शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यामुळे बसफेऱ्या बंद

By admin | Updated: October 3, 2016 01:35 IST

तिरोडा तालुक्यातील अर्जुनी वरून ४ किमी असलेल्या वैनगंगा नदी काठावरील सावरा-पिपरीया या गावांपर्यंत तिरोडा आगाराची एसटी धावत होती.

सावरा पिपरीया मार्ग खड्ड्यात: विद्यार्थी व नागरिकांची अडचणइंदोरा-बुजरूक : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी वरून ४ किमी असलेल्या वैनगंगा नदी काठावरील सावरा-पिपरीया या गावांपर्यंत तिरोडा आगाराची एसटी धावत होती. परंतु हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने २७ सप्टेंबरपासून बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावामधील नागरिक व विद्यार्थी फार अडचणीत आले आहेत. अर्जुनीपासून सावरा पिपरिया या गावाचे ४ ते ५ किमीचे अंतर आहे. हा रस्ता सार्वजनिक विभागाचा डांबरीकरणाचा होता. जिल्हाधिकारी व उत्खनन विभाग पिपरीया नदी काठावरील रेतीचा लिलाव मागील उन्हाळ्यात केला. भरपावसाळ्यात या रस्त्यावरून रेती ठेकेदारांनी रेतीची वाहतूक केली. रेतीच्या ओव्हरलोड वाहनांमुळे पाच किमी चा रस्ता पूर्णत: खराब झाला. या रस्त्यावरून पायी चालणारा व्यक्ती बरोबर चालू शकत नाही. चार चाकी वाहन व दुचाकी वाहन चालणे कठीण आहे. या खराब रस्त्यावरूनच रेती वाहतूक सुरू ठेवली आहे. एसटी वाहक व चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. यात कधीही धोका होऊन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागू शकतो. यामुळे एसटी आगार तिरोडा यांनी २६ सप्टेंबरला ग्रामपंचायत पिपरीयाला रस्ता खराब संदर्भात पत्र देऊन २७ तारखेपासून दिवसातून एसटी होणाऱ्या ४ फेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे या भागातील प्रवाशी नागरिक व विद्यार्थी अडचणीमध्ये आले आहेत. तिरोडा ते अर्जुनी सावरा पिपरीया हा मार्ग रहदारीचा मार्ग आहे. पिपरीया ते अर्जुनी या गावापर्यंत लोकांची सतत ये जा असते. अर्जुनी हे गाव व्यापार व सर्व बाबतीत उपयुक्त ठिकाण आहे. शाळा, दुकान, औषधी, दवाखाने या सर्व कामासाठी नागरिकांना यावे लागते. परंतु रस्त्याअभावी या गावाशी संपर्कच तुटला आहे. रेतीच्या वाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. पूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून कोणतेही वाहन चालू शकत नाही. तरी पण रेती ठेकेदारांनी रेतीची वाहतूक बंद केली नाही. ग्रामपंचायतकडून रेती ठेकेदारांना सूचना दिल्या. परंतु आमचा रेती घाट ३० सप्टेंबरपर्यंत आहे. आम्ही रेती नेणारच असे सांगून ट्रक मधून रेतीची वाहतुक होत आहे. या रेती वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांना जीव मुठीत घेऊन ट्रक चालवावे लागत आहे. केव्हाही मोठा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाधिकारी गोंदिया व उत्खनन विभाग गोंदिया यांनी रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करून येथील प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात. बस फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी पिपरीया, सावरा, अर्जुनी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)