शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी-गोंदिया मार्गावर व्यवसाय ठप्प

By admin | Updated: October 5, 2014 23:07 IST

बिरसी विमानतळावरून कारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदियात आगमन झाले. यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी रावणवाडी पासून ते गोदियापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानी

रावणवाडी : बिरसी विमानतळावरून कारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदियात आगमन झाले. यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी रावणवाडी पासून ते गोदियापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानी सकाळपासूनच बंद पाडल्या होत्या. यामुळे मात्र या मार्गावरील व्यावसायिकांचा अख्खा दिवसाचा व्यापार ठप्प पडला होता. पंतप्रधान मोदींचे खासगी विमानाने बिरसी विमानतळावर आगमन होणार होते. त्यानंतर तेथून कारने ते सभास्थळी जाऊन कारनेच परत विमानतळावर येऊन विमानाने निघून जाणार असा त्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानुसार पोलीस विभागाने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिरसी पासून गोंदिया पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यासाठी विभागाने शनिवारीच (दि.४) व्यवसायीकांना पत्र दिले होते. याशिवाय रावणवाडी येथे मुख्य चौकात जुळणारे बालाघाट, बिरसी व दासगाव हे तिन्ही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. एवढेच नव्हे तर राज्य परिवहन मंडळाच्या बसेसनाही प्रवासी निवाऱ्यापासून २०० मिटर अंतरावर थांबविले जात होते. त्यामुळे प्रवाशांनाही मंत्री महोदयांच्या दौऱ्याचा फटका सहन करावा लागला. तर आॅटो व काळीपिवळी प्रवासी वाहनांनाही या मार्गावरून वाहतूक बंद ठेवल्याने ही वाहने दिसून आली नाही.विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी येत असल्याने बांधकाम विभागाने याचा धसका घेत सकाळपासून बिरसी पासून ते गोदियापर्यंत रस्त्यावरील खड्यात टाकण्यात आलेले मुरूम काढून त्यावर डांबरीकरण करण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले. अचानक दिसून आलेल्या या परिवर्तनाबद्दल परिसरातील नागरिकांनी मात्र रोष व्यक्त केला. शिवाय बिरसी ते गोंदिया या दरम्यान सुमारे ५०० दुकानी असून मंत्र्यांच्या आगमन होत असल्यास पोलीस विभागाकडून या दुकानदारांना दुकानी बंद ठेवण्यात आदेश दिले जाते. यामुळे मात्र या गरीब व्यवसायीकांचा व्यवसाय मार खातो. अशात मंत्र्यांनी थेट बिरसी येथून हेलीकॉप्टरनेच गोंदियाला जावे. किमान यामुळे येथील व्यवसायीकांना फटका सहन करावा लागणार नाही अशा प्रतिक्रियाही येथील व्यावसायिकांनी व्यक्त केल्या. बिरसी विमानतळावर आतापर्यंत अनेक वेळा व्हीआयपी मंडळी येऊन गेली. मात्र पंतप्रधानांनी या विमानतळावर उतरण्याची आणि कारने गोंदियाला येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकताही दिसली. (वार्ताहर)