शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

भाऊ, तुम्ही किती लाख टाकले होते जी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

शेतीत फायदा होत नसल्याने या व्यवसायात गुंतवणूक करणे उत्तम राहील असे वाटून, मागील काही दिवसात लांजी आणि सालेकसा तालुक्यात अनेक शेतकरी आपली शेतजमीन विकायला निघाले. परंतु शेती खरेदी करणारा कोणी मिळत नसताना चिटफंड व्यवसायिकांच्या एजंटाने त्यांची शेती खरेदी केल्याचे प्रकार घडले आहेत. अनेकांनी आपल्या घरातील दागिने विकून यात पैसे गुंतवले. सराफा व्यवसायी जुने दागिने खरेदी करताना थकले.

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील लांजी तालुक्यात चालत असलेल्या चिटफंड व्यवसायात मध्य प्रदेशसह महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील हजारो लोकांनी तीन महिन्यात दामदुप्पट करून देणाऱ्या चिटफंड व्यवसायात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. परंतु शेवटी या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई करत चिटफंड व्यवसाय बंद पाडला आणि रोख रकमेसह सर्व दस्तावेज ताब्यात घेतले. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जबरदस्त शॉक लागला आहे. त्यांची, तेलही गेले आणि तूपही गेले, अशी परिस्थिती झाली आहे. अंबानी म्हणून प्रसिद्ध झालेले चिटफंड व्यवसायाचे मुख्य सूत्रधार सोमेंद्र कंकरायणेला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली असून चिटफंड व्यवसाय चालवणाऱ्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा आपल्या ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोनशे कोटींची रोकड व नोटा मोजण्याचे मशीन, शेकडो धनादेश पुस्तिका आणि इतर दस्तावेज जप्त केले असून त्यांच्या चिटफंडाचा व्यवसाय बंद केला आहे. अशात आता ज्या लोकांनी आपल्या घामाची कमाई तिथे गुंतवली, ती परत मिळणार नाही असे वाटत असताना, ‘भाऊ  तुम्ही किती पैसे टाकले होते’ असा प्रश्न लोक एकमेकांना विचारत आहेत. सध्या तालुक्यात संबंधित चिटफंड व्यवसायाचीच चर्चा रंगलेली दिसत आहे.लांजी तालुक्यातील बोलेगाव येथील युवक सोमेंद्र कंकरायणे हा विदेशातून व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला आणि त्यांनी तीन महिन्यात दामदुप्पट देण्याचा चिटफंड व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला काही गावांपर्यंत मर्यादित असलेला हा व्यवसाय हळूहळू संपूर्ण बालाघाट जिल्ह्यात आणि त्यानंतर महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यात सुद्धा पोहोचला. व्यवसायाची व्याप्ती वाढल्यानंतर त्याने आपले काही एजंट नियुक्त केले आणि व्यवसायाचे जाळे पसरवले. सालेकसा तालुक्यात लोकांचे नेहमी येणे-जाणे सुरू असते. त्यामुळे येथील लोकांच्या आणि नातेवाईकांच्या माध्यमातून हा व्यवसाय सालेकसात सुद्धा पसरला. तालुक्यातील हजारो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या चिटफंडमध्ये केली. जेव्हा एकाने ५० हजार टाकले, तर त्याला अवघ्या तीन महिन्यांतच एक लाख रुपये मिळाले. एक लाख रुपये टाकले, तर दोन लाख मिळाले. स्वप्न वाटत असताना लोकांना जेव्हा दुप्पट रक्कम मिळू लागली, तेव्हा इतरांच्या मनात सुद्धा लालसा बळावली आणि कोणी एक, तर कोणी दोन लाख व त्यापेक्षा जास्त अशी गुंतवणूक करू लागले. यात काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तर सेवानिवृत्तीचे मिळालेले सगळे पैसे त्यात टाकून दिले. एका कर्मचाऱ्याने तर तब्बल पन्नास लाख रुपये व्यवसायात गुंतवणूक केल्याचे सांगतात. धान व्यवसायिकांनी तर मोठमोठी रक्कम त्यात गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. याशिवाय काही गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर छोटे-मोठे कर्मचारी आणि सूज्ञ नागरिकांनी सुद्धा मोठी रक्कम गुंतवणूक केली. अशा लोकांची गुंतवणूक पाहून शेतकरी वर्ग सुद्धा या चिटफंड व्यवसायात रक्कम टाकू लागला. अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती विकून यात रक्कम टाकली आहे. शेतीत फायदा होत नसल्याने या व्यवसायात गुंतवणूक करणे उत्तम राहील असे वाटून, मागील काही दिवसात लांजी आणि सालेकसा तालुक्यात अनेक शेतकरी आपली शेतजमीन विकायला निघाले. परंतु शेती खरेदी करणारा कोणी मिळत नसताना चिटफंड व्यवसायिकांच्या एजंटाने त्यांची शेती खरेदी केल्याचे प्रकार घडले आहेत. अनेकांनी आपल्या घरातील दागिने विकून यात पैसे गुंतवले. सराफा व्यवसायी जुने दागिने खरेदी करताना थकले. शेवटी त्यांनी ही दागिने खरेदी बंद केली. अशात ही बाब बालाघाट जिल्ह्यातील काही राजकारणी लोकांच्या नजरेत जास्त खटकू लागली, तर जिल्हा प्रशासन सुद्धा यावर आपली नजर ठेवून बसला.

आमदारांनी मांडला विधानसभेत मुद्दा - दरम्यान, लांजी क्षेत्रातील काँग्रेस आमदार हिना कावरे यांनी मध्य प्रदेश विधानसभेत चिटफंड व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर काही दिवसात आणखी एका भाजप आमदाराने हा मुद्दा विधानसभेत  मांडला, तेव्हा शासनाने या चिटफंड व्यवसायाचा तपास करण्याचे आदेश दिले. शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मुख्य सूत्रधारासह इतर दहा जणांना अटक केली. सोबतच दोनशे कोटी रुपये रोकड, नोटा मोजण्याचे मशीन, चेकबुक व इतर दस्तावेज ताब्यात घेतले. ही कारवाई केल्यानंतर लोकांनी गुंतवणूक करणे बंद केले. 

कित्येकांनी ठेवले डोक्यावर हात - चिटफंड व्यवसायिकांवर कारवाई झाल्यानंतर आता ज्यांनी गुंतवणूक केली, ते डोक्यावर हात ठेवून बसले आहेत. अनेकांना तर जबरदस्त हादरा बसला आहे. कालपर्यंत काही लोक दामदुप्पट होऊन मिळेल, या आनंदात इकडे-तिकडे वावरत होते, ते आता लोकांसमोर फिरताना दिसत नाहीत. तेलही गेले आणि तूपही गेले, अशी परिस्थिती रक्कम गुंतवणूक करणाऱ्या लोकांची झालेली आहे. कारण की रक्कम गुंतवणूक करण्यासाठी लोकांनी सगळी घामाची कमाई तसेच दागिने व शेती विकून पैसे टाकले होते. आता लोक एकमेकांना हेच विचारात आहे की, ‘भाऊ, किती पैसे टाकले 

 

टॅग्स :fraudधोकेबाजी