शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी भावाने घेतला जीव

By admin | Updated: February 12, 2017 00:47 IST

थोरला भाऊच ठरला कर्दनकाळ : आईच्या वाट्याची शेती कारणीभूत

अमरचंद ठवरे   बोंडगावदेवी समाजात भावाच्या नात्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. परस्परांच्या सुख दु:खात झोकून देऊन एकत्र येणारे नाते भावांचे समजले जाते. वैयक्तिक मतभेद असले तरी संकटकाळी भावाच्या मदतीला धावून जाणारे बंधूप्रेम आजही समाजात जिवंत आहे. परंतु जमिनीच्या हिस्सा वाटणीवरून पराकोटीला गेलेले वैरत्व जीवावर बेतले आहे. थोरल्या भावाने धाकट्या भावाला यमसदनी पाठविण्याचे क्रूरकृत्य केले. ही घटना गुढरी या खेडेगावातील शेतशिवारात ४ फेब्रुवारीला दिवसाढवळ्या घडली. बोअरवेलचे पाणी वापरण्याचा माझा दिवस आहे, असे म्हणत सुरू झालेल्या या भांडणामध्ये गळा आवळून लहान भावाची हत्या केल्याची कबुली मोठ्या भावाने पोलिसांना दिली. गणेश रुखमोडे (३८) या लहान भावाची हत्या केल्याच्या आरोपावरून जनार्धन रुखमोडे (४२) यास पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील भंडारा जिल्ह्याच्या सीमानजीक असलेले गुढरी हे छोटेशे गाव. तुकाराम यांना गोवर्धन, जनार्धन, गणेश असे तीन मुले. तिघांचेही लग्न होऊन आप-आपल्या वैवाहिक जीवनात रमले. मृतकाला अपंग असलेला १२ वर्षाचा एक मुलगा आहे. गुढरी या गावात रुखमोडे परिवाराची १५ एकर जमीन आहे. वडीलांच्या हयातीमध्ये सदर शेतामध्ये एक बोअर खोदण्यात आली होती. गावामध्ये या तिघाही भावाची प्रशस्त अशी इमारत आहे. सन २०१० मध्ये वडीलाचे निधन झाले. मृतक गणेश हा ट्रक चालवित होता. बऱ्याच वर्ष तो साकोलीला राहायचा. १५ एकर शेतजमीनीचा कारभार जनार्धन सांभाळायचा. घरची परिस्थिती सुधारण्यामध्ये ड्रायव्हर असलेला गणेशची फार महत्वाची भूमिका होती. साकोलीला वास्तव्यानी असतानी गणेशचा मुलाला पतंग खेळतानी विजेचा शॉक लागला. तो शॉकच जिवनातून उठणारा ठरला, शर्तीचे प्रयत्न करून मुलगा आजही पाय व हाताविना खाटेवरच पडून राहतो. मुलाच्या या अवस्थेने मृतक गणेशने गुढरी गावची वाट धरली. अख्या कुटूंबाचे सूत्र आपल्याकडे घेतले. ट्रक चालविण्याची नोकरी सोडून शेतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. घराचा कारभार लहान भावाकडे गेल्याने जनार्धनला खटकत होते. त्यामुळे काही वर्षापूर्वी तिघाही भावांचे शेतजमीन व घरातील खोल्यांचे हिस्से वाटे झाली. तिघेही एकमेकांपासून वेग-वेगळे राहायला लागले. वडीलांचे निधन झाल्यामुळे आईने लहान मुलात मृतक गणेशकडे राहणे पसंत केले. १५ एकर जमीनीचे वाटप तिघांनी भावांना प्रत्येकी ४ एकर प्रमाणे व आईच्या वाट्याला ३ एकर अशी जमिनीची वाटणी करण्यात आली. ज्या बांधीमध्ये वडिलोपार्जीत बोअर खोदण्यात आला होता. ती बांधी जनार्धनच्या वाट्याला गेली. आई गणेशमध्ये राहत असल्याने