शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रसाळ फळे ठरताहेत वरदान

By admin | Updated: April 8, 2017 00:57 IST

उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार

आरोग्याची काळजी : डॉक्टरांचे फळांच्या सेवनाचे आवाहन, दिल्या आरोग्याच्या टिप्स सालेकसा : उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार व विहारावर विशेष लक्ष तसेच दिनचर्या ठेवणे आवश्यक असते. अशातच उन्हाळ्यात जर रसाळ फळांचे सेवन करीत असल्यास उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यात मोठी मदत मिळत असते. यामुळेच उन्हाळ््यात रसाळ फळे आरोग्यासाठी वरदान ठरतात. ग्रिष्मऋतुमध्ये घाम फुटत असल्याने सतत शरीरातून पाणी बाहेर निघत असते. त्याबरोबर अशक्ततपणा, थकवा वाटणे इत्यादी प्रक्रिया सतत घडत असतात. अशात पाण्याचे भरपूर सेवन तसेच फळांचा रस, निंबू पानी, शरबत, पन्हे इत्यादी शरीराला देत राहिल्यास शरीरात स्फुर्ती व ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत मिळते. प्रकृती मनुष्याची सर्वात मोठी काळजी वाहक असून कोणकोणत्या ऋतुमध्ये कोणकोणती फळे उपयोगी असतात याला अनुसरुन फळे उपलब्ध होतात. म्हणून ऋतुफळे जास्त सेवन करायला हवे. उन्हाळ्यात द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा, अननस, डाळींब, निंबू इत्यादी फळे शरीराला मोठे वरदान असून या फळांचा रस नियमीत पिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आरोग्य ठणठणीत ठेवण्यात मदत मिळते. भोजनात सुद्धा रसाळ भाजी प्रकार किंवा पालेभाज्या सेवन केल्यास पचायला हलक्या व आरोग्यवर्धक असतात. टमाटर मध्ये द्रव्य रुप जास्त असून विविध स्वरुपात टमाटरचे नित्यसेवन फार उपयोगी असते. त्याच बरोबर काकडी, दूधी भोपळा, दोडके इत्यादी भाजी प्रकार हलके व पाचक असतात. प्रकृती आणि ऋतुचा नेहमी घट्ट संबंध असतो. आरोग्य टिकवून ठेवण्यास हे समजून घेणे आवश्यक असते. शरीराची पाचनसंस्था जठराग्नी बाहेरच्या थंडी आणि गरमीला अनुसरुन स्वत:त बदल करीत असते. (तालुका प्रतिनिधी) ऋतुुनुसार अशी असते पचनसंस्था ठंडीच्या दिवसात बाहेरचे वातावरण खूप गार असते. शरीराची पाचनसंस्था उष्ण असते. अशात उष्ण जढराग्नी कोणतेही भोजन पचवून घेण्यात सक्षम असते. त्यामुळे जड पदार्थ सुद्धा पचन्यास मदत मिळते. म्हणून शरीराच्या आतील भाग उष्ण ठेवण्यासाठी ठंडीच्या दिवसात उष्ण पदार्थावर गरम पेय पदार्थ प्राशन करने हितकारक असते. म्हणूनच ठंडीच्या दिवसात चिकन, मटन, अंडीसोबत गरम सूप, कॉफी, चहा खूप उपयोगी ठरतात. उन्हाळ्यात शरीराची प्रकृती विपरित झालेली असते. रनरनत्या उन्हात जड व उष्ण आहारांचे सेवन करने आरोग्यासाठी धोकादायक असून या मोसमात रसाळ ऋतृू फळे त्याचबरोबर ठंड पेय जास्त उपयोगी ठरते. बाहेर उन्हाळा वाढल्यास शरीराच्या आत पाचनसंस्था ठंड व कमजोर झालेली असते. अशात जड वस्तू किंवा तळलेले पदार्थ व उष्ण पदार्थ पचवण्यास कठिण जाते. त्यामुळे मलमुत्र योग्यप्रकारे उत्सर्जीत होत नाही व आरोग्यावर वाईट परिणाम घडण्याची दाट शक्यता असते. अशात भरपूर रस व पाणी असलेल्या फळांचे सेवन उत्तम व आरोग्यदायक असते.