शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

सीईओंच्या बैठकीवर ग्रामसेवकांचा बहिष्कार

By admin | Updated: August 5, 2015 01:53 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून ...

असहकार आंदोलन : प्रलंबित मागण्या निकाली काढाआमगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा संघटनेने १ आॅगस्टपासून जिल्ह्यात असहकार आंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत संघटनेने पंचायत समितीत आयोजित सीईओंच्या आढावा बैठकीवर बहिष्कार घातला.योगेश रुद्रकार या कर्मऱ्यावर केलेली कारवाई मागे घेऊन त्यांना सेवेत कायम करावे, विस्तार अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीने भरावी, आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची तालुकास्तरावर पुरस्कारासाठी निवड करावी, सेवेतील कालबद्ध प्रकरणे निकाली काढावी, अस्थायी ग्रामसेवकांना स्थायी करावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करावी, नोव्हेंबर २००५ पूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे, मासिक वेतनाची पुर्तता तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा निधीचे आवरण तत्काळ व्हावे, तेराव्या वित्त आयोगातील खरेदी केलेले प्रिंटर ग्रामपंचायतींना तत्काळ देण्यात यावे, ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण करण्यात यावे, आंतर जिल्हा बदली प्रकरणे निकाली काढण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले.संघटनेने मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे लेखी स्वरुपात निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. या मागण्यांसंदर्भात ग्रामसेवक संघटनांशी साधी चर्चासुद्धा घडवून आणण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संघटनेने जिल्हास्तरावर १ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यातच संघटनेने मंगळवारी (दि.४) आमगाव पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीवर बहिष्कार घातला. (शहर प्रतिनिधी)आंदोलनाचे पडसादग्रामसेवक संघटनेने आमगावपासून सुरु केलेल्या या आंदोलनामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावरील सभा, कामकाजावर त्याचे पडसाद दिसणार आहे. पुढे या संघटनेने ग्रामपंचायतींना ताळेबंद आंदोलने उभारण्याची तयारी केल्याने पदाधिकाऱ्यांनी सांगितले.कामांमध्ये अडथळाग्रामसेवक कर्मचारी संघटनेने मागण्यांच्या पुर्ततेसाठी केलेल्या आंदोलनामुळे गावपातळीवरील विकास कामांना अडथळा निर्माण झाला आहे. गावातील स्वच्छता, आरोग्यासह विविध कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची कामेही अडून पडली आहेत.