शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

निर्माणाधीन पुलाची तहान भागेना

By admin | Updated: June 8, 2017 02:08 IST

तालुक्यातील सावंगी- भदूटोला मार्गावरील पुलाचे बांधकाम होत असून या निर्माणाधीन पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजण्याची गरज आहे.

सावंगी-भदूटोला पुल : क्युरिंगची व्यवस्था नाही, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : तालुक्यातील सावंगी- भदूटोला मार्गावरील पुलाचे बांधकाम होत असून या निर्माणाधीन पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजण्याची गरज आहे. मात्र येथे महिला मजूरांकडून लोट्याने पाणी टाकले जात असल्याने या पुलाची तहान भागत नाही. अशात या पुलाचे बांधकाम किती मजबूत होणार असा प्रश्न पडतो. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. भदूटोला-सावंगी मार्गावरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दोन कोटी ५० लाख रूपयांच्या निधीतून या पुलाचे बांधकाम होत आहे. हा पुल तयार झाल्यास तालुक्यातील भदूटोला, पळसगाव, राका, पिपरी, चिखली, कनेरी, मनेरी, गोंडउमरी, कोकणा-जमी., परसोडी आदि गावातील जनतेला फायद्याचे ठरणार आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून या पुलाला महिला मजूरांकडून पाणी टाकण्याचे (क्युरींग) काम केले जात आहे. पाणी टाकण्याचे हे काम दिवसातून दोन-तीन वेळा होणे गरजेचे आहे. सिमेंट-कॉंक्र ीटच्या कोणत्याही बांधकामाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजणे गरजेचे असते. त्याशिवाय ते बांधकाम मजबूत होत नाही. अशात येथे मात्र दिवसातून महिला मजूरांकडून लोट्याने पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. अशात या पुलाची बांधकाम किती मजबूत होणार याबाबत सांगणे कठीण आहे. पुलाला पुरेपूर प्रमाणात पाणी टाकले जात नसल्याची माहिती पळसगाव व भदूटोला येथील गावकऱ्यांनी पुलाजवळ जावून संबंधीत अभियंत्यांना दिली. मात्र त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नसल्याची खंत स्वत: जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती राजेश नंदागवळी यांनी व्यक्त केली. शासनाकडून जनतेच्य सोयीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करून बांधकाम केले जाते. मात्र कंत्राटदार व सबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बांधकामाची गुणवत्ता राहत नाही. अशात कित्येकदा असे बांधकाम ढासळते. यात जिवीतहानीचे प्रकारही घडतात. आता संबंधीत अधिकाऱ्यांनी बांधकामाकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पुलाचे बांधकाम धोकादायक पुलाचे बांधकाम धोकादायक सिमेंट-कॉंक्रीटच्या बांधकामाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजावे (क्युरींग) लागते. त्याशिवाय बांधकाम मजबूत होत नाही. पूरेपूर प्रमाणात पाणी मिळाले नाही तर बांधकामाची गुणवत्ता राहत नाही व असे बांधकाम कधी खचणार याचा नेम नसतो. अशात पुलाच्या बांधकामावर पाणी पाजण्याचीच समस्या असताना पुलाचे बांधकाम किती मजबूत होणार हे सांगणे कठीण आहे. यातून जनतेच्या पैशांची नुसती नासाडी केली जात असल्याचे बोलले जात आहे.