शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

सीईओंच्या बैठकीवर ग्रामसेवकांचा बहिष्कार

By admin | Updated: August 5, 2015 01:53 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून ...

असहकार आंदोलन : प्रलंबित मागण्या निकाली काढाआमगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा संघटनेने १ आॅगस्टपासून जिल्ह्यात असहकार आंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत संघटनेने पंचायत समितीत आयोजित सीईओंच्या आढावा बैठकीवर बहिष्कार घातला.योगेश रुद्रकार या कर्मऱ्यावर केलेली कारवाई मागे घेऊन त्यांना सेवेत कायम करावे, विस्तार अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीने भरावी, आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची तालुकास्तरावर पुरस्कारासाठी निवड करावी, सेवेतील कालबद्ध प्रकरणे निकाली काढावी, अस्थायी ग्रामसेवकांना स्थायी करावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करावी, नोव्हेंबर २००५ पूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे, मासिक वेतनाची पुर्तता तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा निधीचे आवरण तत्काळ व्हावे, तेराव्या वित्त आयोगातील खरेदी केलेले प्रिंटर ग्रामपंचायतींना तत्काळ देण्यात यावे, ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण करण्यात यावे, आंतर जिल्हा बदली प्रकरणे निकाली काढण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले.संघटनेने मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे लेखी स्वरुपात निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. या मागण्यांसंदर्भात ग्रामसेवक संघटनांशी साधी चर्चासुद्धा घडवून आणण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संघटनेने जिल्हास्तरावर १ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यातच संघटनेने मंगळवारी (दि.४) आमगाव पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीवर बहिष्कार घातला. (शहर प्रतिनिधी)आंदोलनाचे पडसादग्रामसेवक संघटनेने आमगावपासून सुरु केलेल्या या आंदोलनामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावरील सभा, कामकाजावर त्याचे पडसाद दिसणार आहे. पुढे या संघटनेने ग्रामपंचायतींना ताळेबंद आंदोलने उभारण्याची तयारी केल्याने पदाधिकाऱ्यांनी सांगितले.कामांमध्ये अडथळाग्रामसेवक कर्मचारी संघटनेने मागण्यांच्या पुर्ततेसाठी केलेल्या आंदोलनामुळे गावपातळीवरील विकास कामांना अडथळा निर्माण झाला आहे. गावातील स्वच्छता, आरोग्यासह विविध कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची कामेही अडून पडली आहेत.