शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वाढणाऱ्या रुग्णसंख्येने बोगस डॉक्टरांची चांदी

By admin | Updated: September 11, 2014 23:38 IST

सध्याचा हवामानात आर्द्रता आणि उष्णतेत वाढ होऊन सर्वत्र पावसाच्या पाण्याने दलदल निर्माण झाली आहे. डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच रोगांनी थैमान घातले असून परिसरात शासकीय

रावणवाडी : सध्याचा हवामानात आर्द्रता आणि उष्णतेत वाढ होऊन सर्वत्र पावसाच्या पाण्याने दलदल निर्माण झाली आहे. डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच रोगांनी थैमान घातले असून परिसरात शासकीय आरोग्य सुविधा हवी तसी उपलब्ध नसल्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे. रावणवाडी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्रात योग्य सुविधा होत नसल्यामुळे अखेर आजारी रुग्णांना बोगस डॉक्टरंच्या संपर्कात जावून उपचार करून घ्यावे लागत आहे. या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पुरेशा सोयी-सुविधा व आवश्यक औषधाचा साठा उपलब्ध नाही. मुख्यालयात नियमित हजर नसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाणवामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. येथे मुख्यालयी राहण्याऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी यासाठी येथील नागरिकांनी वारंवार आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली. मात्र आरोग्य विभागाने कसलीच उपाययोजना केली नाही. लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे. केवळ मतांसाठी राजकारण करून संधी साधण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सदर गावात आवश्यक असणारी शासकीय आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध होत नाही. याचाच फायदा बोगस डॉक्टर सध्या घेताना दिसत आहेत. सद्यस्थितीत शासकीय आरोग्य केंद्रावर बऱ्याच बाबींचा तुटवडा आहे. येथील खासगी स्वरूपाचेदेखील दर्जेदार रूग्णालय नाही. त्यामुळे बोगस डॉक्टर संधीचे सोने करीत आहेत. प्रशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्याकडून नागरिकांच्या आरोग्याचे खेळ मांडले जात आहे. परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. मात्र या डॉक्टरांना औषधाचा साठा कोण उपलब्ध करून देत आहे? त्याचा शोध घेणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. या भागात आरोग्याबद्दल अनेक समस्या आहेत. मात्र सबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील गोरगरीब रुग्णांना शहरात जावून उपचार करून घेणे कठिण होते. हे गाव ग्रामीण परिसरातील मुख्य गाव असल्यामुळे दरदिवशी शेकडो रुग्ण उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यांचा आधार घेत आहेत. मात्र या खासगी दवाखान्याचे डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळे उपचार कमी आणि आर्थिक भुर्दंडच अधिक बसतो. प्रयोगात्मक उपचार करून रुग्णांच्या माथी महागडी औषधे लिहून दिली जातात व रुग्णांची लुबाडणूक केली जाते. या प्रकाराची जाणीव आरोग्य विभागाला असूनही यावर आळा घालण्यासाठी कुणीही लक्ष देत नाही. (वार्ताहर)