शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बंगला, गाडीवाले आयुष्यमानच्या रांगेत, खरे गरजू दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST

अंकुश गुंडावार गोंदिया : गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने आयुष्यमान भारत योजना सुरू ...

अंकुश गुंडावार

गोंदिया : गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने आयुष्यमान भारत योजना सुरू केली, पण या योजनेचा लाभ बंगाल, गाडी असणारे आणि गर्भश्रीमंत घेत असल्याची धक्कादायक बाब जिल्ह्यात पुढे आली आहे, तर गरजू लाभार्थी अद्यापही या योजनेपासून दूरच असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

आयुष्यमान भारत योजनेकरिता सन २०१८ मध्ये नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वेक्षण करून यादी तयार करण्यात आली. त्यानंतर, ही यादी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली. या योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पंतप्रधानाचे पत्र पाठविण्यात आले. त्यानंतर, यादीत ज्यांच्या नावाचा समावेश आहे, त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयुष्यमान भारतच्या केंद्रावरून कार्ड तयार करून दिले जात आहे. हे कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना ५ लाख रुपयापर्यंतची शस्त्रक्रिया, तसेच उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ही योजना गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खरोखरच जीवनदायी आहे. गोंदिया जिल्ह्यात योजनेकरिता ६ लाख १,२०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८५ हजार नागरिकांचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड तयार करण्यात आले आहे, पण इतर शासकीय योजनांप्रमाणेच या योजनेलाही गालबोट लागले आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी पाठविताना, त्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले आणि गर्भश्रीमतांचीही नावे पाठविण्यात आली, तर अनेक गरजू लाभार्थ्यांच्या नावांचा समावेशच करण्यात आला नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून खरे गरजू लाभार्थी अजूनही वंचित आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत असलेली नावे पाहून आरोग्य विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकीत झाले. बंगला, गाडी, आणि गर्भश्रीमंत या योजनेच्या रांगेत असल्याचे चित्र आहे, शिवाय ते कार्ड तयार करून, या योजनेचा पुरेपूर लाभ घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक यंत्रणांनी पाठविलेल्या याद्यांची एकदा चाळणी करून, योग्य लाभार्थ्यांचा यात समावेश करण्याची गरज आहे.

................

२,४०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ

केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आतापर्यंत जिल्ह्यातील २,४०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेमुळे गोरगरीब रुग्णांना चांगल्या रुग्णालयात उपचार, तसेच महागड्या शस्त्रक्रिया करणेही शक्य झाले आहे.

.............

जिल्ह्यातील १२ रुग्णालयांचा समावेश

आयुष्यमान भारत योजनेत जिल्ह्यातील १२ रुग्णालयांचा समावेश आहे. सहा शासकीय रुग्णालयांत केटीएस, बीजीडब्ल्यू, तिरोडा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय, तर खासगी रुग्णालयांमध्ये बाहेकार हॉस्पिटल, ब्राह्मणकर हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल, न्यू गोंदिया हॉस्पिटल आणि रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटलचा समावेश आहे.

........

कोण घेऊ शकतो योजनेचा लाभ

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ ज्यांना पंतप्रधानांचे पत्र आले आहे, ज्यांचे नाव यादीत आहे, तसेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणारे या योजनेच्या यादीत समाविष्ट असणारेच याचा लाभ घेऊ शकतात.

.......

कोट

आयुष्यमान भारत विमा योजनेंतर्गत नियमित रोगनिदान व माेफत शस्त्रक्रिया केल्या जातात. पैशाअभावी गोरगरीब नागरिक आरोग्यविषयक सोईसुविधांपासून वंचित राहू नये, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या योजनेंतर्गत कार्ड तयार करून लाभ घ्यावा.

- डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक.

..................

आयुष्यमान योजनेचे जिल्ह्यातील एकूण लाभार्थी : ६ लाख १ हजार २००

योजनेचे कार्ड तयार झालेले एकूण लाभार्थी : १ लाख ८५ हजार

या योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी : २,४००

कार्ड तयार होणे शिल्लक असलेले लाभार्थी : ४ लाख १६ हजार २००