शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भाजपने अपेक्षाभंग केला

By admin | Updated: October 6, 2015 02:20 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे स्वप्न दाखविणारे सरकार आहे. या सरकारने जनतेला खोटी

अर्जुनी-मोरगाव/सडक अर्जुनी : केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे स्वप्न दाखविणारे सरकार आहे. या सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. आमचे सरकार सत्तेवर असताना सर्वसामान्यांसाठी आपण शासनाशी भांडलो, आता तर विरोधात असतानाही जनता जनार्दनावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा लोकसेवा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला. अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समिती पटांगणावर आयोजित नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. तत्पुर्वी दुर्गा चौक येथून प्रचार रॅली काढण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सावनेरचे आमदार सुनील केदार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, सदस्य गिरीश पालीवाल, अमर वऱ्हाडे, राधेलाल पटले, अर्जुन नागपुरे, पंचायत समिती उपसभापती आशा झिलपे, नितीन पुगलिया, राजेश नंदागवळी, किरण कांबळे, विशाखा साखरे, सुरेखा नाईक, रत्नदीप दहीवले, नानाजी मेश्राम, करुणा नांदगावे, डॉ. वल्लभदास भुतडा, विजय लाडे, एस.एम. नरुले उपस्थित होते. पुढे बोलताना आ. अग्रवाल यांनी, भाजपच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसला कौल द्या, अर्जुनी मोरगाव शहराला नंबर एकचे शहर बनवू व एक आदर्श नगरपंचायत म्हणून पुढे आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संचालन माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांनी केले. प्रास्ताविक मांडून आभार भागवत नाकाडे यांनी मानले. नगर पंचायत काँग्रेसच्या हातात द्याकेंद्राचा आणि राज्याचा विकास फक्त काँग्रेस पक्षच करु शकते. दुसऱ्या पक्षात फक्त आशवासेनच मिळतात, अशी टिका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली. येथील दुर्गा चौकात रविवारी (दि.४) नगर पंचायत निवडणुकीला घेऊन आयोजित कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. तर प्रमुख मार्गदर्शक आमदार सुनिल केदार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी. कटरे, झामसिंग बघेले, जगदीश येरोला, रमेश अंबुले, रजा पटेल, नामदेव किरसान, अर्जुन नागपूरे, शेषराव गिऱ्हेपुंजे, रामलाल राऊत, राजेश नंदागवळी, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते, राजू पटले, अनिल राजगिरे, जाकीर पटेल मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी गिऱ्हेपुंजे यांनी, आतापर्यंत सरपंच व उपसरपंचांनी पाटीवर आपले नाव यावे यासाठीच राजकारण केले. यात गावाचा विकास झाला नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्याचे अतिक्रमण, नाल्या अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी आपण नगर पंचायतमध्ये काँग्रेसला मतदान करुन पाठवा, आम्ही विकास करु, असे आवाहन केले. आमदार केदार यांनी, भाजपाच्या अच्छे दिन वर चांगलीच फिरकी घेतली. प्रास्ताविक राजू पटले यांनी मांडले. संचालन राजगिरे यांनी केले तर आभार शहीद पटेल यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)१८० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश४नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे १८० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यात नवीन नशिने, किशोर शहारे, सोमेश्वर सौंदरकर, प्रवीण शहारे, सुनील लंजे, रामदास सूर्यवंशी, पारेश्वर ठोंबरे, नंदिनी धकाते, पंचशीला मेश्राम, वंदना शहारे, यमू ब्राह्मणकर, अनोज शहारे, दिवाकर शहारे यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.