शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मोठे स्वप्न बघूनच ध्येय गाठता येते!

By admin | Updated: February 15, 2017 01:57 IST

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग आपल्या मुठीत आलेले आहे. उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग आपण कसे करतो,

किशोर तरोणे : वार्षिकोत्सव साजरा नवेगावबांध : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग आपल्या मुठीत आलेले आहे. उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग आपण कसे करतो, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग स्वत:च्या क्षमता व कौशल्य विकसित करण्यासाठी करणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन जीवन हे स्वप्नवत असते. प्रत्येक विद्यार्थी विविध स्वप्ने बघतो. परंतु भविष्याचे मोठे स्वप्न बघता-बघता त्याला प्रयत्नांची जोड दिली की आपल्याला स्वत:चे ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी केले. स्थानिक आर.पी. पुगलिया महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. दयाराम कापगते होते. अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष नितीन पुगलिया, सदस्य अमृतलाल टांक, जगदिश मोहबंशी, जगदिश पवार, विद्यापीठ प्रतिनिधी कमलेश चव्हारे, विद्यार्थिनी प्रतिनिधी शीतल शहारे, प्रा. माया लाडे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धामध्ये स्वेच्छेने सहभागी होऊन स्वत:मध्ये नवचैतन्य निर्माण करावे, असे आवाहन दयाराम कापगते यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य मंगला गडकरी, संचालन प्रा. विमला आगाशे व सचिन राऊत, आभार प्रा.आर.सी. तागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. जनार्धन मेश्राम, टी.जी. चांदेवार, डोंगरवार, रामदास बोरकर, हेमकृष्ण लंजे, पुंडलिक मेश्राम, संतोष राठोड, वामन चचाणे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)