शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

नवरदेव लग्न मंडपात आलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST

तिरोडा : तालुक्यातील मारेगाव येथील एका युवतीचा विवाह तालुक्यातीलच सोनेखारी येथील रहिवासी पंढरी इळपाते यांचा मुलगा रामरतन इळपाते याच्याशी ...

तिरोडा : तालुक्यातील मारेगाव येथील एका युवतीचा विवाह तालुक्यातीलच सोनेखारी येथील रहिवासी पंढरी इळपाते यांचा मुलगा रामरतन इळपाते याच्याशी ठरला होता. त्यानुसार २८ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता विवाह होणार होता. पण लग्नाच्यावेळी नवरदेव लग्न मंडपातच आला नाही. त्यामुळे वधू पक्षाची चांगलीच धावपळ उडाली होती. त्यामुळे वधू पक्षाने याची तक्रार तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे.

प्राप्त माहितीनुसार लग्न जुळले तेव्हापासून वराचे कुटुंबीय विविध कारणांवरुन वधू पक्षाला त्रास देत होते. पैशाची मागणी करीत होते. वधूच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे वधूच्या आईला पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप वधू पक्षाने केला आहे. लग्नाच्यादिवशी माहिती घेतली असता, वराकडील मंडळींनी लग्नाची कोणतीही तयारी केलेली नव्हती. दुपारी ३ वाजेपर्यंत नवरदेवाची वाट पाहून अखेर वधू पक्षाने तिरोडा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. वधूच्या तक्रारीवरून रामरतन पंढरी इळपाते, चंद्रकला पंढरी इळपाते, पंढरी इळपाते, लीलाधर चांदेवार, बबिता लीलाधर चांदेवार यांच्यावर हुंडाबंदी अधिनियम १९६१ कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित वधूला न्याय मिळावा म्हणून कुटुंबीय, नातेवाईक मारेगाव येथील गावकऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करीत आहेत.