शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पाणीटंचाईमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: May 15, 2014 01:28 IST

तीव्र उन्हाळ्याच्या पूर्वीच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच जलस्त्रोत आटल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत सापडले आहे

गोंदिया : तीव्र उन्हाळ्याच्या पूर्वीच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच जलस्त्रोत आटल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे या व्यवसायावर आता मंदीचे सावट पसरले आहे. उपजीविकेसाठी बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कामगारांना मोठय़ा प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी सिमेंट कंपन्यांच्या मनमानीमुळे सिमेंटच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात लोखंड, स्टील आणि सिमेंटच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय कंपन्यांनीही दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा घर व फ्लॅट्सच्या किमतीत वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी पाणी टंचाईमुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम जाणवतोच. परंतु यंदा पाणी टंचाईला महागाईची जोड मिळाल्याने बांधकाम व्यवसायावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.बांधकाम व्यवसायातील या मंदीचा फटका यावरच दैनंदिन जीवन अवलंबून असलेल्या कामगारांवर बसला आहे. अनेक मजुरांना काम मिळणेही कठीण झाले आहे. बांधकाम साहित्यांच्या किमतीती सतत होणार्‍या वाढीमुळे प्लॅट्सच्या किमती १५ ते २0 टक्क्यांनी वाढल्या आहेत.शहरातील चौकाचौकात ठिय्या मांडून बसलेल्या कामगारांची उन्हाळ्याच्या दिवसात कामाअभावी मोठीच थट्टा होत आहे. जेथे प्यायलाच पाणी मिळत नाही, तेथे बांधकामासाठी पाणी कुठून पुरणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात निदान दोन महिने तरी बांधकाम बंदच ठेवावे लागते. त्यातच आता लोखंड महाग झाल्याने बांधकामावर परिणाम झाला आहे. त्यामुळे एक महिन्यापासून दररोज कामगार तासनतास कामाच्या शोधात ठिय्या मांडून असलेले आढळतात. सकाळी ८ वाजता आलेल्या मजुरांना दुपारच्या दोन वाजतापर्यंतसुद्धा काम मिळेणासे झाले आहे. त्यामुळे साफसफाई व हमाली यासारख्या कामांचा या मजुरांनी आधार घेतल्याचे दिसून येत आहे.बांधकामावर २00 ते २५0 रूपये दिवस मजुरी मिळविणारे हे कामगार आता ५0 व १00 रूपये रोजीवर समाधान मिळवायला तयार आहेत. पाण्याअभावी व इतर कारणांमुळे शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या इमारतींचे बांधकाम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहेत. काही कामगार तर दुपारचे २ वाजले तरी हाती काम न मिळाल्याने रिकाम्या हातानेच परततात. या प्रकाराने मजुरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)