शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

रस्त्याअभावी बसफेऱ्या बंद

By admin | Updated: October 5, 2016 01:28 IST

तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया हा पाच किमीचा रस्ता पूर्णत: रेती वाहतुकीमुळे खराब झाला आहे.

रस्त्यासाठी निधी द्या : कैलास पटले यांची मागणीइंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया हा पाच किमीचा रस्ता पूर्णत: रेती वाहतुकीमुळे खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालणे कठीण झाले असून एसटीच्या बसफेऱ्यासुध्दा बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व उत्खनन विभाग यांनी निधी उपलब्ध करून त्वरित रस्ता दुरूस्त करावी, अशी मागणी क्षेत्रातील नागरिकांसह जि.प. सदस्य कैलास पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. अर्जुनी टंकीटोलीपासून पिपरीया नदीघाटापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा पाच ते सहा किमीचा डांबरीकरण रस्ता चांगला होता. या रस्त्यावरून तिरोडा ते सावरा-पिपरीया एसटीच्या दिवसातून चार बसफेऱ्या व मानव विकासच्या दोन बस फेऱ्या सुरू होत्या. सदर रस्ता महाराष्ट्र ते मध्यप्रदेशच्या सीमेला वैनगंगा नदीकाठावरील पिपरीया या गावाशी जोडला आहे. त्यामुळे या भागात नागरिकांची दररोज ये-जा जास्त असून मुख्यत: अर्जुनी या गावांशी जास्त संपर्क आहे. मागील उन्हाळ्यापासून पूर्ण पावसाळ्यापर्यंत रेती कंत्राटदारांनी वैनगंगा नदी काठावरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस सुरू ठेवली. यात डांबरीकरणाचा रस्ता पूर्णत: खराब झाला व मोठमोठे खड्डे पडले. या संदर्भात मागील दोन महिन्यांपूर्वी संबंधित विभागाला व जिल्हाधिकारीऱ्यांना पत्राद्वारे रस्ता दुरूस्ती व रेती वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु याकडे सदर विभागाने मुळीच लक्ष दिले नाही. आज या रस्त्यावरील सर्व वाहतूक म्हणजे एसटी बसेस बंद केल्या आहेत. अर्जुनी गावाजवळील शाळेच्या समोरील व सुभाष तिडके यांच्या घरासमोरील रस्त्यावर रेती कंत्राटदारांनी रस्त्याच्या खड्ड्यांत दगड व मुरुम घातले होते. परंतु रेतीच्या ट्रकमुळे व सततच्या पावसाने तिथे आणखी मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यात अनेक दुचाकी वाहन चालक पडले व गंभीर जखमीसुध्दा झाले आहेत. अर्जुनीच्या रस्त्याच्या शेवटच्या घरापासून तर पिपरीयापर्यंतचा पूर्ण रस्ता खड्ड्यांनी चिखलांचा झाला आहे. येथून पायी चालणे कठीण झाले तर वाहन कसे चालवावे, हेच कळत नाही. रेतीघाटामुळे शासनाला लाखोचा निधी मिळाला. परंतु येथील नागरिकांचे बेहाल झाले आहेत. लोकांना चिखलातून मार्ग शोधावे लागत आहे. विद्यार्थी व नागरिकांची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सदर गावांना भेट देऊन येथील समस्या जाणून घ्यावी व अर्जुनी ते पिपरीया हा रस्ता दुरूस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून रस्ता दुरूस्त करावे व पूर्ववत बसफेऱ्या व वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जि.प. सदस्य व सरपंच अर्जुनी, सावरा, पिपरीया यांनी केली आहे. (वार्ताहर)