शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी येथील अतिक्रमणावर चालला बुलडोझर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत येणारे अतिक्रमण बुधवारी (दि. २४) बुलडोझर लावून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत येणारे अतिक्रमण बुधवारी (दि. २४) बुलडोझर लावून काढण्यात आले. येथील प्रकल्पग्रस्त १०६ कुटुंबांचे पुनर्वसन न करताच हे अतिक्रमण हटविल्याने या कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेला येथील नागरिकांनी विरोध केला. यामुळे काहीकाळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

बिरसी येथे बिरसी विमानतळ प्रशासनाने बुधवारी सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्तात बुलडोझर लावूृन अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. बिरसी विमानतळ प्राधिकरणाने कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता, अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. अतिक्रमणधारकांनी बुलडोझरपुढे झोपूृन अतिक्रमण तोडण्याला विरोध केला. त्यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. येथील अतिक्रमण हटविल्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबांचा वाली कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे गेल्या १० वर्षांपासून पुनर्वसनाची वाट बघणारी १०६ कुटुंब बिरसी विमानतळासमोर धरणे आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे बिरसी विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत बुलडोझर लावून अतिक्रमण हटवले. त्यामुळे या कुटुंबांसमोर मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमण काढल्यामुळे जे परिवार बेघर झाले आहेत ते गेल्या २० ते २५ वर्षांपासून या जागेवर राहात होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे या नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात मोठा रोष आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान एकाही लोकप्रतिनिधीने उपस्थित राहून ही मोहीम थांबवली नाही. याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

......

काही कुटुंबांनी घेतला ग्रामपंचायतीमध्ये आसरा

बुधवारी बिरसी येथील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर येथील बेघर झालेल्या २५ ते ३० कुटुंबांनी ग्रामपंचायतीमध्ये तात्पुरता आसरा घेतला तर काही कुटुंबांना कुठलाही आधार नसल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेलाच आसरा घेतला आहे. बेघर झालेल्या या कुटुंबांच्या आसऱ्याची जिल्हा प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

.....

निधी उपलब्ध असूनही पुनर्वसन नाही

बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने गोंदिया उपविभागीय कार्यालयाकडे निधी जमा केला. त्याला आता पाच ते सहा वर्षांचा कालावधी झाला. मात्र, अद्यापही या निधीचे वितरण करुन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.