शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

८ हजार पालकांनी केली पुस्तके परत; आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:30 IST

गोंदिया: सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी ...

गोंदिया: सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार पालकांनी पुस्तके परत केली आहेत. उर्वरित पालकांनी आपापल्या पाल्यांची जुनी अभ्यासक्रमाची पुस्तके परत करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

मागच्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ वी च्या मुलांना १ लाख १७ हजार पुस्तकाचे संच वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार पालकांनी पुस्तकांचे संच आपापल्या तालुक्यातील गटसाधन केंद्राकडे पाठविण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पुस्तके परत मागविण्यासाठी वारंवार सूचना केल्या आहेत.

.......

८ हजार पालकांनी केली पुस्तके परत

- मागच्या वर्षीच्या वाटप केलेल्या १ लाख १७ हजार पुस्तकांपैकी उर्वरित पुस्तके सर्व शिक्षा अभियानाला आली नाहीत.

- शासनाने मागच्या वर्षी एकट्या गोंदिया जिल्ह्यावर २ कोटी ५५ लाख ६३ हजार ४२४ खर्च करून पुस्तके वाटप केली. पुस्तके परत केल्याने शासनाचा तेवढा भार कमी होणार आहे.

- पालकांनी आपापल्या पाल्यांची पुस्तके तालुकास्तरावर जमा करावी जेणेकरून नवीन पुस्तकांचा भुर्दंड यंदा शासनावर बसणार नाही.

.................................

मागील वर्षी संच वाटप - १ लाख १७ हजार

यावर्षी मागणी -९८ हजार

...................

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली-१४५६५

दुसरी-१८५४२

तिसरी-२०१७६

चवथी- २०४०६

पाचवी-१९६६४

सहावी-१९४४०

सातवी-१९६५०

आठवी-२०६०१

......................................

शासन आमच्या मुलांची काळजी घेऊन त्यांच्या उत्थानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शिक्षणासाठी पुस्तके, गणवेश देते. दरवर्षी दिलेली पुस्तके परतही मागत नाही. परंतु कोरोनाचे संकट पाहून पुस्तके परत मागितली त्यामुळे जबाबदार पालक म्हणून मी पुस्तके परत केली.

- अविनाश मेंढे, पालक खातिया.

......

माझ्या मुलाला दिलेली पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कामात यावीत त्यांनीही शिक्षण घेऊन गुणवंत व्हावे यासाठी मागितलेली पुस्तके आम्ही परत केली आहेत.इतर पालकांनीही पुस्तके परत करावीत असे मला वाटते.

-दिलीप महारवाडे, पालक किडंगीपार

.....................

ज्या विद्यार्थ्यांची मागील वर्षाची पुस्तके तालुकास्तरावर जमा झाली नाहीत अशा पालकांनी आपापल्या पाल्यांची मिळालेली सर्व पुस्तके परत करावीत. जेणेकरून ती पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या कामात येतील.

- राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया.