शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

भाजपचे नगरसेवक राजस्थानच्या सहलीवर

By admin | Updated: July 27, 2014 00:10 IST

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता राजकीय खेळी सुरू झाली आहे. पालिकेतील संख्याबल बघता यावेळी भाजप-सेनेला लॉटरी लागण्याची पूर्ण शक्यता आहे. ही संधी हातून जाऊ नये

गोंदिया : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता राजकीय खेळी सुरू झाली आहे. पालिकेतील संख्याबल बघता यावेळी भाजप-सेनेला लॉटरी लागण्याची पूर्ण शक्यता आहे. ही संधी हातून जाऊ नये व आपले सदस्य फुटून सत्तापक्षाच्या संपर्कात येऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना राजस्थानच्या सहलीवर पाठविण्यात आले आहे.येत्या ६ आॅगस्ट रोजी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे हे पद आपल्याकडेच रहावे यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची जोड-तोड सुरू झाली आहे. मात्र पालिकेत सदस्य संख्याबल बघता कॉंग्रेसकडे पाच, राष्ट्रवादीचे ११ व अपक्ष दोन असे एकूण १८ सदस्य आहेत. तर भाजपचे सर्वाधीक १६ व शिवसेनेचे तीन असे एकूण १९ सदस्य आहेत. यामुळे पालिकेत आजघडीला सर्वाधिक सदस्य संख्या भाजप-सेना युतीची असून ही संधी हातून जाऊ देण्यास भाजप-सेना तयार नाही. मात्र फोडा-फोडीच्या राजकारणात काहीही शक्य असल्याचे यापूर्वीही नगर पालिकेत दिसून आले आहे. यामुळेच कुठल्याही प्रकारची ‘रिस्क’ न पत्करता भाजपने आपल्या सदस्यांना आतापासूनच राजस्थान सरकारचे पाहुणे म्हणून पाठविले आहे. गुरूवारी (दि.२४) भाजपचे १२ सदस्य राजस्थानकडे रवाना झाले आहेत. उर्वरीत चार सदस्य अद्यापही गोंदियातच आहे. त्यातील तीन सदस्य रविवारी (दि.२८) रवाना होणार असल्याची माहिती आहे. काँगे्रसच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊन त्यांचा मतदानाचा अधिकार सुद्धा यामुळे संपुष्टात आला आहे. हीच बाब भाजप-सेना युतीसाठी लकी ठरत आहे. अशात भाजपचे १६ सदस्य असल्याने त्यांच्याकडे अध्यक्षपद व शिवसेनेचे तीन सदस्य असल्याने त्यांना उपाध्यक्षपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी भाजपमधून अनिल पांडे, कशिश जायस्वाल, घनश्याम पानतवने व भावना कदम यांच्या नावांची चर्चा आहे. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडे हर्षपाल रंगारी व लता रहांगडाले यांच्यातून एकाची निवड केली जाईल. संख्येच्या आधारावर भाजप-सेना युतीकडून हे सर्व समिकरण लावले जात असले तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी एवढ्या सहजासहजी खुर्ची सोडणार नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. यामुळेच भाजपने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या नगरसेवकांना राजस्थानला रवाना करून दिले. तिथेच सर्व सदस्य एकत्रित होणार असून निवडणुकीपर्यंत राजस्थानमध्येच राहणार असल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)