शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खराब रस्त्यामुळे बसफेऱ्या बंद

By admin | Updated: October 3, 2016 01:35 IST

तिरोडा तालुक्यातील अर्जुनी वरून ४ किमी असलेल्या वैनगंगा नदी काठावरील सावरा-पिपरीया या गावांपर्यंत तिरोडा आगाराची एसटी धावत होती.

सावरा पिपरीया मार्ग खड्ड्यात: विद्यार्थी व नागरिकांची अडचणइंदोरा-बुजरूक : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी वरून ४ किमी असलेल्या वैनगंगा नदी काठावरील सावरा-पिपरीया या गावांपर्यंत तिरोडा आगाराची एसटी धावत होती. परंतु हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने २७ सप्टेंबरपासून बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावामधील नागरिक व विद्यार्थी फार अडचणीत आले आहेत. अर्जुनीपासून सावरा पिपरिया या गावाचे ४ ते ५ किमीचे अंतर आहे. हा रस्ता सार्वजनिक विभागाचा डांबरीकरणाचा होता. जिल्हाधिकारी व उत्खनन विभाग पिपरीया नदी काठावरील रेतीचा लिलाव मागील उन्हाळ्यात केला. भरपावसाळ्यात या रस्त्यावरून रेती ठेकेदारांनी रेतीची वाहतूक केली. रेतीच्या ओव्हरलोड वाहनांमुळे पाच किमी चा रस्ता पूर्णत: खराब झाला. या रस्त्यावरून पायी चालणारा व्यक्ती बरोबर चालू शकत नाही. चार चाकी वाहन व दुचाकी वाहन चालणे कठीण आहे. या खराब रस्त्यावरूनच रेती वाहतूक सुरू ठेवली आहे. एसटी वाहक व चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. यात कधीही धोका होऊन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागू शकतो. यामुळे एसटी आगार तिरोडा यांनी २६ सप्टेंबरला ग्रामपंचायत पिपरीयाला रस्ता खराब संदर्भात पत्र देऊन २७ तारखेपासून दिवसातून एसटी होणाऱ्या ४ फेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे या भागातील प्रवाशी नागरिक व विद्यार्थी अडचणीमध्ये आले आहेत. तिरोडा ते अर्जुनी सावरा पिपरीया हा मार्ग रहदारीचा मार्ग आहे. पिपरीया ते अर्जुनी या गावापर्यंत लोकांची सतत ये जा असते. अर्जुनी हे गाव व्यापार व सर्व बाबतीत उपयुक्त ठिकाण आहे. शाळा, दुकान, औषधी, दवाखाने या सर्व कामासाठी नागरिकांना यावे लागते. परंतु रस्त्याअभावी या गावाशी संपर्कच तुटला आहे. रेतीच्या वाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. पूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून कोणतेही वाहन चालू शकत नाही. तरी पण रेती ठेकेदारांनी रेतीची वाहतूक बंद केली नाही. ग्रामपंचायतकडून रेती ठेकेदारांना सूचना दिल्या. परंतु आमचा रेती घाट ३० सप्टेंबरपर्यंत आहे. आम्ही रेती नेणारच असे सांगून ट्रक मधून रेतीची वाहतुक होत आहे. या रेती वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांना जीव मुठीत घेऊन ट्रक चालवावे लागत आहे. केव्हाही मोठा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाधिकारी गोंदिया व उत्खनन विभाग गोंदिया यांनी रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करून येथील प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात. बस फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी पिपरीया, सावरा, अर्जुनी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)