शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

शेतीला पाणी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:35 IST

शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर पुरविला जाते.

ठळक मुद्देइटियाडोह धरणाचे पाणी : अनेकदा निवेदन देऊनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर पुरविला जाते. पण बोंडगावदेवी व परिसरातील २२ गावांना धरणाचे पाणी मिळत नाही. या धरणाचे पाणी सदर गावांतील शेतीला न मिळाल्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.सदर धरणाचे पाणी बोंडगावदेवी व परिसरातील शेतीला मिळावे याकरिता लोकप्रतिनिधींना अनेकदा सांगण्यात आले. बºयाचदा निवेदनसुद्धा देण्यात आले. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भ व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार यशवंत उके यांच्या पुढाकाराने अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार सी.आर. मंडारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.त्या निवेदनानुसार, येणाºया लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी इटियाडोह धरणाचे पाणी शेतीकरिता बोंडगावदेवी व परिसरातील गावांना न मिळाल्यास सदर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प करण्यात आला आहे. परिसरातील विविध समाजसेवी संघटना शेतकºयांच्या पाठीशी असून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी विदर्भ व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार यशवंत उके, सरपंच राधेशाम झोडे, रत्नाकर बोरकर, भानुदास वलगाये, आदर्श युवा गृपचे सदस्य, परिसरातील गावांचे सरपंच, शेषराव महाराज, व्यसनमुक्ती संघटनेचे सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.