शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रसाळ फळे ठरताहेत वरदान

By admin | Updated: April 8, 2017 00:57 IST

उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार

आरोग्याची काळजी : डॉक्टरांचे फळांच्या सेवनाचे आवाहन, दिल्या आरोग्याच्या टिप्स सालेकसा : उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार व विहारावर विशेष लक्ष तसेच दिनचर्या ठेवणे आवश्यक असते. अशातच उन्हाळ्यात जर रसाळ फळांचे सेवन करीत असल्यास उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यात मोठी मदत मिळत असते. यामुळेच उन्हाळ््यात रसाळ फळे आरोग्यासाठी वरदान ठरतात. ग्रिष्मऋतुमध्ये घाम फुटत असल्याने सतत शरीरातून पाणी बाहेर निघत असते. त्याबरोबर अशक्ततपणा, थकवा वाटणे इत्यादी प्रक्रिया सतत घडत असतात. अशात पाण्याचे भरपूर सेवन तसेच फळांचा रस, निंबू पानी, शरबत, पन्हे इत्यादी शरीराला देत राहिल्यास शरीरात स्फुर्ती व ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत मिळते. प्रकृती मनुष्याची सर्वात मोठी काळजी वाहक असून कोणकोणत्या ऋतुमध्ये कोणकोणती फळे उपयोगी असतात याला अनुसरुन फळे उपलब्ध होतात. म्हणून ऋतुफळे जास्त सेवन करायला हवे. उन्हाळ्यात द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा, अननस, डाळींब, निंबू इत्यादी फळे शरीराला मोठे वरदान असून या फळांचा रस नियमीत पिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आरोग्य ठणठणीत ठेवण्यात मदत मिळते. भोजनात सुद्धा रसाळ भाजी प्रकार किंवा पालेभाज्या सेवन केल्यास पचायला हलक्या व आरोग्यवर्धक असतात. टमाटर मध्ये द्रव्य रुप जास्त असून विविध स्वरुपात टमाटरचे नित्यसेवन फार उपयोगी असते. त्याच बरोबर काकडी, दूधी भोपळा, दोडके इत्यादी भाजी प्रकार हलके व पाचक असतात. प्रकृती आणि ऋतुचा नेहमी घट्ट संबंध असतो. आरोग्य टिकवून ठेवण्यास हे समजून घेणे आवश्यक असते. शरीराची पाचनसंस्था जठराग्नी बाहेरच्या थंडी आणि गरमीला अनुसरुन स्वत:त बदल करीत असते. (तालुका प्रतिनिधी) ऋतुुनुसार अशी असते पचनसंस्था ठंडीच्या दिवसात बाहेरचे वातावरण खूप गार असते. शरीराची पाचनसंस्था उष्ण असते. अशात उष्ण जढराग्नी कोणतेही भोजन पचवून घेण्यात सक्षम असते. त्यामुळे जड पदार्थ सुद्धा पचन्यास मदत मिळते. म्हणून शरीराच्या आतील भाग उष्ण ठेवण्यासाठी ठंडीच्या दिवसात उष्ण पदार्थावर गरम पेय पदार्थ प्राशन करने हितकारक असते. म्हणूनच ठंडीच्या दिवसात चिकन, मटन, अंडीसोबत गरम सूप, कॉफी, चहा खूप उपयोगी ठरतात. उन्हाळ्यात शरीराची प्रकृती विपरित झालेली असते. रनरनत्या उन्हात जड व उष्ण आहारांचे सेवन करने आरोग्यासाठी धोकादायक असून या मोसमात रसाळ ऋतृू फळे त्याचबरोबर ठंड पेय जास्त उपयोगी ठरते. बाहेर उन्हाळा वाढल्यास शरीराच्या आत पाचनसंस्था ठंड व कमजोर झालेली असते. अशात जड वस्तू किंवा तळलेले पदार्थ व उष्ण पदार्थ पचवण्यास कठिण जाते. त्यामुळे मलमुत्र योग्यप्रकारे उत्सर्जीत होत नाही व आरोग्यावर वाईट परिणाम घडण्याची दाट शक्यता असते. अशात भरपूर रस व पाणी असलेल्या फळांचे सेवन उत्तम व आरोग्यदायक असते.