शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बोपाबोडीतील ४० हेक्टर रोपवन झाले राख

By admin | Updated: June 11, 2017 01:08 IST

वृक्षसंवर्धनासाठी शासनाचा आटापिटा सुरू आहे तर दुसरीकडे त्या वनांच्या संवर्धनासाठी असलेले

फायर लाईन जाळली नव्हती: १०० मजुरांची बोगस मजुरी काढली बबलू मारवाडे । लोकमत न्यूज नेटवर्क सौंदड : वृक्षसंवर्धनासाठी शासनाचा आटापिटा सुरू आहे तर दुसरीकडे त्या वनांच्या संवर्धनासाठी असलेले वनाधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याने वनांची राखरांगोळी होत आहे. बोपाबोडी येथील ४० हेक्टर रोपवन याच हलगर्जीपणाचा नमुना आहे. फायर लाईनसाठी आलेला पैसा वनाधिकाऱ्यांनी आपल्या घशात टाकला. त्यामुळे बोपाबोडी येथील वनरोप आगीत स्वाहा झाले. ही आग आठवडाभरापूर्वी झाली. सडक-अर्जुनी तालुक्याच्या बोपाबोडी रोपवनात फायर लाईनचे यंदा काम न झाल्याने जंगलाला आग लागली. परिणामी ही आग वाढत गेली. वनरक्षक विजय कागदी मेश्राम व क्षेत्र सहाय्यक बेलखोडे यांनी फायर लाईनचे पैसे गडप केल्याचा आरोप वनमजूर यादोराव विनाराम कापगते व पतीराम सदाशिव भुरे यांनी केला आहे. बोपाबोडी येथे १०० हेक्टर परिसरात रोपवन आहे. ५०-५० हेक्टरचे दोन प्लाट आहेत. या प्लाटच्या फायर लाईनचे काम करण्यासाठी वनविभागामार्फत पैसा देण्यात आला. परंतु या ठिकाणचे फक्त ४ ते ५ हेक्टर फायर लाईनचे काम करण्यात आले. उर्वरीत लाईनचे काम करण्यात आले नाही. या फायर लाईनच्या कामावर मनुष्यबळ लावल्याची खोटी माहिती करून १०० बोगस मजुरांची मजूरी येथील वनाधिकाऱ्यांनी उचलली आहे. या कामावर १० मजूरांनी काही दिवस काम केले मात्र १८ मजूर कामावर दाखविण्यात आले. या प्रकाराचा विरोध तेथील वनमजुरांनी केला. त्यामुळे त्या वनमजुरांना संबधीत अधिकाऱ्यांनी कामावरून काढून टाकले. १०० मजुरांची मजूरी बोगस दर्शवून २०१ रूपये रोजीच्या हिशेबाने २० हजार १०० रूपये हडपण्यात आले आहेत. मजूरांना काम न देता फायर लाईनच्या कामाचे पैसे हडपल्याने या रोपवनाला आग लागली. यात ४० हेक्टर रोपवन राख झाले. भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या या अधिकाऱ्यांवरही कारवाई न झाल्याने वरिष्ट अधिकारी त्याच्यावर मेहरबान आहेत का, असा सवाल नागरिकांना होत आहे. या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाले. परंतु या नुकसनाीचा आकडा येथील अधिकाऱ्यांनी उपवन संरक्षक कार्यालयाला कळविले किंवा नाही ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे. या आगीत स्वाहा झालेल्या वनउपजाची चौकशी करून झालेला नुकसान या अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात यावा असा सूर उमटत आहे. क्षेत्र सहाय्यकाची बनवाबनवी या प्रकरणासंदर्भात क्षेत्र सहाय्यक विलास बेलखोडे यांची विचारणा केली असता जंगल जळाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र वनमजूर हे प्रकरण बाहेर काढत असल्याचे ते म्हणाले. फायर लाईनचे काम झाले आहे. मी व्हाऊचर काढले आहेत. बोगस मजूर व फायर लाईनसाठी आलेला पैसा यासंदर्भात बोलणे टाळून माझी पदोन्नती झाली आहे त्या संदर्भात मला कसलेही घेणेदेणे नाही असे त्यांनी बोलून वेळकाढू धोरण राबविले.