व सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने त्यामध्ये वन्यप्राण्यांचे फोटो कैद झाले आहेत.येथील शेतकरी लिल्हारे यांची जवळच असलेल्या मोहघाटा येथे बारा एकर शेती आहे. त्यांच्या शेतात ऊस व धानाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्यांच्या शेतातील शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच शेंडा, कोयलारी, कोहळीपार, प्रधानटोला, आपकारीटोला, मसरामटोला, पांढरवाणी येथील शेतकरी सुद्धा वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त आहेत.अशातच वन्यजीव विभागाने पुढाकार घेवून शेतमालाचे नुकसान कोणकोणत्या वन्य प्राण्यांमुळे होते, हे शोधण्यासाठी लिल्हारे यांच्या शेतात प्राण्यांचा आवाज काढणारे भोंगू व सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो कैद झाले आहेत. या कॅमेºयाच्या एक फर्लांग अंतरावरील परिसरात कोणताही प्राणी अडकल्यास त्याचा फोटो आपोआप कॅमेºयात टिपला जातो. या परिसरात रानहल्ले, रानडुक्कर, अस्वल, निलघोडे, सांबर, चितळ तसेच हरणाच्या कळपांचा वावर राहतो. उन्हाळ्याला सुरुवात होताच पाण्याच्या शोधात गावाकडे, शेताकडे धाव घेतात. शेतात लावलेल्या धानपिकाची हिरवळ व ऊस खावून तृष्णा भागवतात. मात्र अशातच शेतमालाचे मोठे नुकसान करतात. काही शेतकºयांना तर वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रासून रात्रभर शेतमालाची राखण करावी लागते.वन विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. जंगलाच्या चारही बाजूने काटेरी कुंपन केल्यास व पाण्यासाठी जंगलातच पाणवठे तयार केल्यास वन्य प्राणीही सुरक्षित राहतील व शेतमालाचे नुकसानही होणार नाही.