शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने पुसली लोकांच्या तोंडाला पाने

By admin | Updated: November 29, 2014 01:32 IST

गेल्या ६ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने आणि एक महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.

गोंदिया : गेल्या ६ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने आणि एक महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्वांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या या सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर जागे करण्यासाठी ८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे दिली.माजी मंत्री आणि काँग्रस नेते तथा ८ डिसेंबरच्या मोर्चाचे संयोजक नितीन राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल आणि माजी मंत्री भारतभाऊ बहेकार यावेळी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना आ.वडेट्टीवार आणि राऊत यांनी सांगितले की, सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती आहे. यात शेतकरी होरपळून निघत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांपासून ही परिस्थिती आहे. गेल्या दोन वर्षात आमचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना १० हजार २०० कोटी रुपयांची मदत दिली. मात्र यावर्षी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असतानांही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तोकड्या मदतीची मागणी केंद्राकडे केली आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या धानाला काँग्रेस आघाडीच्या सरकारने प्रतिक्विंटल १५० रुपये भाववाढ दिली होती. याशिवाय २०० रुपये प्रतिक्विंटल बोनसही दिला. मात्र यावेळी भाजपच्या सरकारने बोनस तर दूर, धानाला अवघी ५० रुपये भाववाढ देऊन शेतकऱ्यांबाबत किती संवेदनहीन आहेत याचा परिचय दिला आहे, असाही आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला. गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमच्यावर तोंडसुख घेणारे भाजपचे मंत्री एकनाथ खडसे आता सरकारमध्ये येताच शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले. एलबीटीच्या मुद्द्यावर वेगवेगळी विधाने करून सरकार लोकांना मूर्ख बनवून व्यापाऱ्यांची फसवणूक करीत आहे. आता स्वतंत्र विदर्भाच्या मुद््यावर तरी हे सरकार प्रामाणिक राहून एक वर्षात विदर्भ राज्य करणार का, काँग्रेसचा त्यांना पाठींबाच राहील, असेही यावेळी वडेट्टीवार म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)