शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

निळया आकाशाखाली होते आयुष्याची संध्याकाळ

By admin | Updated: July 2, 2014 23:20 IST

जन्म उघड्यावर, संसार उघड्यावर आणि मरणही उघड्यावरच होणाऱ्या मेंढपाळांच्या समस्या पिढयान्पिढ्या 'जैसे थे' आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वितभर पोटासाठी रानावनात व गावोगावी

व्यथा मेंढपाळांची : सुविधांपासून वंचित, भटकंती करून उदरनिर्वाहनरेश रहिले - गोंदियाजन्म उघड्यावर, संसार उघड्यावर आणि मरणही उघड्यावरच होणाऱ्या मेंढपाळांच्या समस्या पिढयान्पिढ्या 'जैसे थे' आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वितभर पोटासाठी रानावनात व गावोगावी फिरणाऱ्या मेंढीपालन करणाऱ्या लोकांची केवीलवाणी हाक शासनही ऐकत नाही.अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती धडपड करतो व तो कुठे कमी पडल्यास शासनही मदत करते. परंतु गुजरातच्या भूज जिल्ह्यातील कच्छ परिसरातील शेकडो मेंढीपालन करणारे कुटुंब पिढ्यान पिढ्यांपासून गोंदिया जिल्ह्यात वनवन भटकत आहेत. गुजरातमध्ये दुष्काळ पडल्यामुळे ते शेकडो कुटुंब आपल्या शेळ्या-मेंढ्या, उंट घेऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ प्रदेशाकडे आले. तेव्हापासून आतापर्यंत ते गोंदिया जिल्ह्यात मेंढीपालनाचा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवितात. मेंढीपासून निघणारी लोकर विकून आपला संसार चालविण्याचा त्यांचा खटाटोप आहे. परंतु एक डेरावाल्याला मेंढीच्या एका कळपापासून अवघी एक ते दीड क्विंटल लोकर मिळते. तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे त्याची विक्री करतात. एका डेरावाल्याला एक ते दीड क्विंटल लोकर मिळत असल्याने तीन महिन्यात तीन ते साडेतीन हजार रुपये त्यांना मिळतात. एका वर्षात एका मेंढीचे केस कापले जाते. एका मेंढीपासुन एक पाव ते अर्धा किलो वजनाचे केस निघतात. त्यातून मिळणाऱ्या अल्पशा मोबदल्यातून गहू, तेल, मीठ, तिखट अश्या सर्वच वस्तु त्यांना खरेदी कराव्या लागत असल्याने या मेंढीपालन करणाऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यांच्याजवळ इंधनाची सोय नसल्याने कच्च्या दुधाचे सेवन करावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात पावसाची रिपरिप किंवा मुसळधार पाऊस असला तर एक पोळी तयार करायला चार-चार तास लागतात असे तेथील महिलांनी सांगितले. एका कुटुंबात चार ते १५ जणांचा समावेश असून मेंढीचे दूध व लोकरपासून मिळणाऱ्या पैशावर आपला उदरनिर्वाह चालविण्याचा खटाटोप या मेंढीपालन करण्यांचा असतो. गव्हाची पोळी, मेंढीचे दुध,ताक व भाजी हे त्यांचे मुख्य खाद्य पदार्थ आहे. पावसाळ्यात रॉकेल उपलब्ध राहात नसल्याने इंधनाची सोय म्हणून वाहनाचे टायर स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरतात. टायर जाळल्यावर निघणाऱ्या कार्डन डायआॅक्साईडमुळे अनेक महिला आजारीही पडतात. पावसात टायर भिजले तर पावसाळ्यात जेवणही त्यांच्या नशीबात येत नाही. भारतात राहतात परंतु मतदानाचा हक्क नाही, रेशन कार्ड नाही, शासनाच्या सर्व योजनांपासून मुकलेली ही जमात पिढ्यान पिढ्यांपासून वनात भटकत किंवा गावाच्या शेजारी डेरा टाकून आपला व्यवसाय चालवित आहे. जन्मापासून तर मरणापर्यंत महाराष्ट्रात राहणारी ही जमात उपेक्षित आहे. रानावनात आपल्या मेंढया चारून पठारावर आपला डेरा ठोकून रात्र दोन रात्री काढणाऱ्या या शेकडो कुटुंबाना निवाऱ्याची सोय नाही. उघड्या मैदानावर तंबू उभारून रात्र घालविणाऱ्या या शेकडो कुटुंबांना कायमस्वरूपी छत मिळण्यासाठी आजपर्यंत कोणीही पुढाकार घेतलेला नाही.