शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी ‘ऑन कॉल सर्विस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:28 IST

समाजाच्या मुख्यप्रवाहात दिव्यांगांनाही महत्त्वाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांच्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाने ‘आॅन कॉल सर्विस’हा उपक्रम सन २०१८-१९ या सत्रापासूनच सुरू केला. वर्षभर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील वर्षी ७६८ दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियानाचा उपक्रम : वर्षभरात ७६८ दिव्यांगांच्या मदतीसाठी धावले

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजाच्या मुख्यप्रवाहात दिव्यांगांनाही महत्त्वाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांच्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाने ‘आॅन कॉल सर्विस’हा उपक्रम सन २०१८-१९ या सत्रापासूनच सुरू केला. वर्षभर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील वर्षी ७६८ दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.सामान्य विद्यार्थ्यांसह दिव्यांग विद्यार्थीही शिक्षण घेतात. दिव्यांगांसाठी वेगळे शिक्षक नसल्याने त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकविलेली एखादी गोष्ट लक्षात येत नाही. त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब आली किंवा नाही हे त्या शिक्षकाच्या लक्षात सहज येते. ती गोष्ट त्या दिव्यांगाला पटावी व समजावी यासाठी समग्र शिक्षा अभियानतर्फे सन २०१८-१९ या सत्रापासून ‘आॅन कॉल सर्विस’ सुरू करण्यात आली. दिव्यांगांचे विषय शिकविणारे जिल्ह्यात ५८ शिक्षक आहेत. त्या ५८ शिक्षकांच्या माध्यमातून जिल्हाभर या विद्यार्थ्यांना शिकविण्यास मदत होते.एखाद्या शिक्षकाने दिव्यांग विद्यार्थ्याची समस्या ‘कॉल’ करून सांगितल्यास अवघ्या अर्ध्या तासात विद्यार्थ्यांपर्यंत दिव्यांगांचे विषय शिक्षक पोहचतात. जे शिक्षक त्या परिसरात जवळ असेल ते शिक्षक त्या ठिकाणी जाऊन त्या समस्येचे निराकरण करतात.जिल्हा समन्वयक स्वत: त्या ठिकाणी जाऊन समाधान करतात. समग्र शिक्षा अभियानाकडून दिव्यांगांना गरजेनुसार विविध साहित्य देण्यात येतात. जे दिव्यांग स्वत:च्या बळावर शाळेत येऊ शकत नाही त्यांना मदतनिस भत्ता व दिव्यांगांच्या गावात शाळा नसेल तर त्यांना प्रवास भत्ताही देण्यात येते.दिव्यांगांच्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी ‘आॅन कॉल सर्विस’ ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मुकाअ डॉ.राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनात ही सेवा अविरत सुरू आहे.७६८ दिव्यांगांचे केले समाधानसन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ७६८ दिव्यांगांना समस्या आल्या होत्या. त्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी समग्र शिक्षा अभियानातील दिव्यांग विभागाचे समन्वयक विजय ठोकणे व ५८ शिक्षकांनी तत्पर सेवा देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. जिल्हा समन्वयक ठोकणे यांनी ३४ ठिकाणच्या समस्यांचे निराकरण केले. ५८ शिक्षकांनी उर्वरीत दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी भेटी दिल्या. आमगाव तालुक्यातील ११५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १४, देवरी तालुक्यातील ११९, गोंदिया १०७, गोरेगाव ५९, सडक-अर्जुनी १६८, सालेकसा ६९, तिरोडा ११७ दिव्यांगांना सेवा देण्यात आल्या आहेत.दिव्यांग विद्यार्थ्यांना कसलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ‘आॅन कॉल सर्विस’ सुरू करण्यात आली. समस्या आल्यास अवघ्या अर्ध्या तासातच त्या समस्येचे निराकरण करण्यात येते.-विजय ठोकणे, समन्वयक, समग्र शिक्षा अभियान, जि.प.गोंदिया.