शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेना एका नाण्याच्या दोन बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा ...

ठळक मुद्देअशोक चव्हाण : काँग्रेस जनसंघर्ष यात्रा सडक-अर्जुनीत

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आपण दोेघे भाऊ-भाऊ सर्वकाही वाटून खावू, अशा म्हणीप्रमाणे सरकार चालत आहे. या सरकारला अधिकारी, बेरोजगार आणि व्यापारी कंटाळले म्हणून अशा सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे विचार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.काँग्रेस पक्षातर्फे धानाला २५०० रुपये हमीभाव व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी असे मुद्दे घेवून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या येथील दुर्गा चौकात शुक्रवारी (दि.११) आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. नशिम खान, माजी. आ. सेवक वाघाये, माजी आ. रामरतन राऊत, आ. गोपालदास अग्रवाल, संघर्ष यात्रेचे संयोजक आशिष दुआ, बबनराव तायवाडे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प.सदस्य सरिता कापगते, अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहिवले, राजेश नंदागवळी, डॉ. बबन कांबळे, गायत्री इरले, माया चौधरी, मिरा झोडवणे, रियान शेख, निशांत राऊत, शेषराव गिऱ्हेपुंजे, राजू पटले, अनिल राजगिरे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी विखे पाटील यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ४ वर्षापासून अभ्यासच करीत असून त्यामध्ये ते फेल झाले आहे. घरघुती गॅस सिलींडरचे भाव वाढले आहे. धानाला भाव नाही. कर्जमाफीसाठी तीन ते चार वेळा निकष बदलले परंतु त्यांना जमू शकले नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकवणे आवश्यक असून याकरिता ही जनसंपर्क यात्रा काढण्यात आली असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे यांनी मांडले. संचालन राजू पटले यांनी केले. आभार अनिल राजगिरे यांनी मानले.