शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

सालेकसा तालुक्यात भाजपची कंबर मोडली

By admin | Updated: July 7, 2015 00:46 IST

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलीच सत्ता कायम राहील या भ्रमात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सालेकसा तालुक्यात मतदारांनी धडा शिकविलेल्याचे दिसून येत आहे.

राकाँ, काँग्रेसने केले किले ध्वस्त : बाहेरचे उमेदवार ठरले आत्मघाती विजय मानकर सालेकसागल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलीच सत्ता कायम राहील या भ्रमात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सालेकसा तालुक्यात मतदारांनी धडा शिकविलेल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात जि.प.च्या चार जागांपैकी फक्त एक आणि पं.स.च्या आठ जागांपैकी तीनच जागा भाजपच्या खिशात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर तालुक्यातून सुद्धा भाजप सत्तेबाहेर झाली आहे.मागील पंचवार्षिकात तालुक्यात जि.प.मध्ये तीन जागा होते. मात्र यावेळी फक्त एक जागा ती म्हणजेच आमगाव खुर्दची कायम राहीली आहे. तर शुन्यावर असलेली काँग्रेस दोन जागेवर झालीया आणि कारुटोला जिंकून आली. कारुटोला काँग्रेसने परत मिळविली तर झालीया येथे काँग्रेस ने जबरदस्त एंट्री केली आहे. येथे दोन वेळा भाजप तर एक वेळा राष्ट्रवादी निवडून आली होती. या क्षेत्रात काँग़्रेसचा नाव घेणारा सुद्धा कोणी दिसत नव्हता. मात्र यावेळी मतदारांनी येथे बाहेरुन आलेल्या भाजप आणि राकाँ दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला सपेश्ल नकारले. पिपरीया जि.प.क्षेत्रावर १५ वर्षापासून सतत भाजपचा राज होता. मात्र या ठिकाणी जन शक्तीवर धनशक्ती भारी पडली. आणि भाजप भुईसपाट झाली. यावेळी येथे भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहीला. या ठिकाणी ही मतदारांनी बाहेरच्या उमेदवारांना नकारत स्थाानिकाला महत्व दिले. परंतु राष्ट्रवादीच्या दुर्गा तिराले यांची धनशक्ती आणि भाजपचे नाराज कार्यकर्ते यांची साथ मिळाल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक उमेदवार ओमप्रकाश लिल्हारे चुरशीच्या लढतीत पराभूत झाले.सालेकसा पंचायत समितीवर एकछत्र राज करणारा भाजप पक्ष यावेळी सत्तेतून बाहेर झालेला दिसत आहे. मागील निवडणुकीत आठ पैकी सहा जागा जिंकत पूर्ण बहुमत घेत सत्ता प्राप्त केली होती. यावेळी फक्त जुन्या तीन जागा वाचवित तीन जागा गमावल्या आहेत. यात आमगाव खुर्द कावराबांध आणि झालीया भाजपकडे कायम असून पिपरीया टोयागोंदी आणि कारुटोला पं.स. मध्ये मनोज विश्वकर्मा यांचा पुनच विचार केला नाही. ते उपसभापती राहीले असून त्यांचा जनसंपर्क वाढला होता. परंतु उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजपशी घटस्फोट केला आणि आपल्या पत्नीला घेवून राष्ट्रवादीच्या मांडव्यात गेले. राष्ट्रवादी ने राजकुमारी विश्वकर्मा यांना टोयागोंदीची उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीने पं.स. बरोबरच जि.प. जिंकण्यातही बाजी मारली. पिपरीया क्षेत्रातच भाजपसाठी मोठा धक्का दायक ठरला. दुसरीकडे काँग्रेसने सोनपुरी आणि लोहारा आपल्याकडे कायम ठेवत पिपरीया आणि कारुटोला भाजपकडून हिसकावून घेतली. आठ पैकी चार जागा जिंकलेल्या काँग्रेसला पूर्ण बहुमत नसला तरी सभापती पद काँग्रेसकडेच राहील तर उपसभापती पद भाजपला की राष्ट्रवादीला देत सत्ता समीकरण कसे बनवतील ते पहावे लागेल. मात्र भाजपला धडा मिळाला एवढे नक्की. सालेकसा आणि देवरी या तालुक्यात आतापर्यंत आतापर्यंत बहुतांश वेळा भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. हे मतदार संघ ज्या लोकसभा क्षेत्रात येतात त्या देवरीतही भाजपाचेच खासदार आहेत. आमदार म्हणून संजय पुराम यांनीही गेल्या सात महिन्यात आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे खासदार आणि आमदार हे मतदारांवरील विश्वास कायम राखण्यात कुठेतरी कमी पडल्याचे दिसून येत आहे.