शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वलाने पेटविल्या ३६ हजार घरातील चुली

By admin | Updated: July 1, 2017 00:12 IST

चूल पेटविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला वृक्ष तोडून त्याचा वापर सरपणासाठी करीत होत्या.

पालकमंत्र्याची माहिती: २ लाख ७५ हजार वीज जोडण्या लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : चूल पेटविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला वृक्ष तोडून त्याचा वापर सरपणासाठी करीत होत्या. चूल फुकता-फुकता त्यांच्या डोळ्यांना अंधत्वही येत होते. हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेतून ३६ हजार ५७८ लोकांना उज्ज्वला योजनेतून गॅस दिल्या आहेत. लोकोपयोगी कामे करण्यासाठी मागील तीन वर्षात केंद्र सरकार व अडीच वर्षापासून राज्यसरकार झटत आहे. स्डँड अप इंडियाच्या माध्यमातून नविन भारत घडविले जात असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. स्थानिक कन्हारटोलीच्या पवार बोर्र्डींग येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. संजय पुराम, विजय रहांगडाले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ. केशवराव मानकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, केंद्र सरकारने नोटबंदी, जीएसटी असे आमूलाग्र उपक्रम आणून देश घडविण्याचा उपक्रम सुरू केला. मुद्रा लोनच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उभे करण्याची संधी उपलब्ध करून दिली. गोंदिया जिल्ह्यात ३४ हजार ७४७ बेरोजगारांसाठी १२४ कोटी मुद्रालोन उभा करून १२१ कोटी वाटले आहेत. शहरी पंतप्रधान घरकूल योजनेतून याचा लाभ ६ हजार ६०७ लोकांना दिला आहे. गोंदिया शहरात २७५१ शौचालय तयार करण्याचे उद्दीट्ये होते त्यातून २४९३ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. तिरोडा शहरात १७२५ शौचालय तयार करण्याचे उद्दीट्ये होते त्यातून ९९६ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे.जिल्ह्यातील ३७ हजार ५९८ लोकांनी पीकविमा उतरविला आहे. मागच्या वर्षी क्राप लोन ४५ टक्के घेण्यात आलले होते. यंदा ही टक्केवारी वाढवायची आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ या वर्षात १०२० तरूण-तरूणींना प्रशिक्षण दिले. तर २०१७-१८या वर्षात ५ हजारापेक्षा अधिक मुला-मुलींना प्रशिक्षण देण्याचा माणस आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी सरकाच्या काळात गोंदिया जिल्ह्यात २३ हजार लोकांची वीज जोडणी केली होती. परंतु आम्ही अडीच वर्षाच्या काळात २ लाख ७५ वीज जोडण्या केल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात १२४ कोटीतून ३१ केव्हीचे ८ ठिकाणी ट्रान्सफार्मर बसविले आहेत. धडक सिंचन योजनेतून गोंदिया जिल्ह्याला ३ हजार विहीरी मागच्या वर्षी देण्यात आल्या. सर्व मामा तलावांचे खोलीकरण करून ४०० तलाव सिंचनासाठी घेतले आहेत. पुढच्या वर्षी १४०० तलावांचे खोलीकरण करण्यात येणार आहे. खाऱ्यापाण्यात ३५ टक्के मासेमारी केली जाते परंतु तेथील मासेमारी करणाऱ्यांना एक लाखाचे कर्ज दिले जाते तर गोळ्या पाण्यात ६५ टक्के मासेमारी होत असूनही फक्त ३० हजार रूपये कर्ज दिले जाते. गोळ्यापाण्यातील मासेमारी करणाऱ्यांना एक लाखापर्यंत कर्ज देण्यासाठी शासन विचार करीत आहे. देशातील सर्वात मोठी कर्जमुक्ती महाराष्ट्र सरकारने केली असल्याचे बडोले म्हणाले.