शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

अँट्रासिटीच्या गुन्ह्यांची तडजोड तंमुसकडे द्या

By admin | Updated: May 14, 2014 01:48 IST

गुन्ह्यांची वास्तविक पार्श्वभूमी गावकऱ्यांनाच माहीत असल्याने अँट्रासिटीचे गुन्हे सोडविण्याची मागणी राज्यभरातून होत होती. त्यामुळे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी अँट्रासिटीचे गुन्हे

गोंदिया : गुन्ह्यांची वास्तविक पार्श्वभूमी गावकर्‍यांनाच माहीत असल्याने अँट्रासिटीचे गुन्हे सोडविण्याची मागणी राज्यभरातून होत होती. त्यामुळे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी अँट्रासिटीचे गुन्हे तंटामुक्त गाव समितीला सोडविण्याचा अधिकार द्यावा का, याबाबत विचारमंथन करण्यासाठी साहित्यिक व पत्रकारांचे मत मागविले होते. परंतु सुमत्यांकडे हे तंटे सोडविण्यास दिले नाही. सदर तंटे समित्यांकडे देण्याची मागणी होत आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविणार्‍या समित्यांना गंभीर गुन्हे किंवा अँट्रासिटीसारखे गुन्हे सोडविण्याचा अधिकार शासनाने मोहीम राबविणार्‍या समित्यांना दिला नाही. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या समित्या वर्षाकाठी एका जिल्ह्यात हजारो तंटे सामोपचाराने सोडवितात. दिवाणी, महसूली व इतर तंट्यांसोबत अनेक फौजदारी गुन्हे समित्या यशस्वीरित्या हाताळतात. परंतु खून, बलात्कार, दरोडे व अँट्रासिटीसारखे गंभीर गुन्हे हाताळण्यास तंटामुक्त समितीला शासनाने मनाई केली आहे. अँट्रासिटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेले अनेक गुन्हे बोगस असल्याचे लक्षात येते. गावात घडणार्‍या घटनांची वास्तविक माहिती गावकर्‍यांना असल्याने गावकरीच या गुन्ह्यांची हाताळणी यशस्वीरीत्या करू शकतात. याचेच उदारहरण गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या कवळी येथील जातीय समीकरण अँट्रासिटीकडे वळण घेत होते. परंतु तेथील तंटामुक्त समितीने हे प्रकरण यशस्वीरीत्या हाताळून गावाला शांततेतून समृद्धीकडे नेले व गुन्हे दाखल होण्याची पाळी येऊ दिली नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खैरलांजी व वडेगाव यासारख्या घटना घडतात. त्यामधून महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघते. त्याचप्रमाणे अँट्रासिटीच्या प्रकरणाने मोठे वाद उद्भवण्याची शक्यता असते. अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रिव्हेंशन ऑफ अँट्रासिटी अँक्ट या कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या तक्रारींमुळे गावाची शांतता धोक्यात येते. वास्तविकता वेगळीच असून कोणत्याही प्रकरणाला अँट्रासिटी प्रकरणाकडे वळविण्याचा प्रयत्न होत असतो. यावर राज्यातील अनेक जिल्ह्यातून शासनाला तक्रारी प्राप्त झाल्या. ज्या गावात अँट्रासिटीचे गुन्हे दाखल होण्यासाठी फिर्यादीने मानसिकता बनविली होती, त्या गावातील समित्यांनी पुढाकार घेवून गावात उद्भवलेला वाद सामंजस्याने सोडवून गावाची शांतता अबाधित ठेवली.

गावातील परिस्थिती तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या नागरिकांना माहित राहात असल्याने अँट्रासिटीचे प्रकरण हाताळण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम रामबाण उपाय असल्याचे अनेक समित्यांनी सांगितले आहे. शासनाने २ फेब्रुवारी २0१२ रोजी गृहमंत्रालयाने एक पत्र काढून साहित्यिक, लेखक व पत्रकारांना मते मतांतरे मागितले होते. हे पत्र १0 फेब्रुवारी २0१२ रोजी पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना पाठविले होते. या संदर्भात जिल्ह्यातील तंटामुक्त मोहिमेविषयी जाणकारांचे मत मागविण्यात आले होते. परंतु शासनाने यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही. (तालुका प्रतिनिधी)