शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पीएसीएलच्या कोट्यवधींची ग्राहकांना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST

गोंदिया : पाच व सहा वर्षात पैसे दामदुप्पट करून देण्याच्या नावावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड व ...

गोंदिया : पाच व सहा वर्षात पैसे दामदुप्पट करून देण्याच्या नावावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड व आंध्र प्रदेश या चार राज्यातील खातेदारांकडून पीएसीएल कंपनीने पैसे घेऊन त्यांना मॅच्युरिटीनंतर पैसे दिले नाही. एकट्या गोंदिया शाखेने १ कोटी ७ लाख रुपयांची मॅच्युरिटी रक्कम ग्राहकांना परत केली नाही. कंपनीकडून पैसे कधी मिळणार याच प्रतीक्षेत ग्राहक आहेत.

पीएसीएल या कंपनीने देशभरातील ग्राहकांना मॅच्युरिटीचे पैसे न दिल्यामुळे ४५ हजार कोेटींचा अपहार झाल्याचा गुन्हा सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभागाने) या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या कंपनीने देशभरात उघडलेल्या शाखांच्या ठिकाणाहून ग्राहकांच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हजारो ग्राहकांची झोप उडाली. गोंदिया जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांचे १ कोटी रुपयांच्यावर पैसे बुडाले.

पाच वर्षात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या नावावर पीएसीएल इंडिया लिमिटेड या कंपनीची गोंदियात १९९८ पासून सुरुवात झाली. या कंपनीने सुरुवातीपासून सन २०१२ पर्यंत असलेल्या सर्व ग्राहकांना नियमित मॅच्युरिटी दिली आहे. त्यानंतरच्या खातेदारांना मॅच्युरिटी दिली नसल्याने २०१३ पासून आतापर्यंतच्या मॅचुरिटी झालेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे मिळाले नाही. ग्राहकांनी या कंपनीच्या गोंदिया शाखेकडे जमा केलेली रक्कम १ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम अद्यापही त्यांना मिळाली नाही. या कंपनीशी ७०० एजंट जुळलेले आहेत. या एजंटनी मध्य प्रदेशचा बालाघाट, मलाजखंड, छत्तीसगडचा राजनांदगाव, डोंगरगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यातील हजारो खातेदारांना मॅच्युरिटी दिली नाही. परिणामी त्या कंपनीच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदविली. गोंदिया शाखेतील २२५ ग्राहकांनी पोलिसात तक्रार केली होती. ग्राहकांचे १ कोटी ७ लाख रुपये कंपनीकडून केव्हा परत मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी पीएसएलचे पैसे मिळणार म्हणून ग्राहकांना आपाले अर्ज ऑनलाईन करा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपली कागदपत्रे त्या ग्राहकांनी ऑनलाईन केली होती. परंतु आतापर्यंत त्या ग्राहकांना पीएसीएलचा पैसा मिळाला नाही.

बॉक्स

नागरिकांची लूट सुरूच

गोंदिया जिल्ह्यातील ग्राहकांना पैसे दामदुप्पट करून देण्याच्या नावावर पीएसीएल या कंपनीकडून फसवणूक करण्यात आली. या कंपनीसारख्याच आणखी काही कंपन्या गोंदियात आहेत. खातेदार वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारून पॉलिसी विड्राल करण्याची मागणी करतात तेव्हा या कंपन्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर वेळीच कारवाई होण्याची गरज आहे.