शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतीला पाणी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:35 IST

शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर पुरविला जाते.

ठळक मुद्देइटियाडोह धरणाचे पाणी : अनेकदा निवेदन देऊनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर पुरविला जाते. पण बोंडगावदेवी व परिसरातील २२ गावांना धरणाचे पाणी मिळत नाही. या धरणाचे पाणी सदर गावांतील शेतीला न मिळाल्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.सदर धरणाचे पाणी बोंडगावदेवी व परिसरातील शेतीला मिळावे याकरिता लोकप्रतिनिधींना अनेकदा सांगण्यात आले. बºयाचदा निवेदनसुद्धा देण्यात आले. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भ व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार यशवंत उके यांच्या पुढाकाराने अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार सी.आर. मंडारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.त्या निवेदनानुसार, येणाºया लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी इटियाडोह धरणाचे पाणी शेतीकरिता बोंडगावदेवी व परिसरातील गावांना न मिळाल्यास सदर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प करण्यात आला आहे. परिसरातील विविध समाजसेवी संघटना शेतकºयांच्या पाठीशी असून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी विदर्भ व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार यशवंत उके, सरपंच राधेशाम झोडे, रत्नाकर बोरकर, भानुदास वलगाये, आदर्श युवा गृपचे सदस्य, परिसरातील गावांचे सरपंच, शेषराव महाराज, व्यसनमुक्ती संघटनेचे सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.