शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

भाजप सरकारने पुसली लोकांच्या तोंडाला पाने

By admin | Updated: November 29, 2014 01:32 IST

गेल्या ६ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने आणि एक महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.

गोंदिया : गेल्या ६ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने आणि एक महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्वांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या या सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर जागे करण्यासाठी ८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे दिली.माजी मंत्री आणि काँग्रस नेते तथा ८ डिसेंबरच्या मोर्चाचे संयोजक नितीन राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल आणि माजी मंत्री भारतभाऊ बहेकार यावेळी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना आ.वडेट्टीवार आणि राऊत यांनी सांगितले की, सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती आहे. यात शेतकरी होरपळून निघत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांपासून ही परिस्थिती आहे. गेल्या दोन वर्षात आमचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना १० हजार २०० कोटी रुपयांची मदत दिली. मात्र यावर्षी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असतानांही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तोकड्या मदतीची मागणी केंद्राकडे केली आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या धानाला काँग्रेस आघाडीच्या सरकारने प्रतिक्विंटल १५० रुपये भाववाढ दिली होती. याशिवाय २०० रुपये प्रतिक्विंटल बोनसही दिला. मात्र यावेळी भाजपच्या सरकारने बोनस तर दूर, धानाला अवघी ५० रुपये भाववाढ देऊन शेतकऱ्यांबाबत किती संवेदनहीन आहेत याचा परिचय दिला आहे, असाही आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला. गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमच्यावर तोंडसुख घेणारे भाजपचे मंत्री एकनाथ खडसे आता सरकारमध्ये येताच शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले. एलबीटीच्या मुद्द्यावर वेगवेगळी विधाने करून सरकार लोकांना मूर्ख बनवून व्यापाऱ्यांची फसवणूक करीत आहे. आता स्वतंत्र विदर्भाच्या मुद््यावर तरी हे सरकार प्रामाणिक राहून एक वर्षात विदर्भ राज्य करणार का, काँग्रेसचा त्यांना पाठींबाच राहील, असेही यावेळी वडेट्टीवार म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)