शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

कपिल केकत गोंदिया : वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले असून ते नियम वाहन चालविणाऱ्या व्यक्तीसह पुढील व्यक्तीच्या ...

कपिल केकत

गोंदिया : वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले असून ते नियम वाहन चालविणाऱ्या व्यक्तीसह पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठीही आहेत. मात्र असे असतानाही कित्येकांकडून नियमांना तोडून वाहन चालविले जाते व त्याचे परिणाम अपघाताच्या रूपात पुढे येतात. यात कित्येकदा हे अपघात जीवावर बेततात व ज्यात वाहन चालविणाऱ्यासह पुढील व्यक्तीचाही जीव जातो. यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र एवढ्यावरच पुरेसे नसून वारंवार नियमांना तोडणाऱ्यांचे नाईलाजास्तव लायसन्सही वाहतूक नियंत्रण शाखेकडून रद्द केले जातात. म्हणूनच वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेची नजर असून नियम तोडल्यास लायसन्स रद्द होऊ शकते.

----------------------------------

चार वर्षांत झालेली कारवाई

वर्ष लायसन्स निलंबन

२०१८- १७९

२०१९- ६७

२०२०- ००

२०२१ - ००

----------------------------

हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन

- वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे तसेच अतिवेगात वाहन चालविल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

- मद्यप्राशन, अंमली पदार्थांचे सेवन करून तसेच सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

- मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत असल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

----------------------

आधी मुदत नंतर कारवाई

एखाद्याकडून नियमांचे वाहतूक नियमाचे उल्लंघन झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र त्यानंतरही वारंवार ती व्यक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असेल तर मात्र अशाला ठराविक कालवधीसाठी मुदत दिली जाते. मात्र त्यानंतरही काहीच फरक पडत नसल्यास लायसेंस रद्दचीच कारवाई करावी लागते.

------------------------

अशी होते कारवाई...

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कारवाई करून सोडले जाते. मात्र वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो. तेथून परवानगी येताच अशा व्यक्तीचे वाहनही जप्त केले जाते.

------------------

नियमांचे पालन करा...

वाहतुकीचे नियम हे सर्वांच्याच सुरक्षेसाठी आहेत. वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला अपघातांच्या रूपात दिसून येतात. यामुळे नियमांचे पालन करूनच नेहमी वाहन चालवा. कारण वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर असून नियम तोडले जात असल्यास कारवाई केली जाणार.

- युवराज हांडे

निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

५) वाहतूक पोलीस प्रमुखाचा कोट

Regards,

Gajanan Diwan,

Lokmat,

Aurangabad

5 Attachments