शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाच्या तोंडावर बोगस बियाणे बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:02 IST

खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहे. तसेच हंगामात वेळेवर गोंधळ उडू नये यासाठी खते, बियाणे यांची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक होण्याचीे शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या पथकावर प्रश्न चिन्ह : शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहे. तसेच हंगामात वेळेवर गोंधळ उडू नये यासाठी खते, बियाणे यांची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक होण्याचीे शक्यता आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यात बियाणे, खते यांचाही समावेश आहे. दरवर्षी जिल्ह्यात बियाण्यांमध्ये शेतकºयांची फसगत होत असल्याचे प्रकार समोर आले आहे.बियाण्यांचा काळाबाजार थांबावा व शेतकºयांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने जिल्हा आणि तालुका पातळीवर भरारी पथके तयार केली आहे. मात्र यानंतरही बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाल्याची माहिती आहे. लगतच्या मध्यप्रदेश राज्यातून बोगस बियाण्यांचा काळाबाजार होत असल्याचे कृषी विभागाने समोर आणले. नागपूर येथे विक्रीला जाणाºया बोगस बियाण्यांचा व्यापार करणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांना सुध्दा बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे.बोगस बियाण्यांची तस्करी मध्यप्रदेशातून नागपूरात होत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्यप्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाºया एकाकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले.त्यांच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा परिषदेचा कृषी विभागाकडून तसेच राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकºयांना अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येतात. यामध्येही शेतकºयांना बोगस बियाण्यांचे वाटप होत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे.लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, शिवणी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे तयार करुन हे बियाणे पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात विक्रीला येत असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे कृषी विभागाने बोगस बियाण्यांच्या काळा बाजारावर नियंत्रण ठेवून शेतकºयांना दर्जेदार बियाणे कसे मिळतील?यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे.