शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रसाळ फळे ठरताहेत वरदान

By admin | Updated: April 8, 2017 00:57 IST

उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार

आरोग्याची काळजी : डॉक्टरांचे फळांच्या सेवनाचे आवाहन, दिल्या आरोग्याच्या टिप्स सालेकसा : उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार व विहारावर विशेष लक्ष तसेच दिनचर्या ठेवणे आवश्यक असते. अशातच उन्हाळ्यात जर रसाळ फळांचे सेवन करीत असल्यास उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यात मोठी मदत मिळत असते. यामुळेच उन्हाळ््यात रसाळ फळे आरोग्यासाठी वरदान ठरतात. ग्रिष्मऋतुमध्ये घाम फुटत असल्याने सतत शरीरातून पाणी बाहेर निघत असते. त्याबरोबर अशक्ततपणा, थकवा वाटणे इत्यादी प्रक्रिया सतत घडत असतात. अशात पाण्याचे भरपूर सेवन तसेच फळांचा रस, निंबू पानी, शरबत, पन्हे इत्यादी शरीराला देत राहिल्यास शरीरात स्फुर्ती व ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत मिळते. प्रकृती मनुष्याची सर्वात मोठी काळजी वाहक असून कोणकोणत्या ऋतुमध्ये कोणकोणती फळे उपयोगी असतात याला अनुसरुन फळे उपलब्ध होतात. म्हणून ऋतुफळे जास्त सेवन करायला हवे. उन्हाळ्यात द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा, अननस, डाळींब, निंबू इत्यादी फळे शरीराला मोठे वरदान असून या फळांचा रस नियमीत पिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आरोग्य ठणठणीत ठेवण्यात मदत मिळते. भोजनात सुद्धा रसाळ भाजी प्रकार किंवा पालेभाज्या सेवन केल्यास पचायला हलक्या व आरोग्यवर्धक असतात. टमाटर मध्ये द्रव्य रुप जास्त असून विविध स्वरुपात टमाटरचे नित्यसेवन फार उपयोगी असते. त्याच बरोबर काकडी, दूधी भोपळा, दोडके इत्यादी भाजी प्रकार हलके व पाचक असतात. प्रकृती आणि ऋतुचा नेहमी घट्ट संबंध असतो. आरोग्य टिकवून ठेवण्यास हे समजून घेणे आवश्यक असते. शरीराची पाचनसंस्था जठराग्नी बाहेरच्या थंडी आणि गरमीला अनुसरुन स्वत:त बदल करीत असते. (तालुका प्रतिनिधी) ऋतुुनुसार अशी असते पचनसंस्था ठंडीच्या दिवसात बाहेरचे वातावरण खूप गार असते. शरीराची पाचनसंस्था उष्ण असते. अशात उष्ण जढराग्नी कोणतेही भोजन पचवून घेण्यात सक्षम असते. त्यामुळे जड पदार्थ सुद्धा पचन्यास मदत मिळते. म्हणून शरीराच्या आतील भाग उष्ण ठेवण्यासाठी ठंडीच्या दिवसात उष्ण पदार्थावर गरम पेय पदार्थ प्राशन करने हितकारक असते. म्हणूनच ठंडीच्या दिवसात चिकन, मटन, अंडीसोबत गरम सूप, कॉफी, चहा खूप उपयोगी ठरतात. उन्हाळ्यात शरीराची प्रकृती विपरित झालेली असते. रनरनत्या उन्हात जड व उष्ण आहारांचे सेवन करने आरोग्यासाठी धोकादायक असून या मोसमात रसाळ ऋतृू फळे त्याचबरोबर ठंड पेय जास्त उपयोगी ठरते. बाहेर उन्हाळा वाढल्यास शरीराच्या आत पाचनसंस्था ठंड व कमजोर झालेली असते. अशात जड वस्तू किंवा तळलेले पदार्थ व उष्ण पदार्थ पचवण्यास कठिण जाते. त्यामुळे मलमुत्र योग्यप्रकारे उत्सर्जीत होत नाही व आरोग्यावर वाईट परिणाम घडण्याची दाट शक्यता असते. अशात भरपूर रस व पाणी असलेल्या फळांचे सेवन उत्तम व आरोग्यदायक असते.