शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आम आदमी विमा योजनेच्या नूतणीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

गोंदिया : मागील तीन वर्षांपासून आम आदमी विमा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी लाभापासून वंचित असल्याचा ...

गोंदिया : मागील तीन वर्षांपासून आम आदमी विमा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी लाभापासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाने योजनेचे नूतनीकरण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रमुख व्यक्तींचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास केंद्र व राज्य सरकारमार्फत आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टीने आम आदमी विमा योजना १५ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यानुसार, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मरणोपरांत त्यांच्या कुटुंबातील वारसांना शासनामार्फत आम आदमी विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. शासनाकडून ३१ मार्च २०१७ पर्यंत आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांना देण्यात आले. परंतु २०१८ पासून केंद्र व राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे सामान्य कुटुंबातील गरजू लाभार्थ्यांनी या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारने या योजनेचे नूतनीकरण केले नसल्याने नागपूरच्या मुख्य प्रबंधकांनी सर्व प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे परत पाठविल्याचीही माहिती आहे. दरम्यान, सरकारने आम आदमी विमा योजनेचे १ मार्च २०१८ पासून पुन्हा नूतनीकरण करावे, या कालावधीतील आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा, वयोमर्यादेची अट ५९ वरुन ६५ वर्षे करावी, अशी मागणी पळसगावचे (ता. सडक-अर्जुनी) माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उदयकुमार कावळे यांनी केले आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी राजेश खवले यांना दिले आहे.

बॉक्स

...अन्यथा तीव्र आंदोलन करू

आम आदमी विमा योजनेचे सरकारने त्वरित नूतनीकरण करावे, गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी आपली मागणी आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही उदयकुमार कावळे यांनी दिला आहे.