शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

निळया आकाशाखाली होते आयुष्याची संध्याकाळ

By admin | Updated: July 2, 2014 23:20 IST

जन्म उघड्यावर, संसार उघड्यावर आणि मरणही उघड्यावरच होणाऱ्या मेंढपाळांच्या समस्या पिढयान्पिढ्या 'जैसे थे' आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वितभर पोटासाठी रानावनात व गावोगावी

व्यथा मेंढपाळांची : सुविधांपासून वंचित, भटकंती करून उदरनिर्वाहनरेश रहिले - गोंदियाजन्म उघड्यावर, संसार उघड्यावर आणि मरणही उघड्यावरच होणाऱ्या मेंढपाळांच्या समस्या पिढयान्पिढ्या 'जैसे थे' आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वितभर पोटासाठी रानावनात व गावोगावी फिरणाऱ्या मेंढीपालन करणाऱ्या लोकांची केवीलवाणी हाक शासनही ऐकत नाही.अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती धडपड करतो व तो कुठे कमी पडल्यास शासनही मदत करते. परंतु गुजरातच्या भूज जिल्ह्यातील कच्छ परिसरातील शेकडो मेंढीपालन करणारे कुटुंब पिढ्यान पिढ्यांपासून गोंदिया जिल्ह्यात वनवन भटकत आहेत. गुजरातमध्ये दुष्काळ पडल्यामुळे ते शेकडो कुटुंब आपल्या शेळ्या-मेंढ्या, उंट घेऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ प्रदेशाकडे आले. तेव्हापासून आतापर्यंत ते गोंदिया जिल्ह्यात मेंढीपालनाचा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवितात. मेंढीपासून निघणारी लोकर विकून आपला संसार चालविण्याचा त्यांचा खटाटोप आहे. परंतु एक डेरावाल्याला मेंढीच्या एका कळपापासून अवघी एक ते दीड क्विंटल लोकर मिळते. तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे त्याची विक्री करतात. एका डेरावाल्याला एक ते दीड क्विंटल लोकर मिळत असल्याने तीन महिन्यात तीन ते साडेतीन हजार रुपये त्यांना मिळतात. एका वर्षात एका मेंढीचे केस कापले जाते. एका मेंढीपासुन एक पाव ते अर्धा किलो वजनाचे केस निघतात. त्यातून मिळणाऱ्या अल्पशा मोबदल्यातून गहू, तेल, मीठ, तिखट अश्या सर्वच वस्तु त्यांना खरेदी कराव्या लागत असल्याने या मेंढीपालन करणाऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यांच्याजवळ इंधनाची सोय नसल्याने कच्च्या दुधाचे सेवन करावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात पावसाची रिपरिप किंवा मुसळधार पाऊस असला तर एक पोळी तयार करायला चार-चार तास लागतात असे तेथील महिलांनी सांगितले. एका कुटुंबात चार ते १५ जणांचा समावेश असून मेंढीचे दूध व लोकरपासून मिळणाऱ्या पैशावर आपला उदरनिर्वाह चालविण्याचा खटाटोप या मेंढीपालन करण्यांचा असतो. गव्हाची पोळी, मेंढीचे दुध,ताक व भाजी हे त्यांचे मुख्य खाद्य पदार्थ आहे. पावसाळ्यात रॉकेल उपलब्ध राहात नसल्याने इंधनाची सोय म्हणून वाहनाचे टायर स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरतात. टायर जाळल्यावर निघणाऱ्या कार्डन डायआॅक्साईडमुळे अनेक महिला आजारीही पडतात. पावसात टायर भिजले तर पावसाळ्यात जेवणही त्यांच्या नशीबात येत नाही. भारतात राहतात परंतु मतदानाचा हक्क नाही, रेशन कार्ड नाही, शासनाच्या सर्व योजनांपासून मुकलेली ही जमात पिढ्यान पिढ्यांपासून वनात भटकत किंवा गावाच्या शेजारी डेरा टाकून आपला व्यवसाय चालवित आहे. जन्मापासून तर मरणापर्यंत महाराष्ट्रात राहणारी ही जमात उपेक्षित आहे. रानावनात आपल्या मेंढया चारून पठारावर आपला डेरा ठोकून रात्र दोन रात्री काढणाऱ्या या शेकडो कुटुंबाना निवाऱ्याची सोय नाही. उघड्या मैदानावर तंबू उभारून रात्र घालविणाऱ्या या शेकडो कुटुंबांना कायमस्वरूपी छत मिळण्यासाठी आजपर्यंत कोणीही पुढाकार घेतलेला नाही.