शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतात विहिरीऐवजी बोअरवेल खोदा

By admin | Updated: November 26, 2015 01:44 IST

शेतकऱ्यांची परिस्थिती पाण्याअभावी फार गंभीर आहे. वरच्या पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांची शेती एका पाण्याअभावी कोरडीच राहते व शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येतो.

गोंदिया : शेतकऱ्यांची परिस्थिती पाण्याअभावी फार गंभीर आहे. वरच्या पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांची शेती एका पाण्याअभावी कोरडीच राहते व शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येतो.महाराष्ट्र शासनाद्वारे विहिरी बांधून देण्याची योजना आहे. परंतु ही योजना काही ठराविक शेतकऱ्यांसाठी असते. त्यामुळे आता शासनाने विहिरीऐवजी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल खोदून द्यावी व त्यावर समर्सिबल पंप बसवून विद्युत जोडणीसुद्धा करून द्यावी. एका विहिरीची किंमत तीन लाख रूपये असून या किंमतीत तीन शेतकऱ्यांच्या शेतात तीन बोअरवेल्सचे काम होऊ शकते, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री दीपक कदम यांनी केली आहे. विहिरींच्या बांधकामाला अधिक खर्च येतो. मात्र तेवढ्याच रकमेत अनेक शेतकऱ्यांना बोअरवेल्सचा लाभ मिळू शकतो.पाटबंधारे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणद्वारे शेतकऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरमध्ये ते बोलत होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित नागपूर येथील पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ढवळे यांनी मागणी खरी असून अशा प्रकारच्या प्रस्तावाबाबत चर्चा आयुक्त नागपूर यांच्याशी करावी. तसेच त्यांच्यामार्फत शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविण्याची माहिती दिली. सदर शिबिराला जिल्ह्यातील २५० शेतकरी उपस्थित होते. या वेळी दीपक कदम यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)