शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सार्वजनिक पथदिव्यांच्या थकीत बिलाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

केशोरी : पथदिव्यांच्या थकीत वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायत करणार नाही या मागणीसह अर्जुनी-मोरगाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेने लढा उभारून जिल्हाधिकारी व ...

केशोरी : पथदिव्यांच्या थकीत वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायत करणार नाही या मागणीसह अर्जुनी-मोरगाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेने लढा उभारून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविले होते. शासनाने या लढ्याची दखल घेऊन पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याने पथदिव्यांच्या थकीत बिलाचा तिढा सुटला आहे. लवकरच गावातील सार्वजनिक पथदिवे प्रकाशमान होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी सांगितले.

सार्वजनिक पथदिव्यांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने बंद केला होता. तेव्हापासून केशोरीसह परिसरातील सर्वच गावे अंधारमय झाली होती. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अंधाराचा सामना करावा लागत होता. शासनाने १५व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांच्या थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आदेश निर्गमित केले होते. परंतु त्या निधीतून गावातील अनेक विकासकामांवर खर्च करण्याचा आराखडा तयार करून ग्रामपंचायतीने गाव विकासात्मक नियोजन केले होते. यामुळे तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेने १५व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून कोणतीही ग्रामपंचायत सार्वजनिक पथदिव्यांच्या थकीत बिलाचा भरणा करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.

तसेच वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्री, ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले होते. सरपंच संघटनेच्या लढ्याची नोंद घेऊन शासनाने पथदिव्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सरपंच संघटनेकडून सांगण्यात आले. परंतु निर्णयाचे आदेश संबंधित विभागाला पोहचले नसून शासन आदेशाची वाट वीज वितरण कंपनी बघत आहे. शासनाचे आदेश प्राप्त होताच पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.