शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिर

By admin | Updated: July 1, 2015 02:17 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राज्याचे माजी मंत्री आणि लोकमत समुहाचे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्जा ...

लोकमत’चा उपक्रम : रक्तदान करून सामाजिक दायित्व निभवागोंदिया : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राज्याचे माजी मंत्री आणि लोकमत समुहाचे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्जा यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी (दि.२) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गोंदिया पब्लिक शाळा, पांगोळी नदी रोड, गोंदिया येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला गंगाबाई रक्तपेढीच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, कार्ड ेदेऊन अतिथींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नेहमीच रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे गरजूंना रक्तासाठी मोठीच धावपळ करावी लागते. ही उणीव दूर करण्याचे उद्देश्य समोर ठेवून लोकमत समूह व बाई गंगाबाई रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे. सदर उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांसह लोकमतचे वाचक, सामाजिक संघटना व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय (०७१८२-२३०५०७), (९८८१०११८२१), (९८२३१८२३६७), (९४२३६८९६६४) येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)रक्तदान का करावे ?मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नाही. ते कृत्रिमरीत्या बनविता येत नाही. रक्त अधिक काळ टिकवून ठेवता येत नाही.रक्तपेढीत रक्ताची सतत कमतरता असते. त्यामुळे रक्तदान नियमित करावे.तुमच्याद्वारे दिलेले रक्त कोणत्याही व्यक्तीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी, मातेच्या प्रसूतीच्या वेळी व दुखापतीमुळे अधिक रक्तस्त्राव झाल्याने रक्ताची कमतरता पूर्ण करून त्याचे जीव वाचवू शकते.रक्तावर ज्यांचे आयुष्य अवलंबून असते, असे सिकलसेल, थॅलेसॅमिया, हिमोफिलिया, अपॅल्स्टीक अ‍ॅनिमिया, रक्ताचे कर्करोग आदी रूग्णांना रक्तामुळे नवसंजीवनी मिळते.रक्ताची आवश्यकता कधी कोणाला आणि कोठे पडेल याची शाश्वती कुणी देऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ऐच्छिक रक्तदान होणे गरजेचे आहे. रक्तदान कोण करू शकतो?१८ ते ४८ वर्षे वयोगटातील व वजन ५० किलोपेक्षा अधिक असलेली कोणतीही निरोगी व्यक्ती स्त्री-पुरूष स्वेच्छेने रक्तदान करू शकतात. साधारणत: निरोगी युवकांनी दर तीन महिन्यातून एकदा रक्तदान केले तर रक्त निर्मितीला चांगली चालना मिळते.रक्तदान किती प्रमाणात?कोणत्याही शारीरिक हानीशिवाय एक व्यक्ती एका वेळी ३५० सीसी किंवा ४५० सीसी रक्तदान करू शकतो. दान केलेले रक्त आपले शरीर २४ तासात नैसर्गिकरित्या भरून काढते. रक्तदान सुरक्षित आहे का?होय, रक्तदान सुरक्षित, वेदनारहित व आनंदी असते. तसेच संपूर्णपणे सुरक्षित असते. रक्तदान केल्याने कोणताही त्रास होत नाही.रक्तदानासाठी किती वेळ लागतो?साधारणपणे रक्तदानाला १० ते १५ मिनिटे लागतात. यामध्ये रक्तदात्याचे वजन, हिमोग्लोबिन, रक्तदाब तपासणी आदी बाबींची वैद्यकीय तपासणी मोफत करण्यात येते. वास्तविक रक्तदानाची प्रक्रिया केवळ काही मिनिटातच पूर्ण होते.रक्तदान किती वेळा करता येते?एक व्यक्ती दर तीन महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतो. याचाच अर्थ म्हणजे आपण वर्षातून चार वेळा रक्तदान करू शकतो. रक्तदान कुठे केले जाऊ शकते?कुठल्याही मान्यताप्राप्त रक्तपेढीत, शासकीय रूग्णालयात किंवा रक्तदान समितीने आयोजित केलेल्या ऐच्छिक रक्तदान शिबिरात आपण रक्तदान करू शकतो.