शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षांचे ओझे पेलावे लागणार

By admin | Updated: December 8, 2014 22:37 IST

नाही-हो करता करता आणि सर्व कटुता बाजुला सारत अखेर राज्यात सत्तेच्या सारीपाटावर भाजप-सेना युतीचे सरकार पुन्हा एकदा विराजमान झाले. सलग दुसऱ्यांदा आमदारकी पटकावणाऱ्या राजकुमार बडोले

मनोज ताजने - गोंदियानाही-हो करता करता आणि सर्व कटुता बाजुला सारत अखेर राज्यात सत्तेच्या सारीपाटावर भाजप-सेना युतीचे सरकार पुन्हा एकदा विराजमान झाले. सलग दुसऱ्यांदा आमदारकी पटकावणाऱ्या राजकुमार बडोले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी आसुसलेल्या गोंदियाला त्यांच्या रूपाने लाल दिवा मिळाला. आता या लाल दिव्याच्या झगमगाटात संपूर्ण जिल्हा न्हाऊन निघणार असला तरी जिल्हावासियांच्या अपेक्षांचे ओझेही ना.बडोले यांना पेलावे लागणार आहे.वास्तविक अवघ्या साडेपाच वर्षात एक शाखा अभियंता ते कॅबिनेट मंत्री हा बडोले यांचा प्रवास अनेकांचे डोळे दीपवणारा आहे. पक्षीय विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांचाच त्यांना आतापर्यंत जास्त त्रास झाला. पण आपला नम्र स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती यामुळे त्यांनी लोकांसोबत पक्षश्रेष्ठींचेही मन जिंकले. विधानसभेत गेल्या पाच वर्षात कित्येक प्रश्नांचा पाठपुरावा करून त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीचा परिचय दिला. यावेळच्या निवडणुकीत विजयी झालेले गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या नवख्या आमदारांमध्ये केवळ बडोले हे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यामुळे प्रादेशिक समतोल, गेल्या पाच वर्षातील त्यांच्या कामाचे भाजपच्या वरिष्ठांनी केलेले मूल्यमापन, आणि मागास समाजाला प्रतिनिधीत्व या निकषांवर बडोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले ही गोंदिया जिल्ह्यासाठी निश्चितच समाधानाची बाब आहे. खासदार नाना पटोले पटोले यांना आता आमदारकी सोडून खासदारकीची निवडणूक लढण्याचा निश्चितच पश्चाताप होत असणार. १५ दिवसांपूर्वीच त्यांनी गोंदियात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना आपण कोणता ‘त्याग’ केला हे आपल्यालाच माहीत, अशा शब्दात आपली व्यथा बोलून दाखविली होती. गेल्या २०-२५ वर्षांपासून राजकारणात असलेल्या पटोले यांना जे मिळाले नाही ते बडोले यांना अवघ्या साडेपाच वर्षात मिळाले. या सर्व नशिबाच्या गोष्टी आहेत. पण आता या संधीचे बडोले यांनी सोने करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात धान उत्पादकांना कठीण परिस्थितीतून वाटचाल करावी लागत आहे. तलावांचा जिल्हा अशी ओळख असतानाही गावोगावच्या मामा तलावांचे पाणी शेतीला मिळत नाही. त्यांची दुरूस्ती, गाव काढण्यासाठी निधीची गरज आहे. पर्यटन विकासातून रोजगार निर्मितीला भरपूर वाव आहे. वनौपजावर आधारित छोट्या उद्योगांची उभारणी होऊ शकते. आदिवासीबहुल भागासह मागासवर्गीयांच्या अनेक योजनाही पुरेशा निधीअभावी रखडल्या आहेत, आता सामाजिक न्याय खाते मिळाले असल्यामुळे जिल्ह्याला न्याय देण्यासाठी ना.बडोले निश्चितच पुढाकार घेतील असाही जिल्हावासीयांचा विश्वास आहे. हा विश्वास त्यांनी कायम ठेवावा एवढीच अपेक्षा आहे.