शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यामुळे बसफेऱ्या बंद

By admin | Updated: October 3, 2016 01:35 IST

तिरोडा तालुक्यातील अर्जुनी वरून ४ किमी असलेल्या वैनगंगा नदी काठावरील सावरा-पिपरीया या गावांपर्यंत तिरोडा आगाराची एसटी धावत होती.

सावरा पिपरीया मार्ग खड्ड्यात: विद्यार्थी व नागरिकांची अडचणइंदोरा-बुजरूक : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी वरून ४ किमी असलेल्या वैनगंगा नदी काठावरील सावरा-पिपरीया या गावांपर्यंत तिरोडा आगाराची एसटी धावत होती. परंतु हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने २७ सप्टेंबरपासून बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावामधील नागरिक व विद्यार्थी फार अडचणीत आले आहेत. अर्जुनीपासून सावरा पिपरिया या गावाचे ४ ते ५ किमीचे अंतर आहे. हा रस्ता सार्वजनिक विभागाचा डांबरीकरणाचा होता. जिल्हाधिकारी व उत्खनन विभाग पिपरीया नदी काठावरील रेतीचा लिलाव मागील उन्हाळ्यात केला. भरपावसाळ्यात या रस्त्यावरून रेती ठेकेदारांनी रेतीची वाहतूक केली. रेतीच्या ओव्हरलोड वाहनांमुळे पाच किमी चा रस्ता पूर्णत: खराब झाला. या रस्त्यावरून पायी चालणारा व्यक्ती बरोबर चालू शकत नाही. चार चाकी वाहन व दुचाकी वाहन चालणे कठीण आहे. या खराब रस्त्यावरूनच रेती वाहतूक सुरू ठेवली आहे. एसटी वाहक व चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. यात कधीही धोका होऊन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागू शकतो. यामुळे एसटी आगार तिरोडा यांनी २६ सप्टेंबरला ग्रामपंचायत पिपरीयाला रस्ता खराब संदर्भात पत्र देऊन २७ तारखेपासून दिवसातून एसटी होणाऱ्या ४ फेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे या भागातील प्रवाशी नागरिक व विद्यार्थी अडचणीमध्ये आले आहेत. तिरोडा ते अर्जुनी सावरा पिपरीया हा मार्ग रहदारीचा मार्ग आहे. पिपरीया ते अर्जुनी या गावापर्यंत लोकांची सतत ये जा असते. अर्जुनी हे गाव व्यापार व सर्व बाबतीत उपयुक्त ठिकाण आहे. शाळा, दुकान, औषधी, दवाखाने या सर्व कामासाठी नागरिकांना यावे लागते. परंतु रस्त्याअभावी या गावाशी संपर्कच तुटला आहे. रेतीच्या वाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. पूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून कोणतेही वाहन चालू शकत नाही. तरी पण रेती ठेकेदारांनी रेतीची वाहतूक बंद केली नाही. ग्रामपंचायतकडून रेती ठेकेदारांना सूचना दिल्या. परंतु आमचा रेती घाट ३० सप्टेंबरपर्यंत आहे. आम्ही रेती नेणारच असे सांगून ट्रक मधून रेतीची वाहतुक होत आहे. या रेती वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांना जीव मुठीत घेऊन ट्रक चालवावे लागत आहे. केव्हाही मोठा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाधिकारी गोंदिया व उत्खनन विभाग गोंदिया यांनी रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करून येथील प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात. बस फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी पिपरीया, सावरा, अर्जुनी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)