शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
4
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
5
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
6
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
7
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
8
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
9
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
10
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
11
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
12
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
13
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
14
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
15
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
16
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
17
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
18
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
19
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
20
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी ‘ऑन कॉल सर्विस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:28 IST

समाजाच्या मुख्यप्रवाहात दिव्यांगांनाही महत्त्वाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांच्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाने ‘आॅन कॉल सर्विस’हा उपक्रम सन २०१८-१९ या सत्रापासूनच सुरू केला. वर्षभर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील वर्षी ७६८ दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियानाचा उपक्रम : वर्षभरात ७६८ दिव्यांगांच्या मदतीसाठी धावले

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजाच्या मुख्यप्रवाहात दिव्यांगांनाही महत्त्वाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांच्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाने ‘आॅन कॉल सर्विस’हा उपक्रम सन २०१८-१९ या सत्रापासूनच सुरू केला. वर्षभर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील वर्षी ७६८ दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.सामान्य विद्यार्थ्यांसह दिव्यांग विद्यार्थीही शिक्षण घेतात. दिव्यांगांसाठी वेगळे शिक्षक नसल्याने त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकविलेली एखादी गोष्ट लक्षात येत नाही. त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब आली किंवा नाही हे त्या शिक्षकाच्या लक्षात सहज येते. ती गोष्ट त्या दिव्यांगाला पटावी व समजावी यासाठी समग्र शिक्षा अभियानतर्फे सन २०१८-१९ या सत्रापासून ‘आॅन कॉल सर्विस’ सुरू करण्यात आली. दिव्यांगांचे विषय शिकविणारे जिल्ह्यात ५८ शिक्षक आहेत. त्या ५८ शिक्षकांच्या माध्यमातून जिल्हाभर या विद्यार्थ्यांना शिकविण्यास मदत होते.एखाद्या शिक्षकाने दिव्यांग विद्यार्थ्याची समस्या ‘कॉल’ करून सांगितल्यास अवघ्या अर्ध्या तासात विद्यार्थ्यांपर्यंत दिव्यांगांचे विषय शिक्षक पोहचतात. जे शिक्षक त्या परिसरात जवळ असेल ते शिक्षक त्या ठिकाणी जाऊन त्या समस्येचे निराकरण करतात.जिल्हा समन्वयक स्वत: त्या ठिकाणी जाऊन समाधान करतात. समग्र शिक्षा अभियानाकडून दिव्यांगांना गरजेनुसार विविध साहित्य देण्यात येतात. जे दिव्यांग स्वत:च्या बळावर शाळेत येऊ शकत नाही त्यांना मदतनिस भत्ता व दिव्यांगांच्या गावात शाळा नसेल तर त्यांना प्रवास भत्ताही देण्यात येते.दिव्यांगांच्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी ‘आॅन कॉल सर्विस’ ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मुकाअ डॉ.राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनात ही सेवा अविरत सुरू आहे.७६८ दिव्यांगांचे केले समाधानसन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ७६८ दिव्यांगांना समस्या आल्या होत्या. त्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी समग्र शिक्षा अभियानातील दिव्यांग विभागाचे समन्वयक विजय ठोकणे व ५८ शिक्षकांनी तत्पर सेवा देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. जिल्हा समन्वयक ठोकणे यांनी ३४ ठिकाणच्या समस्यांचे निराकरण केले. ५८ शिक्षकांनी उर्वरीत दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी भेटी दिल्या. आमगाव तालुक्यातील ११५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १४, देवरी तालुक्यातील ११९, गोंदिया १०७, गोरेगाव ५९, सडक-अर्जुनी १६८, सालेकसा ६९, तिरोडा ११७ दिव्यांगांना सेवा देण्यात आल्या आहेत.दिव्यांग विद्यार्थ्यांना कसलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ‘आॅन कॉल सर्विस’ सुरू करण्यात आली. समस्या आल्यास अवघ्या अर्ध्या तासातच त्या समस्येचे निराकरण करण्यात येते.-विजय ठोकणे, समन्वयक, समग्र शिक्षा अभियान, जि.प.गोंदिया.