शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी विमा योजनेच्या नूतणीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

गोंदिया : मागील तीन वर्षांपासून आम आदमी विमा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी लाभापासून वंचित असल्याचा ...

गोंदिया : मागील तीन वर्षांपासून आम आदमी विमा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी लाभापासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाने योजनेचे नूतनीकरण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रमुख व्यक्तींचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास केंद्र व राज्य सरकारमार्फत आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टीने आम आदमी विमा योजना १५ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यानुसार, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मरणोपरांत त्यांच्या कुटुंबातील वारसांना शासनामार्फत आम आदमी विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. शासनाकडून ३१ मार्च २०१७ पर्यंत आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांना देण्यात आले. परंतु २०१८ पासून केंद्र व राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे सामान्य कुटुंबातील गरजू लाभार्थ्यांनी या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारने या योजनेचे नूतनीकरण केले नसल्याने नागपूरच्या मुख्य प्रबंधकांनी सर्व प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे परत पाठविल्याचीही माहिती आहे. दरम्यान, सरकारने आम आदमी विमा योजनेचे १ मार्च २०१८ पासून पुन्हा नूतनीकरण करावे, या कालावधीतील आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा, वयोमर्यादेची अट ५९ वरुन ६५ वर्षे करावी, अशी मागणी पळसगावचे (ता. सडक-अर्जुनी) माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उदयकुमार कावळे यांनी केले आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी राजेश खवले यांना दिले आहे.

बॉक्स

...अन्यथा तीव्र आंदोलन करू

आम आदमी विमा योजनेचे सरकारने त्वरित नूतनीकरण करावे, गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी आपली मागणी आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही उदयकुमार कावळे यांनी दिला आहे.