आईच्या हिस्याची ३ एकर जमीन गणेश करायचा. आईच्या हिस्य्याची शेतजमीन जनार्धनला सतावत होती. घटनेच्या दिवशी ४ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता े मृतक गणेश शेतामध्ये उन्हाळी धानाच्या रोपाला पाणी वागविण्यासाठी मफलर बांधून गेला. त्याच्या मागो-माग जनार्धन सुध्दा गेला. पाणी वापरण्यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. आज तुझा दिवस पाणी वागवण्याचा नाही असे बोलून त्यांच्यात बोअरवेलच्या बांधीमध्ये मारहाण झाली. खून केल्यानंतर आरोपी इलेक्ट्रीक मोटार दुरूस्त करण्यास बसला. काही वेळाने गावातील एकजन घरी आला व मोटार दुरूस्तीसाठी त्याला शेतामध्ये घेऊन गेला. त्याची मोटारदुरूस्त करून जनार्धन घरी आला. नंतर गणेशच्या मृत्युची बातमी गावात पसरल्याने जनार्धन सुध्दा शेतामध्ये गेला. दोन्ही भावांमध्ये झालेलल्या मारहाणीचे व्रण जनार्धनच्या अंगावर दिसले. - हत्येसाठी मदत कुणाची? गणेशला जिवानिशी मारून प्रेत काही अंतरावरील नालीत ठेवण्यात आला. या कृत्यात अन्य दुसरा कुणी सहभागी तर नाही ना? अशी चर्चा गुढरी गावात आहे. भावाची हत्या करण्यामध्ये जनार्धने गावातील कुणाचे सहकार्य घेतले तर नाही याचाही पोलीस तपास करीत आहेत. यासंबंधी गावातील एका व्यक्तीला सदर हत्या प्रकरणी विचारपूर करण्याचाही प्रयत्न पोलीस सूत्रांकडून झाल्याचे समजते. ७० फूट मृतदेह ओढत नेला ४मारहाणीत दोघेही भाऊ हाताबुक्यांनी मारू लागले. बांधीमध्ये खाली पाडून गणेशला मारहाण केली. गणेश खाली पडताच त्याच्या गळ्यात असलेला मफलर जनार्धनने आवळला. जनार्धन घाबरला काही क्षणात गणेशचा मृत्यू झाला. हे कृत्य आपल्यावर येवू नये म्हणून गळ्यातील मफलरने बांधीतून ओढत नेवून अंदाजे ७०-८० फुट अंतरावरील असलेल्या पाणी जाणाऱ्या नालीमध्ये जनार्धनने गणेशचे प्रेत टाकले. लुंगी-बनियानवर असलेला जनार्धन ओल्या कपड्यातर पायी घरी आला. तीन एकर शेती खटकत होती ४आईच्या हिस्याची ३ एकर शेती मृतक गणेश जवळ होती. आईच्या चरितार्थासाठी ३ एकर शेती देण्यात आली होती. ती शेती गणेश करायचा आईला खाण्यासाठी ३ एकराचे धान लागत नाही असे जनार्धनला वाटत होते. यासंबधी जनार्धनचे आईसोबत नेहमी खटके उडायचे. तुला तेवढ्या जमिनीचे धान लागत नाही. तुला आम्ही धान देऊ, जमीन वाटप कर अशी दमदाटी पिंजऱ्यात असलेला जनार्धन वारंवार आईला देत होता. आमच्या पेक्षा याला जमीन जास्त आहे, अशी इर्षा जनार्धनच्या मनात होती. अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशन येथे जनार्धन तुकाराम रुखमोडे (४२) याच्या विरूध्द भादंविचे कलम ३०२ (खून), २०१ (पुरावा नष्ट करणे) अन्वये अटक करण्यात आली. तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलसिंह सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माणिक खरकाटे, पोलीस नायक रेखलाल गौतम, पोलीस शिपाई शिंदे, कोरे, निकोडे करीत आहेत.