शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

निर्माणाधीन पुलाची तहान भागेना

By admin | Updated: June 8, 2017 02:08 IST

तालुक्यातील सावंगी- भदूटोला मार्गावरील पुलाचे बांधकाम होत असून या निर्माणाधीन पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजण्याची गरज आहे.

सावंगी-भदूटोला पुल : क्युरिंगची व्यवस्था नाही, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : तालुक्यातील सावंगी- भदूटोला मार्गावरील पुलाचे बांधकाम होत असून या निर्माणाधीन पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजण्याची गरज आहे. मात्र येथे महिला मजूरांकडून लोट्याने पाणी टाकले जात असल्याने या पुलाची तहान भागत नाही. अशात या पुलाचे बांधकाम किती मजबूत होणार असा प्रश्न पडतो. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. भदूटोला-सावंगी मार्गावरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दोन कोटी ५० लाख रूपयांच्या निधीतून या पुलाचे बांधकाम होत आहे. हा पुल तयार झाल्यास तालुक्यातील भदूटोला, पळसगाव, राका, पिपरी, चिखली, कनेरी, मनेरी, गोंडउमरी, कोकणा-जमी., परसोडी आदि गावातील जनतेला फायद्याचे ठरणार आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून या पुलाला महिला मजूरांकडून पाणी टाकण्याचे (क्युरींग) काम केले जात आहे. पाणी टाकण्याचे हे काम दिवसातून दोन-तीन वेळा होणे गरजेचे आहे. सिमेंट-कॉंक्र ीटच्या कोणत्याही बांधकामाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजणे गरजेचे असते. त्याशिवाय ते बांधकाम मजबूत होत नाही. अशात येथे मात्र दिवसातून महिला मजूरांकडून लोट्याने पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. अशात या पुलाची बांधकाम किती मजबूत होणार याबाबत सांगणे कठीण आहे. पुलाला पुरेपूर प्रमाणात पाणी टाकले जात नसल्याची माहिती पळसगाव व भदूटोला येथील गावकऱ्यांनी पुलाजवळ जावून संबंधीत अभियंत्यांना दिली. मात्र त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नसल्याची खंत स्वत: जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती राजेश नंदागवळी यांनी व्यक्त केली. शासनाकडून जनतेच्य सोयीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करून बांधकाम केले जाते. मात्र कंत्राटदार व सबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बांधकामाची गुणवत्ता राहत नाही. अशात कित्येकदा असे बांधकाम ढासळते. यात जिवीतहानीचे प्रकारही घडतात. आता संबंधीत अधिकाऱ्यांनी बांधकामाकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पुलाचे बांधकाम धोकादायक पुलाचे बांधकाम धोकादायक सिमेंट-कॉंक्रीटच्या बांधकामाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजावे (क्युरींग) लागते. त्याशिवाय बांधकाम मजबूत होत नाही. पूरेपूर प्रमाणात पाणी मिळाले नाही तर बांधकामाची गुणवत्ता राहत नाही व असे बांधकाम कधी खचणार याचा नेम नसतो. अशात पुलाच्या बांधकामावर पाणी पाजण्याचीच समस्या असताना पुलाचे बांधकाम किती मजबूत होणार हे सांगणे कठीण आहे. यातून जनतेच्या पैशांची नुसती नासाडी केली जात असल्याचे बोलले जात आहे.