शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

पाठीवरचे ओझे कायमच!

By admin | Updated: August 2, 2015 01:55 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील जड पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

शाळांना मौखिक आदेश : अंमलबजावणी मात्र शून्यगोंदिया : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील जड पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शिक्षण विभागाने तसा मौखिक आदेशही अधिकाऱ्यांना दिला. पण प्रत्यक्षात कोणताही लेखी आदेश शिक्षण विभाग किंवा शाळांपर्यंत अद्याप पोहोचला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे अजूनही कायम आहे. न पेलवणाऱ्या दफ्तरांच्या या ओझ्याने विद्यार्थ्यांची वाढ खुंटत आहे.दोन महिन्यांपूर्वी शिक्षण संचालक महावीर माने यांनी नागपूर येथे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन दप्तराचे ओझे कमी कसे करता येईल यासाठी उपस्थितांची मते जाणून घेतली. या कार्यशाळेला विस्तार अधिकारी, निवडक गटशिक्षणाधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक संघटनांचे व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनाही पाचारण केले होते. या सभेचा एकच निष्कर्ष निघाला, दप्तराचे वजन बालकाच्या वजनाच्या १० टक्केपेक्षा जास्त नसावे. तालुकास्तरावर बैठका घेऊन मुख्याध्यापकांना याबाबतची सूचना सांगण्याचे निर्देश त्यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यात कार्यशाळा घेण्यात आल्या. या बैठकीत मुख्याध्यापकांकडून बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. जि.प. शाळातील विद्यार्थ्यांचे ओझे जास्त नाही. सीबीएसई, आयबी बोर्ड व इंग्रजीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्याना पुस्तकांचे ओझे अधिक असते. त्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चित्रकला पुस्तक, योगा, मोठा कंपास, करसिव्ह रायटींगच्या अशी वेगवेगळी पुस्तके व वह्या असतात. सोबतच पाण्याची बॉटलही आणावी लागते. परंतु जि.प. शाळातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमीच असते असा सूर मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. त्यानंतर शासनाकडून याबाबत अधिकृत पत्र ेयेणे अपेक्षित होते, मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये किंवा खासगी शाळांमध्येही शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कसलेही पत्र अद्याप पाठविले नाही. (तालुका प्रतिनिधी)तीन विषयांचे एक पुस्तकविद्यार्थ्याच्या पाठीवरची ओझे कमी करण्यासाठी शासनाने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तीन पुस्तकांचे एक पुस्तक तयार केले. भूगोल, इतिहास व नागरिकशास्त्र या तीन विषयाचे ‘परिसर अभ्यास’ नावाने एक पुस्तक तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या तीन विषयाचे एक पुस्तक म्हणजे ‘सामान्य विज्ञान’ तयार करून विद्यार्थ्यांच्या हाती दिले. पण एवढ्याने दफ्तराचे ओझे फारसे कमी झालेले नाही. शाळेतच काही पुस्तके ठेवण्याची व्यवस्था केल्यास हे ओझे कमी होऊ शकते. पण कोणत्याही शाळेने तशी व्यवस्था केलेली नाही.