शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

बीएसएनएलचे अद्याप २२ कनेक्शन कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू असून वीज बिलाची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. वीज कापल्यावर बीएसएनएलकडून पैसे भरले जाते व काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी लागते. हाच प्रकार आता पुन्हा एकदा घडून आला आहे.

ठळक मुद्देसहा कनेक्शन जोडले : ३८.६८ लाखांची थकबाकी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज बिलाची थकबाकी न भरल्याचा फटका म्हणून वीज वितरण कंपनीने बीएसएनएलचे कनेक्शन कापले आहेत. मंगळवारी (दि.१०) अर्जुनी-मोरगाव येथील चार व तिरोडा येथील दोन कनेक्शनचे पैसे भरण्यात आल्याने सहा कनेक्शन जोडण्यात आले होते. मात्र २२ कनेक्शनची बत्ती गुली होतीच व त्यांची ३८.६८ लाखांची थकबाकी कायम असल्याची माहिती आहे.मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू असून वीज बिलाची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. वीज कापल्यावर बीएसएनएलकडून पैसे भरले जाते व काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी लागते. हाच प्रकार आता पुन्हा एकदा घडून आला आहे. यंदा महावितरणने गोंदिया, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यात बीएसएनएलला दणका दिला आहे. महावितरणने यंदा २८ एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल केली होती.परिणामी बीएसएनएल ग्राहकांची चांगलीच फसगत होत आहे. मंगळवारी (दि.१०) बीएसएनएलच्या कापण्यात आलेल्या कनेक्शनची स्थिती जाणून घेतली असता २८ पैकी तिरोडा तालुक्यातील दोन कनेक्शनचे तर अर्जुनी-मोरगाव येथील पाच कनेक्शनचे पैसे भरण्यात आल्याने हे सहा कनेक्शन सुरू करण्यात आल्याचे कळले. मात्र त्यानंतरही २२ कनेक्शनची बत्ती मंगळवारीही गुल होती. यात, गोंदिया शहरातील तीन कनेक्शन बंद असून त्यांची सुमारे चार लाख रूपयांची थकबाकी आहे. तिरोडा तालुक्यातील तीन कनेक्शन बंद असून तेथील सुमारे १८ लाख रूपयांची, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० कनेक्शन बंद असून त्यांची १३.६८ लाख रूपयांची थकबाकी आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा कनेक्शन बंद असून त्यांची तीन लाख रूपयांची अशी एकूण ३८ लाख ६८ हजार रूपयांची थकबाकी कायम आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल