शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
3
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
4
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
5
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

भाजपने अपेक्षाभंग केला

By admin | Updated: October 6, 2015 02:20 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे स्वप्न दाखविणारे सरकार आहे. या सरकारने जनतेला खोटी

अर्जुनी-मोरगाव/सडक अर्जुनी : केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे स्वप्न दाखविणारे सरकार आहे. या सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. आमचे सरकार सत्तेवर असताना सर्वसामान्यांसाठी आपण शासनाशी भांडलो, आता तर विरोधात असतानाही जनता जनार्दनावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा लोकसेवा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला. अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समिती पटांगणावर आयोजित नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. तत्पुर्वी दुर्गा चौक येथून प्रचार रॅली काढण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सावनेरचे आमदार सुनील केदार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, सदस्य गिरीश पालीवाल, अमर वऱ्हाडे, राधेलाल पटले, अर्जुन नागपुरे, पंचायत समिती उपसभापती आशा झिलपे, नितीन पुगलिया, राजेश नंदागवळी, किरण कांबळे, विशाखा साखरे, सुरेखा नाईक, रत्नदीप दहीवले, नानाजी मेश्राम, करुणा नांदगावे, डॉ. वल्लभदास भुतडा, विजय लाडे, एस.एम. नरुले उपस्थित होते. पुढे बोलताना आ. अग्रवाल यांनी, भाजपच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसला कौल द्या, अर्जुनी मोरगाव शहराला नंबर एकचे शहर बनवू व एक आदर्श नगरपंचायत म्हणून पुढे आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संचालन माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांनी केले. प्रास्ताविक मांडून आभार भागवत नाकाडे यांनी मानले. नगर पंचायत काँग्रेसच्या हातात द्याकेंद्राचा आणि राज्याचा विकास फक्त काँग्रेस पक्षच करु शकते. दुसऱ्या पक्षात फक्त आशवासेनच मिळतात, अशी टिका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली. येथील दुर्गा चौकात रविवारी (दि.४) नगर पंचायत निवडणुकीला घेऊन आयोजित कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. तर प्रमुख मार्गदर्शक आमदार सुनिल केदार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी. कटरे, झामसिंग बघेले, जगदीश येरोला, रमेश अंबुले, रजा पटेल, नामदेव किरसान, अर्जुन नागपूरे, शेषराव गिऱ्हेपुंजे, रामलाल राऊत, राजेश नंदागवळी, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते, राजू पटले, अनिल राजगिरे, जाकीर पटेल मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी गिऱ्हेपुंजे यांनी, आतापर्यंत सरपंच व उपसरपंचांनी पाटीवर आपले नाव यावे यासाठीच राजकारण केले. यात गावाचा विकास झाला नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्याचे अतिक्रमण, नाल्या अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी आपण नगर पंचायतमध्ये काँग्रेसला मतदान करुन पाठवा, आम्ही विकास करु, असे आवाहन केले. आमदार केदार यांनी, भाजपाच्या अच्छे दिन वर चांगलीच फिरकी घेतली. प्रास्ताविक राजू पटले यांनी मांडले. संचालन राजगिरे यांनी केले तर आभार शहीद पटेल यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)१८० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश४नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे १८० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यात नवीन नशिने, किशोर शहारे, सोमेश्वर सौंदरकर, प्रवीण शहारे, सुनील लंजे, रामदास सूर्यवंशी, पारेश्वर ठोंबरे, नंदिनी धकाते, पंचशीला मेश्राम, वंदना शहारे, यमू ब्राह्मणकर, अनोज शहारे, दिवाकर शहारे यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.