शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

आम आदमी विमा योजनेच्या नूतणीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

गोंदिया : मागील तीन वर्षांपासून आम आदमी विमा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी लाभापासून वंचित असल्याचा ...

गोंदिया : मागील तीन वर्षांपासून आम आदमी विमा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी लाभापासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाने योजनेचे नूतनीकरण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रमुख व्यक्तींचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास केंद्र व राज्य सरकारमार्फत आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टीने आम आदमी विमा योजना १५ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यानुसार, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मरणोपरांत त्यांच्या कुटुंबातील वारसांना शासनामार्फत आम आदमी विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. शासनाकडून ३१ मार्च २०१७ पर्यंत आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांना देण्यात आले. परंतु २०१८ पासून केंद्र व राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे सामान्य कुटुंबातील गरजू लाभार्थ्यांनी या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारने या योजनेचे नूतनीकरण केले नसल्याने नागपूरच्या मुख्य प्रबंधकांनी सर्व प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे परत पाठविल्याचीही माहिती आहे. दरम्यान, सरकारने आम आदमी विमा योजनेचे १ मार्च २०१८ पासून पुन्हा नूतनीकरण करावे, या कालावधीतील आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा, वयोमर्यादेची अट ५९ वरुन ६५ वर्षे करावी, अशी मागणी पळसगावचे (ता. सडक-अर्जुनी) माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उदयकुमार कावळे यांनी केले आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी राजेश खवले यांना दिले आहे.

बॉक्स

...अन्यथा तीव्र आंदोलन करू

आम आदमी विमा योजनेचे सरकारने त्वरित नूतनीकरण करावे, गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी आपली मागणी आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही उदयकुमार कावळे यांनी दिला आहे.