शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांवर कारवाईसाठी दोन तास रोखला मृतदेह

By admin | Updated: March 2, 2017 00:08 IST

गोंदिया-बालाघाट या आंतरराज्यीय मार्गावर एका इंडिका कारने प्रवासी घेऊन जाणाऱ्या आॅटोला जबर धडक दिल्याने

आंभोरा अपघातातील जखमीचा मृत्यू : डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गोंदिया : गोंदिया-बालाघाट या आंतरराज्यीय मार्गावर एका इंडिका कारने प्रवासी घेऊन जाणाऱ्या आॅटोला जबर धडक दिल्याने आॅटोमधील दोन जण जागीच ठार होऊन आठ लोक जखमी झाले होते. या अपघातातील एका गंभीर जखमींचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या जखमीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी तब्बल दोन तास गोंदियाच्या मेडिकल कॉलेज परिसरात मृतदेह रोखून धरला. यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास गोंदियातील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेच्या (एनएफटीआय) कारने आंभोरा येथील या आॅटोला धडक दिली. यात वाहन चालक किशोर रामटेके व आर्यन नावाचा नऊ वर्षाचा मुलगा घटनास्थळीच मरण पावला. आॅटोमधील आठ लोक जखमी झाले होते. या जखमीतील संतोष मंगरू चामलाटे (२६) यांचा गोंदियातील मेडिकल कॉलेज-रुग्णालयातून नागपूरला पुढील उपचारासाठी नेताना लाखनीनजीक मृत्यू झाला. गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी रूग्णावर उपचार केला नाही. त्यामुळेच त्या रुग्णाची प्रकृती खालावली आणि मग त्या रूग्णाला नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला, असा आरोप नातेवाईकांनी केला. नागपूर येथे रूग्णाला नेण्यासाठी शासकीय रूग्णवाहिका दिली नाही. खासगी रूग्णवाहिकेतून न्या, असा सल्ला देण्यात आला. त्या खासगी रूग्णवाहिकेत कृत्रिम श्वास देणारो आॅक्सिजन सेट नव्हता, साधी सलाईनही नव्हती. गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये रूग्ण असताना त्याच्यावर उपचार झाला नाही. नागपूरला रवाना करताना त्यांना कसलीच मदत केली नाही. त्यामुळे संतोष चामलाटे (२६) रा.आंभोरा या जखमी तरूणाचा नागपूरला नेत असताना मंगळवारच्या सायंकाळी ४.३० वाजतादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आला. बुधवारी सकाळी १० वाजता उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह मृताच्या नातेवाईकांना देण्यात आला. परंतु मृतदेह नेणार नाही, असा पवित्रा रूग्णांच्या नातेवाईकांनी घेतला. जेव्हापर्यंत हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार नाही, वैद्यकीय अधिष्ठाता यांना निलंबित करणार नाही, तेव्हापर्यंत मृतदेह घरी नेणार नाही, असा पवित्रा घेत मोठ्या संख्येने नातेवाईक व गावकऱ्यांनी मेडिकल कॉलेज परिरसरात आंदोलन केले. मृतदेहाला घरी घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिका शवविच्छेदन गृहासमोरून नेत असताना केटीएसच्या गेटवर दोन वेळा त्या रूग्णवाहिकेला थांबविण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनात आरोग्य प्रशासनाने चौकशी करून डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरच तो मृतदेह नेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी) रूग्णांना मिळतात मरणयातना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अपघात होऊन जखमी झालेल्या रूग्णांंना मरणयातना मिळत आहेत. अपघात होऊन आलेल्या व्यक्तींच्या निकामी अवयवांवर दुसऱ्याच दिवशी शस्त्रक्रिया करणे अपेक्षित आहे. परंतु येथे १५-१५ दिवस रूग्णांकडे लक्ष दिले जात नसून त्यांच्यावरील उपचारांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अपघातातील गंभीर जखमींना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. जबाबदारी एकमेकांवर ढकलतात मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचा डॉक्टरांकडून उपचार होत नाही. येथील वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांच्या ढिसाळ कारभारामुळे रूग्णांचा मृत्यू होत आहे. परंतु येथील आरोग्य सेवेसंदर्भात डॉ.केवलिया केटीएस रुग्णालयाकडे बोट दाखवितात. तर जिल्हा शल्यचिकित्सक संपूर्ण कारभार वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे असल्याचे सांगतात. दोन्ही अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असतात.