शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

बिरसी-गोंदिया मार्गावर व्यवसाय ठप्प

By admin | Updated: October 5, 2014 23:07 IST

बिरसी विमानतळावरून कारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदियात आगमन झाले. यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी रावणवाडी पासून ते गोदियापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानी

रावणवाडी : बिरसी विमानतळावरून कारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदियात आगमन झाले. यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी रावणवाडी पासून ते गोदियापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानी सकाळपासूनच बंद पाडल्या होत्या. यामुळे मात्र या मार्गावरील व्यावसायिकांचा अख्खा दिवसाचा व्यापार ठप्प पडला होता. पंतप्रधान मोदींचे खासगी विमानाने बिरसी विमानतळावर आगमन होणार होते. त्यानंतर तेथून कारने ते सभास्थळी जाऊन कारनेच परत विमानतळावर येऊन विमानाने निघून जाणार असा त्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानुसार पोलीस विभागाने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिरसी पासून गोंदिया पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यासाठी विभागाने शनिवारीच (दि.४) व्यवसायीकांना पत्र दिले होते. याशिवाय रावणवाडी येथे मुख्य चौकात जुळणारे बालाघाट, बिरसी व दासगाव हे तिन्ही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. एवढेच नव्हे तर राज्य परिवहन मंडळाच्या बसेसनाही प्रवासी निवाऱ्यापासून २०० मिटर अंतरावर थांबविले जात होते. त्यामुळे प्रवाशांनाही मंत्री महोदयांच्या दौऱ्याचा फटका सहन करावा लागला. तर आॅटो व काळीपिवळी प्रवासी वाहनांनाही या मार्गावरून वाहतूक बंद ठेवल्याने ही वाहने दिसून आली नाही.विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी येत असल्याने बांधकाम विभागाने याचा धसका घेत सकाळपासून बिरसी पासून ते गोदियापर्यंत रस्त्यावरील खड्यात टाकण्यात आलेले मुरूम काढून त्यावर डांबरीकरण करण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले. अचानक दिसून आलेल्या या परिवर्तनाबद्दल परिसरातील नागरिकांनी मात्र रोष व्यक्त केला. शिवाय बिरसी ते गोंदिया या दरम्यान सुमारे ५०० दुकानी असून मंत्र्यांच्या आगमन होत असल्यास पोलीस विभागाकडून या दुकानदारांना दुकानी बंद ठेवण्यात आदेश दिले जाते. यामुळे मात्र या गरीब व्यवसायीकांचा व्यवसाय मार खातो. अशात मंत्र्यांनी थेट बिरसी येथून हेलीकॉप्टरनेच गोंदियाला जावे. किमान यामुळे येथील व्यवसायीकांना फटका सहन करावा लागणार नाही अशा प्रतिक्रियाही येथील व्यावसायिकांनी व्यक्त केल्या. बिरसी विमानतळावर आतापर्यंत अनेक वेळा व्हीआयपी मंडळी येऊन गेली. मात्र पंतप्रधानांनी या विमानतळावर उतरण्याची आणि कारने गोंदियाला येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकताही दिसली. (वार्ताहर)