शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बीएसएनएलची सेवा अनियमित

By admin | Updated: July 2, 2015 01:51 IST

दुरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून कार्य करणाऱ्या बीएसएनएल कंपनीच्या सेवेला विविध प्लॅनमुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

नागरिकांना मनस्ताप : शासकीय सेवेचा ग्राहकांना बसतोय फटकाआमगाव : दुरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून कार्य करणाऱ्या बीएसएनएल कंपनीच्या सेवेला विविध प्लॅनमुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ही सेवा व्यवस्थित व नियमित मिळत नाही. मोबाईल सेवेत अनेक अडथळे येत असून इंटरनेट सेवेची गतीसुद्धा मंदावली आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळेच आमगावच्या बीएसएनएल सेवेत अनियमितता असल्याचे बोलले जात आहे.दुरसंचार क्षेत्रात मोठे संशोधन झाल्याने दिवसेंदिवस ही सेवा अपडेट होत आहे. या क्षेत्रांमध्ये बीएसएनएलसोबत अनेक खासगी कंपन्यादेखील काम करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे बीएसएनएलसह खासगी कंपन्यादेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करीत आहेत. मोबाईलच्या पूर्वी लँडलाईन सुविधा फक्त बीएसएनएल कंपनीकडेच होती. त्यामुळे साहजिकच या कंपनीकडे मोठा ग्राहक वर्ग जुळला गेला. त्याचप्रमाणे बीएसएनएल कंपनी ही शासकीय कंपनी असल्याने विश्वासनिय व आपुलकी म्हणून ग्राहकांची ओढ या कंपनीकडे जास्त होती. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यात बीएसएनएल कंपनीच्या ग्राहकांची संख्या अधिक आहे.आजच्या आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेट अत्यावश्यक सेवा झाल्या आहेत. गरजेमुळे या क्षेत्रातील विविध कंपन्यात मोठी स्पर्धा सुरु आहे. जास्तीतजास्त ग्राहक आपल्या कंपनीकडे यावे यासाठी खासगी कंपन्याकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयी-सुविधा व सवलती देण्यात येत आहे.या तुलनेत बीएसएनएलच्या ग्राहकांना सोयी व सुविधा अपुऱ्या पडत असल्याने दिवसेंदिवस ग्राहक संख्या रोडावत चालल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक गावात अजूनही बीएसएनएल मोबाईलचे ‘कव्हरेज’ व्यवस्थित मिळत नाही. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवासुद्धा व्यवस्थित मिळत नाही. अनेकदा इंटरनेट जोळणी झाल्यानंतर वारंवार बंद पडते. इंटरनेटची गतीसुद्धा इतर कंपन्याच्या तुलनेत कमी आहे. लँडलाईन सेवादेखील वारंवार खंडित होत असते. अशा प्रकाराबाबत ग्राहकांनी संबंधित कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीची दखल घेतल्या जात नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक ग्राहकांनी बीएसएनएलकडे आॅनलाईन तक्रारीसुद्धा केल्या. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत अपेक्षित कार्यवाही केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडूनच अभय देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)