शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

निर्माणाधीन पुलाची तहान भागेना

By admin | Updated: June 8, 2017 02:08 IST

तालुक्यातील सावंगी- भदूटोला मार्गावरील पुलाचे बांधकाम होत असून या निर्माणाधीन पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजण्याची गरज आहे.

सावंगी-भदूटोला पुल : क्युरिंगची व्यवस्था नाही, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : तालुक्यातील सावंगी- भदूटोला मार्गावरील पुलाचे बांधकाम होत असून या निर्माणाधीन पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजण्याची गरज आहे. मात्र येथे महिला मजूरांकडून लोट्याने पाणी टाकले जात असल्याने या पुलाची तहान भागत नाही. अशात या पुलाचे बांधकाम किती मजबूत होणार असा प्रश्न पडतो. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. भदूटोला-सावंगी मार्गावरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दोन कोटी ५० लाख रूपयांच्या निधीतून या पुलाचे बांधकाम होत आहे. हा पुल तयार झाल्यास तालुक्यातील भदूटोला, पळसगाव, राका, पिपरी, चिखली, कनेरी, मनेरी, गोंडउमरी, कोकणा-जमी., परसोडी आदि गावातील जनतेला फायद्याचे ठरणार आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून या पुलाला महिला मजूरांकडून पाणी टाकण्याचे (क्युरींग) काम केले जात आहे. पाणी टाकण्याचे हे काम दिवसातून दोन-तीन वेळा होणे गरजेचे आहे. सिमेंट-कॉंक्र ीटच्या कोणत्याही बांधकामाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजणे गरजेचे असते. त्याशिवाय ते बांधकाम मजबूत होत नाही. अशात येथे मात्र दिवसातून महिला मजूरांकडून लोट्याने पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. अशात या पुलाची बांधकाम किती मजबूत होणार याबाबत सांगणे कठीण आहे. पुलाला पुरेपूर प्रमाणात पाणी टाकले जात नसल्याची माहिती पळसगाव व भदूटोला येथील गावकऱ्यांनी पुलाजवळ जावून संबंधीत अभियंत्यांना दिली. मात्र त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नसल्याची खंत स्वत: जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती राजेश नंदागवळी यांनी व्यक्त केली. शासनाकडून जनतेच्य सोयीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करून बांधकाम केले जाते. मात्र कंत्राटदार व सबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बांधकामाची गुणवत्ता राहत नाही. अशात कित्येकदा असे बांधकाम ढासळते. यात जिवीतहानीचे प्रकारही घडतात. आता संबंधीत अधिकाऱ्यांनी बांधकामाकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पुलाचे बांधकाम धोकादायक पुलाचे बांधकाम धोकादायक सिमेंट-कॉंक्रीटच्या बांधकामाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजावे (क्युरींग) लागते. त्याशिवाय बांधकाम मजबूत होत नाही. पूरेपूर प्रमाणात पाणी मिळाले नाही तर बांधकामाची गुणवत्ता राहत नाही व असे बांधकाम कधी खचणार याचा नेम नसतो. अशात पुलाच्या बांधकामावर पाणी पाजण्याचीच समस्या असताना पुलाचे बांधकाम किती मजबूत होणार हे सांगणे कठीण आहे. यातून जनतेच्या पैशांची नुसती नासाडी केली जात असल्याचे बोलले जात आहे.