शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:19 IST

आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यांची तुलना करता येत नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पांगडी येथे बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण

आॅनलाईन लोकमतगोंदिया : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यांची तुलना करता येत नाही. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला जागृत करण्याचे कार्य करून विकासाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे कार्य अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम पांगडी येथे बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, कॉंग्रेस कमिटी महासचिव सहसराम कोरोटे प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार अग्रवाल यांनी, आदिवासी समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगत समाजाच्या विकासासाठी विधान भवनात कितीही संघर्ष करावा लागला तरीही करणार असल्याचे आश्वासन दिले.दरम्यान आमदार अग्रवाल यांच्यासह उपस्थित अन्य पाहुण्यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची विधीवत पूजा करून अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मध्य प्रदेश राज्यातील अशोक मडावी यांनी गोंडी संस्कृतीवर आधारित कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला बल्लुसिंह नागभिरे, दयालसिंग उईके, ज्ञानीराम वट्टी, किशन उईके, सुनील मरसकोल्हे, विनोद भलावी, डी.बी.बोरकर, अरूण साबळे, स्वप्नील ढोले, शिला जाधव, मनोहर उईके, डि.आर.अगडे, मिना सयाम, दिगंबर बघेले, नामदेव शहारे, एस.आर. निंबार्ते, व्ही.के.अहीर, आर.बी. बाचकलवार, व्ही.आर. मडावी, डॉ. घनशाम पाचे, डॉ.किर्तीकुमार चुलपार, नरेंद्र शेंडे यांच्यासह मोठ्या संख्येत आदिवासी बांधव उपस्थित होते.