शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य मुद्यांवरून लक्ष भटकविण्याचे भाजपचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:24 IST

राजकारणात धर्माची प्रमुख भूमिका असावी. मात्र धर्माचे राजकारण करणे हे योग्य नाही. आज भाजप सरकार देश व राज्यात धर्माच्या नावावर देशवासीयांना आपसांत वाटून देशाच्या विकासात अडचण निर्माण करीत आहे. धर्माचे राजकारण करून मुख्य मुद्दयांवरून लोकांचे लक्ष भटकाविण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांना केला.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील : नागरा येथे २ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राजकारणात धर्माची प्रमुख भूमिका असावी. मात्र धर्माचे राजकारण करणे हे योग्य नाही. आज भाजप सरकार देश व राज्यात धर्माच्या नावावर देशवासीयांना आपसांत वाटून देशाच्या विकासात अडचण निर्माण करीत आहे. धर्माचे राजकारण करून मुख्य मुद्दयांवरून लोकांचे लक्ष भटकाविण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांना केला.लगतच्या ग्राम नागरा येथे २ कोटींच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी शुक्रवारी (दि.११) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. पुढे बोलताना डॉ. पाटील यांनी, आज देशातील तरूण बेरोजगार आहे, शेतकरी आत्महत्या करीत आहे, व्यापाºयांचे उद्योगधंदे चौपट होत आहेत. असे गंभीर विषय सोडून मात्र भाजप धर्माचे राजकारण करीत आहे. मात्र आता मतदार भाजपच्या घोषणांनी त्रस्त झाले असून मोदींनी दाखविलेला ‘अच्छे दिन’चा मायाजाल तुटल्याचे ५ राज्यांतील निवडणूक निकालांनी स्पष्ट झाले आहे. देशातील भाजप सरकारला आता निरोप देण्याचा निर्धार देशवासीयांनी घेतल्याचे मत व्यक्त केले.माजी आमदार आशिष देशमुख यांनी, विधानसभेतील सर्वात अनुभवी व्यक्ती आमदार गोपालदास अग्रवाल असून विधानसभेत त्यांच्याकडून पुष्कळ काही शिकण्यास मिळाल्याचे सांगीतले. तर प्रास्तावीकातून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वैरागकर यांनी, मिळालेल्या २ कोटींच्या निधीतून बालाघाट रोड-मंदिर रस्ता सिमेंटीकरण व पथदिवे, शिव मंदिर-भैरव मंदिर रस्ता डांबरीकरण, शिव मंदिर व भैरव मंदिर आवारभिंत दुरूस्ती व सौंदर्यीकरण, स्वागत द्वार, तलावाजवळ प्रसाधनगृह व २ कक्ष, सभागृह, मंदिर परिसरात पहिल्या माळ््यावर भक्त निवास, ३ विंधन विहीर व पंप, मंदिर परिसरात गट्टूकरणाचे काम केले जाणार असल्याची माहिती दिली.संचालन करून आभार कॉँग्रेस कमिटीचे शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले.कार्यक्रमाला अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटी सचिव आशिष दुआ, जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, रमेश लिल्हारे, रमेश अंबुले, लता दोनोडे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, पुष्पा अटराहे, रणजीतसिंह गौर, प्रशांत लिल्हारे, शैलेश गौर, दिलीप लिल्हारे, जय बुडेकर, मुन्ना नागपूरे, योगेश लिल्हारे, अमृतलाल पतेह, दुर्गाप्रसाद धांदे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.नागराला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न - अग्रवालमोठ्या संघर्षानंतर नागराला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राच दर्जा मिळविता आला. जिल्ह्यातील या प्राचीन तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी सतत प्रयत्न केल्याने आज शिव मंदिर परिसरात बदल दिसून येत आहे. भविष्यात नागराला ‘अ’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले. शिव मंदिर पोहचण्यासाठी गावात बायपास मार्गासाठी भूमि अधिग्रहणाचे काम सुरू असून लवकरच बायपास मार्गाच्या बांधकामाला गती दिली जाणार असल्याचे सांगीतले.