शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला बाजारात सर्वाधिक वर्दळ; गर्दीत चालायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

गोंदिया : शहराचा भाजी बाजार असलेल्या परिसरासह येथील गांधी प्रतिमा चौक ते श्री टॉकीज रोडवरही दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी ...

गोंदिया : शहराचा भाजी बाजार असलेल्या परिसरासह येथील गांधी प्रतिमा चौक ते श्री टॉकीज रोडवरही दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने या रस्त्यावरून अनेकदा पायी देखील जाता येत नाही. या गर्दीमुळे कोरोनाची तिसरी लाट कशी रोखली जाणार आहे. शहरातील अरुंद रस्त्यावर चारचाकी वाहनांना अनेकदा प्रवेशबंदी करण्यात आली. परंतु या भागात काही लोकांचे वास्तव्य असल्याने त्यांना त्यांचे चारचाकी वाहन घरी नेण्यापासून कसे थांबविता येईल. म्हणून त्यांना चारचाकी नेण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर कोरोना काळातही गर्दीच दिसून येत आहे.

.............................

रोज १० हजार लोकांची ये-जा

गोंदियातील मुख्य बाजारात दररोज १० हजार लोक तालुक्याच्या ठिकाणातून येतात. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नागरिकदेखील साहित्य खरेदी करण्यासाठी गोंदियात येऊन गर्दी करतात.

....................

फूटपाथ कागदावरच

शहरात आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर फूटपाथच नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ असणे आवश्यक असताना येथील बाजारपेठेच्या रस्त्यावर फूटपाथच नसून ते फक्त कागदावरच आहे.

....................

अतिक्रमण हटावचा परिणामच होत नाही

शहरातील अनेक रस्त्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर पोलीस, जिल्हा वाहतूक शाखा व नगर परिषद राबविते. परंतु मोहीम आटोपताच पुन्हा अतिक्रमण केले जाते.

....................

गर्दीतही सुसाट वाहन

शहरातील मुख्य बाजार परिसरात असलेल्या गांधी प्रतिमा ते श्री टाॅकीज रोडवर गर्दी असली तरी शहरातील काही तरुण या रस्त्यावरून सुसाट वाहन हाकत असतात. परंतु त्यांच्यावर कारवाई होतानाचे चित्र दिसत नाही.

.................

पायी चालताना वाटते भीती

गर्दीतही सुसाट वाहन चालविले जात असल्याने गर्दीतून आपण मार्गक्रमण करतानाही जोरात वाहन चालविणारा तरुण कधी आपल्या अंगावर वाहन चढवेल ते सांगता येत नाही. म्हणून या रस्त्याने पायी-चालतानाही भीती वाटते.

....................

कोट

शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम आपण राबविलेली आहे. अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला जोमाने सुरुवात करू. अतिक्रमण करून विकासात अडचण आणू नये.

- करण चव्हाण,

मुख्याधिकारी, नगर परिषद गोंदिया