शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बंगला, गाडीवाले आयुष्यमानच्या रांगेत, खरे गरजू दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST

अंकुश गुंडावार गोंदिया : गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने आयुष्यमान भारत योजना सुरू ...

अंकुश गुंडावार

गोंदिया : गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने आयुष्यमान भारत योजना सुरू केली, पण या योजनेचा लाभ बंगाल, गाडी असणारे आणि गर्भश्रीमंत घेत असल्याची धक्कादायक बाब जिल्ह्यात पुढे आली आहे, तर गरजू लाभार्थी अद्यापही या योजनेपासून दूरच असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

आयुष्यमान भारत योजनेकरिता सन २०१८ मध्ये नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वेक्षण करून यादी तयार करण्यात आली. त्यानंतर, ही यादी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली. या योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पंतप्रधानाचे पत्र पाठविण्यात आले. त्यानंतर, यादीत ज्यांच्या नावाचा समावेश आहे, त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयुष्यमान भारतच्या केंद्रावरून कार्ड तयार करून दिले जात आहे. हे कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना ५ लाख रुपयापर्यंतची शस्त्रक्रिया, तसेच उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ही योजना गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खरोखरच जीवनदायी आहे. गोंदिया जिल्ह्यात योजनेकरिता ६ लाख १,२०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८५ हजार नागरिकांचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड तयार करण्यात आले आहे, पण इतर शासकीय योजनांप्रमाणेच या योजनेलाही गालबोट लागले आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी पाठविताना, त्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले आणि गर्भश्रीमतांचीही नावे पाठविण्यात आली, तर अनेक गरजू लाभार्थ्यांच्या नावांचा समावेशच करण्यात आला नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून खरे गरजू लाभार्थी अजूनही वंचित आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत असलेली नावे पाहून आरोग्य विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकीत झाले. बंगला, गाडी, आणि गर्भश्रीमंत या योजनेच्या रांगेत असल्याचे चित्र आहे, शिवाय ते कार्ड तयार करून, या योजनेचा पुरेपूर लाभ घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक यंत्रणांनी पाठविलेल्या याद्यांची एकदा चाळणी करून, योग्य लाभार्थ्यांचा यात समावेश करण्याची गरज आहे.

................

२,४०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ

केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आतापर्यंत जिल्ह्यातील २,४०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेमुळे गोरगरीब रुग्णांना चांगल्या रुग्णालयात उपचार, तसेच महागड्या शस्त्रक्रिया करणेही शक्य झाले आहे.

.............

जिल्ह्यातील १२ रुग्णालयांचा समावेश

आयुष्यमान भारत योजनेत जिल्ह्यातील १२ रुग्णालयांचा समावेश आहे. सहा शासकीय रुग्णालयांत केटीएस, बीजीडब्ल्यू, तिरोडा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय, तर खासगी रुग्णालयांमध्ये बाहेकार हॉस्पिटल, ब्राह्मणकर हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल, न्यू गोंदिया हॉस्पिटल आणि रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटलचा समावेश आहे.

........

कोण घेऊ शकतो योजनेचा लाभ

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ ज्यांना पंतप्रधानांचे पत्र आले आहे, ज्यांचे नाव यादीत आहे, तसेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणारे या योजनेच्या यादीत समाविष्ट असणारेच याचा लाभ घेऊ शकतात.

.......

कोट

आयुष्यमान भारत विमा योजनेंतर्गत नियमित रोगनिदान व माेफत शस्त्रक्रिया केल्या जातात. पैशाअभावी गोरगरीब नागरिक आरोग्यविषयक सोईसुविधांपासून वंचित राहू नये, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या योजनेंतर्गत कार्ड तयार करून लाभ घ्यावा.

- डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक.

..................

आयुष्यमान योजनेचे जिल्ह्यातील एकूण लाभार्थी : ६ लाख १ हजार २००

योजनेचे कार्ड तयार झालेले एकूण लाभार्थी : १ लाख ८५ हजार

या योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी : २,४००

कार्ड तयार होणे शिल्लक असलेले लाभार्थी : ४ लाख १६ हजार २००