शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भाजपा-शिवसेना एका नाण्याच्या दोन बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा ...

ठळक मुद्देअशोक चव्हाण : काँग्रेस जनसंघर्ष यात्रा सडक-अर्जुनीत

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आपण दोेघे भाऊ-भाऊ सर्वकाही वाटून खावू, अशा म्हणीप्रमाणे सरकार चालत आहे. या सरकारला अधिकारी, बेरोजगार आणि व्यापारी कंटाळले म्हणून अशा सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे विचार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.काँग्रेस पक्षातर्फे धानाला २५०० रुपये हमीभाव व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी असे मुद्दे घेवून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या येथील दुर्गा चौकात शुक्रवारी (दि.११) आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. नशिम खान, माजी. आ. सेवक वाघाये, माजी आ. रामरतन राऊत, आ. गोपालदास अग्रवाल, संघर्ष यात्रेचे संयोजक आशिष दुआ, बबनराव तायवाडे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प.सदस्य सरिता कापगते, अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहिवले, राजेश नंदागवळी, डॉ. बबन कांबळे, गायत्री इरले, माया चौधरी, मिरा झोडवणे, रियान शेख, निशांत राऊत, शेषराव गिऱ्हेपुंजे, राजू पटले, अनिल राजगिरे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी विखे पाटील यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ४ वर्षापासून अभ्यासच करीत असून त्यामध्ये ते फेल झाले आहे. घरघुती गॅस सिलींडरचे भाव वाढले आहे. धानाला भाव नाही. कर्जमाफीसाठी तीन ते चार वेळा निकष बदलले परंतु त्यांना जमू शकले नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकवणे आवश्यक असून याकरिता ही जनसंपर्क यात्रा काढण्यात आली असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे यांनी मांडले. संचालन राजू पटले यांनी केले. आभार अनिल राजगिरे यांनी मानले.