शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

वीज कंपनीच्या अभियंत्यांना ग्राहक मंचचा दणका

By admin | Updated: September 14, 2014 00:01 IST

सदोष वीज मीटर लाऊन ग्राहकाला मानसिक व आर्थिक त्रास देऊन तसेच तक्रार दिल्यावर त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने विद्युत मंडळाच्या दोन अभियंत्यांवर

गोंदिया : सदोष वीज मीटर लाऊन ग्राहकाला मानसिक व आर्थिक त्रास देऊन तसेच तक्रार दिल्यावर त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने विद्युत मंडळाच्या दोन अभियंत्यांवर एकतर्फी प्रकरण चालविले. या प्रकरणात न्यायमंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या बाजूने निर्णय सुनावून दोन्ही अभियंत्यांना चांगलाच दणका दिला आहे. निर्णयात न्यायमंचने तक्रारकर्त्याला मानसिक त्रासापोटी तीन हजार रूपये तर खर्चापोटी दोन हजार रूपये देण्याचे आदेश दिला आहे. सविस्तर असे की, तक्रारकर्ता सुजीत भुरणदास बोरकर (रा.माताटोली) यांनी वीज पुरवठा मिळावा यासाठी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमीटेड कडे १८ फेब्रुवारी २०१२ रोजी अर्ज केला होता. त्यावर वीज मंडळाकडून २४ जुलै रोजी वीज मीटर देण्यात आले व २७ सप्टेंबर रोजी हे मीटर लावण्यात आले. या मीटर मध्ये १४६८० युनिट दाखवित होते व पहिले बिल ४९ युनिटसाठी २६२ रूपये देण्या ऐवजी ७१० व्याजासह सोडून देण्यात आले. या बिल मध्ये दुसऱ्या व्यक्तीचे थकित बिल १८ हजार ६४६.२३ रूपये व त्यावरील व्याज तक्रारकर्त्याला देण्यात आलेल्या मीटरच्या बिलात बेकायदेशीररित्या जोडण्यात आले. विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून तक्रारकर्त्याने ७१० रूपयांचे बिल २३ नोव्हेंबर रोजी भरले. मात्र १ नोव्हेंबर रोजी तक्रारकर्त्याने दोषपूर्ण मीटर बदलून देण्यासाठी विद्युत मंडळाकडे अर्ज व तोंडी विनंतीही केली. मात्र विद्युत मंडळाकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही उलट दुसऱ्याचे बिल त्यांच्या नावावर पाठविणे सुरूच ठेवले. यावर तक्रारकर्ता बोरकर यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली असता मंचाने २२ एप्रिल २०१३ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार ग्राहक मंचकडून विद्युत मंडळाला नोटीस बजावण्यात आले असता त्यांच्याकडून कुणी हजर नाही व लेखी जबाब सुद्धा देण्यात आला नाही. यावर मंचने वीज मंडळाच्या अभियंता ज्योती चहांदे व वैभव गुप्ता यांच्यावर एकतर्फी प्रकरण चालविण्याचे आदेश २५ फेब्रुवारी रोजी काढले. नियमानुसार विद्युत मंडळाने बोरकर यांचा अर्ज प्राप्त होताच मीटरची तपासणी करून त्यात दोष आढळल्यास मीटर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्याप्रमाणे कारवाई करणे गरजेचे होते. मात्र ही कारवाई करण्यात आली नाही. तसेच लावण्यात आलेल्या युनिटच्या दरांबद्दल अहवाल सुद्धा देण्यात आला नाही. हा प्रकार सेवेतील त्रुटी असल्याचे मत न्यायमंच मांडले. त्यानुसार, विद्युत मंडळाच्या दोन्ही अभियंत्यांना तक्रारकर्ता बोरकर यांना त्वरीत दोष रहीत वीज मीटर लावून देणे, मागील सर्व देयके समायोजित करून सुधारीत देयक देणे, मानसिक त्रासापोटी तीन हजार रूपये व खर्चापोटी दोन हजार रूपये बोरकर यांना देण्याचे आदेश ग्राहक मंचने सुनावले. एवढेच नव्हे तर आदेशाची प्रत मिळाल्याच्या ३० दिवसांच्या आत पालन करण्याचेही आदेश दिले आहे. (शहर प्रतिनिधी)