शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कचरामुक्तीसाठी हातात घेतला झाडू

By admin | Updated: August 8, 2014 00:03 IST

रस्त्यावरसुद्धा कचऱ्याचे ढिगारे आपले स्वागत करण्यासाठी सदैव तयार असतात. शहराच्या या वैशिष्ठ्यामुळे गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत बदनाम झाले आहे.

 गोंदिया : गोंदिया शहरातील कोणत्याही रस्त्याने गेलो तरी रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यावरसुद्धा कचऱ्याचे ढिगारे आपले स्वागत करण्यासाठी सदैव तयार असतात. शहराच्या या वैशिष्ठ्यामुळे गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत बदनाम झाले आहे. परंतू शहराची ही ओळख पुसून टाकून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासोबतच नागरिकांनाही स्वच्छतेची सवय लावण्याचा चंग येथील सावजी शिक्षण संस्थेने बांधला. त्यानुसार संस्थेचे संचालक सुरेश चौरागडे यांच्या पुढाकाराने शहरात अनोख्या पद्धतीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या ‘गंदगी हटाओ’ अभियानात शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. शहरातील गांधी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला ठाणेदार जयराज रणवर यांच्या हस्ते माल्यार्पण करून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी अस्वच्छतेमुळे वाढणारी रोगराई, त्याचे दुष्परिणाम याचे महत्व सांगत सर्वांना स्वच्छतेचे महत्व यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर संचालक सुरेश चौरागडे यांच्यासह सर्वांनी हातात झाडू आणि टोपले, फावडे घेऊन ठिकठिकाणचा कचरा साफ करण्यास सुरूवात केली. कचरा हटविण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर लावून शहरातील एकेका भागात दररोज हे अभियान राबविले जात आहे. संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि आपले मार्गदर्शक माजी आ.हरिहरभाई पटेल यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण हे अभियान सुरू केल्याचे चौरागडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यात परिसरातील नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. बुधवारी माजी नगराध्यक्ष दीपक पटेल यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. नागरिकांनी यात सहभागी होऊन शहर स्वच्छ करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.