शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अँट्रासिटीच्या गुन्ह्यांची तडजोड तंमुसकडे द्या

By admin | Updated: May 14, 2014 01:48 IST

गुन्ह्यांची वास्तविक पार्श्वभूमी गावकऱ्यांनाच माहीत असल्याने अँट्रासिटीचे गुन्हे सोडविण्याची मागणी राज्यभरातून होत होती. त्यामुळे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी अँट्रासिटीचे गुन्हे

गोंदिया : गुन्ह्यांची वास्तविक पार्श्वभूमी गावकर्‍यांनाच माहीत असल्याने अँट्रासिटीचे गुन्हे सोडविण्याची मागणी राज्यभरातून होत होती. त्यामुळे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी अँट्रासिटीचे गुन्हे तंटामुक्त गाव समितीला सोडविण्याचा अधिकार द्यावा का, याबाबत विचारमंथन करण्यासाठी साहित्यिक व पत्रकारांचे मत मागविले होते. परंतु सुमत्यांकडे हे तंटे सोडविण्यास दिले नाही. सदर तंटे समित्यांकडे देण्याची मागणी होत आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविणार्‍या समित्यांना गंभीर गुन्हे किंवा अँट्रासिटीसारखे गुन्हे सोडविण्याचा अधिकार शासनाने मोहीम राबविणार्‍या समित्यांना दिला नाही. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या समित्या वर्षाकाठी एका जिल्ह्यात हजारो तंटे सामोपचाराने सोडवितात. दिवाणी, महसूली व इतर तंट्यांसोबत अनेक फौजदारी गुन्हे समित्या यशस्वीरित्या हाताळतात. परंतु खून, बलात्कार, दरोडे व अँट्रासिटीसारखे गंभीर गुन्हे हाताळण्यास तंटामुक्त समितीला शासनाने मनाई केली आहे. अँट्रासिटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेले अनेक गुन्हे बोगस असल्याचे लक्षात येते. गावात घडणार्‍या घटनांची वास्तविक माहिती गावकर्‍यांना असल्याने गावकरीच या गुन्ह्यांची हाताळणी यशस्वीरीत्या करू शकतात. याचेच उदारहरण गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या कवळी येथील जातीय समीकरण अँट्रासिटीकडे वळण घेत होते. परंतु तेथील तंटामुक्त समितीने हे प्रकरण यशस्वीरीत्या हाताळून गावाला शांततेतून समृद्धीकडे नेले व गुन्हे दाखल होण्याची पाळी येऊ दिली नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खैरलांजी व वडेगाव यासारख्या घटना घडतात. त्यामधून महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघते. त्याचप्रमाणे अँट्रासिटीच्या प्रकरणाने मोठे वाद उद्भवण्याची शक्यता असते. अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रिव्हेंशन ऑफ अँट्रासिटी अँक्ट या कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या तक्रारींमुळे गावाची शांतता धोक्यात येते. वास्तविकता वेगळीच असून कोणत्याही प्रकरणाला अँट्रासिटी प्रकरणाकडे वळविण्याचा प्रयत्न होत असतो. यावर राज्यातील अनेक जिल्ह्यातून शासनाला तक्रारी प्राप्त झाल्या. ज्या गावात अँट्रासिटीचे गुन्हे दाखल होण्यासाठी फिर्यादीने मानसिकता बनविली होती, त्या गावातील समित्यांनी पुढाकार घेवून गावात उद्भवलेला वाद सामंजस्याने सोडवून गावाची शांतता अबाधित ठेवली.

गावातील परिस्थिती तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या नागरिकांना माहित राहात असल्याने अँट्रासिटीचे प्रकरण हाताळण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम रामबाण उपाय असल्याचे अनेक समित्यांनी सांगितले आहे. शासनाने २ फेब्रुवारी २0१२ रोजी गृहमंत्रालयाने एक पत्र काढून साहित्यिक, लेखक व पत्रकारांना मते मतांतरे मागितले होते. हे पत्र १0 फेब्रुवारी २0१२ रोजी पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना पाठविले होते. या संदर्भात जिल्ह्यातील तंटामुक्त मोहिमेविषयी जाणकारांचे मत मागविण्यात आले होते. परंतु शासनाने यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही. (तालुका प्रतिनिधी)