शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाढणाऱ्या रुग्णसंख्येने बोगस डॉक्टरांची चांदी

By admin | Updated: September 11, 2014 23:38 IST

सध्याचा हवामानात आर्द्रता आणि उष्णतेत वाढ होऊन सर्वत्र पावसाच्या पाण्याने दलदल निर्माण झाली आहे. डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच रोगांनी थैमान घातले असून परिसरात शासकीय

रावणवाडी : सध्याचा हवामानात आर्द्रता आणि उष्णतेत वाढ होऊन सर्वत्र पावसाच्या पाण्याने दलदल निर्माण झाली आहे. डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच रोगांनी थैमान घातले असून परिसरात शासकीय आरोग्य सुविधा हवी तसी उपलब्ध नसल्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे. रावणवाडी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्रात योग्य सुविधा होत नसल्यामुळे अखेर आजारी रुग्णांना बोगस डॉक्टरंच्या संपर्कात जावून उपचार करून घ्यावे लागत आहे. या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पुरेशा सोयी-सुविधा व आवश्यक औषधाचा साठा उपलब्ध नाही. मुख्यालयात नियमित हजर नसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाणवामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. येथे मुख्यालयी राहण्याऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी यासाठी येथील नागरिकांनी वारंवार आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली. मात्र आरोग्य विभागाने कसलीच उपाययोजना केली नाही. लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे. केवळ मतांसाठी राजकारण करून संधी साधण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सदर गावात आवश्यक असणारी शासकीय आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध होत नाही. याचाच फायदा बोगस डॉक्टर सध्या घेताना दिसत आहेत. सद्यस्थितीत शासकीय आरोग्य केंद्रावर बऱ्याच बाबींचा तुटवडा आहे. येथील खासगी स्वरूपाचेदेखील दर्जेदार रूग्णालय नाही. त्यामुळे बोगस डॉक्टर संधीचे सोने करीत आहेत. प्रशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्याकडून नागरिकांच्या आरोग्याचे खेळ मांडले जात आहे. परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. मात्र या डॉक्टरांना औषधाचा साठा कोण उपलब्ध करून देत आहे? त्याचा शोध घेणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. या भागात आरोग्याबद्दल अनेक समस्या आहेत. मात्र सबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील गोरगरीब रुग्णांना शहरात जावून उपचार करून घेणे कठिण होते. हे गाव ग्रामीण परिसरातील मुख्य गाव असल्यामुळे दरदिवशी शेकडो रुग्ण उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यांचा आधार घेत आहेत. मात्र या खासगी दवाखान्याचे डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळे उपचार कमी आणि आर्थिक भुर्दंडच अधिक बसतो. प्रयोगात्मक उपचार करून रुग्णांच्या माथी महागडी औषधे लिहून दिली जातात व रुग्णांची लुबाडणूक केली जाते. या प्रकाराची जाणीव आरोग्य विभागाला असूनही यावर आळा घालण्यासाठी कुणीही लक्ष देत नाही. (वार्ताहर)